शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

भाजीपाला, किराणा आणि फळांच्या किंमतीही भडकल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 05:00 IST

किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फ‌ळांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सफरचंद २ हजार २०० रुपयांच्या पेटीवरून २ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले आहे.

ठळक मुद्देबजेट कोलमडले। किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचे संकट त्यातच परतीच्या पावसाचा धुमाकुळ यामुळे बाजारपेठांमध्ये महागाईचा भडका उडाला आहे. परिणामी सामान्य नागरिकांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे. अन्यधान्य, तेलांच्या किंमती वाढल्या असतानाच आता भाजीपाल्यानेही यात भर घातली आहे.किलोमागे चक्क ३० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. आलू, कांदे, लसुनच्या किंमती गगणाला पोहचल्या आहे. फुलकोबीने चक्क शंभरी गाढली आहे. १० ते १५ रुपयांनी या दिवसात मिळणारी भेंडी आता ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहे. दरम्यान, नवरोत्रोत्सव सुरु झाल्यामुळे फ‌ळांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे. सफरचंद २ हजार २०० रुपयांच्या पेटीवरून २ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचले आहे. तर मोसंबी ८०० रुपयांवरून १ हजार ३०० रुपयांवर तर दाळींब २० किलोचा कॅरेट १ हजार ६०० रुपयांवर २ हजार ४०० रुपयांवर पोहचले आहे. यामुळे चिल्लर व्यावसायिकांनीही दरवाढ केली आहे. परिणामी ग्राहकांना मोठा आर्थिक फटसा सहन करावा लागत आहे.तूर डाळ २० रुपयांनी महागलीमागील दहा दिवसांपूर्वीच्या तुलनेत तूळ दाळीमध्ये २० रुपये प्रति किलोने वाढ झाली आहे. पूर्वी १०० रुपये किलो असणारी दाळ आता १२० रुपये किलोने ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. त्यासोबतच खाद्य तेलांच्या किंमतीमध्ये प्रति किलो पाच ते सात रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सामान्यांना अडचण जात आहे.फळांच्या किंमती वाढल्यानवरात्रोत्सवामुळे फळांच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील आठ दिवसाच्या तुलनेमध्ये किलोमध्ये प्रत्येक फळांच्या किंमतीत ५० ते ६० रुपयांची वाढ झाली.परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यातच बाहेरून येणाऱ्या भाजीपाल्याची आवकही कमी झाल्याने मागील काही दिवसात किंमती झपाट्याने वाढल्या आहे. आठवड्याच्या भाजीपाल्यासाठी किमान पाचशे रुपये मोजावे लागत आहे.

टॅग्स :vegetableभाज्याfruitsफळे