शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 22:30 IST

सरकारी स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ २० रूपयांनी महागल्याने सर्वसामान्य ग्राहक विकत घेण्यास टाळाटाळ करू लागले तर दुसरीकडे दुकानदारांचा नफा घटल्याने दुकानदारही पेचात पडले आहेत.

ठळक मुद्देसर्वसामान्यांमध्ये नाराजी : नफा घटल्याने दुकानदारही पेचात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सरकारी स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ २० रूपयांनी महागल्याने सर्वसामान्य ग्राहक विकत घेण्यास टाळाटाळ करू लागले तर दुसरीकडे दुकानदारांचा नफा घटल्याने दुकानदारही पेचात पडले आहेत.मागीलवर्षी राज्यामध्ये तुरीचे बंपर उत्पादन झाले. शासनाला शेतकऱ्यांकडून तूर डाळ विकत घेण्यासाठी वारंवार वेगवेगळी कारणे पुढे करावी लागली होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर डाळ उपलब्ध असूनही शासनाला खरेदीचे नियोजन करता आले नाही. दरम्यान, शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्यांनतर शासनाने तूर डाळ खरेदीची मोहीमच सुरू केली. त्यामुळे तूर डाळीचे दर घसरले. शासकीय गोदामामध्ये मोठा साठा झाल्याने अंगणवाडी केंद्रापासून तर विद्यार्थ्याचे वसतिगृह तसेच अन्य विभागांनाही तूर डाळ खरेदीसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने सक्ती केली होती. अर्थातच जादा उत्पन्नामुळे तूर डाळीचे दर कमी झाले.सरकारी स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात मिळू लागली. जानेवारी २०१९ पर्यंत डाळीच्या किंमती फारशा वाढल्या नाही. मार्च २०१९ या महिन्यात सरकारी स्वस्त धान्य दुकानात ३५ रूपये किलो दराने डाळ मिळत होती. एप्रिल २०१९ मध्ये २० रूपयांनी वाढ करून ५५ रूपये प्रतिकिलो करण्यात आली.विशेष म्हणजे, शासनाकडून दुकानदारांना मार्च महिन्यामध्ये प्रतिकिलो ३१ रूपये दराने मिळत होती. आता दुकानदारांनाच ५३ रूपये ५० पैसे प्रतिकिलो दर लागू करण्यात आला. एका किलोवर दीड रूपये नफा मिळत असल्याने तूर डाळ ग्राहकांना विकायची कशी, हा प्रश्न दुकानदारांपुढे निर्माण झाला आहे. खरेतर स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळीच्या किमती वाढविण्याची काही गरज नव्हती.सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या दैनंदिन आहारात तूर डाळ उपयोग आणण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकान आधार ठरत होते शासनाने अचानक किंमत वाढवून त्यांना डाळीपासून वंचित ठेवले आहे.खुल्या बाजारातून विकत घेणे अशक्यसरकारी स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळीच्या किमती वाढविल्याने खुल्या बाजारातून विकत घेणे गरिबांना शक्य होणार नाही. ही डाळ आता खुल्या बाजारात प्रतिकिलो ७५ रूपये दराने विकल्या जात आहे. सर्वसामान्य विकत घेणे परवडण्यासारखे नाही. गरिबांची अडचण लक्षात घेऊन शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी दुकानदारांसह ग्राहकांनी केली आहे.