शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 22:30 IST

सरकारी स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ २० रूपयांनी महागल्याने सर्वसामान्य ग्राहक विकत घेण्यास टाळाटाळ करू लागले तर दुसरीकडे दुकानदारांचा नफा घटल्याने दुकानदारही पेचात पडले आहेत.

ठळक मुद्देसर्वसामान्यांमध्ये नाराजी : नफा घटल्याने दुकानदारही पेचात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सरकारी स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळ २० रूपयांनी महागल्याने सर्वसामान्य ग्राहक विकत घेण्यास टाळाटाळ करू लागले तर दुसरीकडे दुकानदारांचा नफा घटल्याने दुकानदारही पेचात पडले आहेत.मागीलवर्षी राज्यामध्ये तुरीचे बंपर उत्पादन झाले. शासनाला शेतकऱ्यांकडून तूर डाळ विकत घेण्यासाठी वारंवार वेगवेगळी कारणे पुढे करावी लागली होती. शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात तूर डाळ उपलब्ध असूनही शासनाला खरेदीचे नियोजन करता आले नाही. दरम्यान, शेतकºयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्यांनतर शासनाने तूर डाळ खरेदीची मोहीमच सुरू केली. त्यामुळे तूर डाळीचे दर घसरले. शासकीय गोदामामध्ये मोठा साठा झाल्याने अंगणवाडी केंद्रापासून तर विद्यार्थ्याचे वसतिगृह तसेच अन्य विभागांनाही तूर डाळ खरेदीसाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने सक्ती केली होती. अर्थातच जादा उत्पन्नामुळे तूर डाळीचे दर कमी झाले.सरकारी स्वस्त धान्य दुकानातून माफक दरात मिळू लागली. जानेवारी २०१९ पर्यंत डाळीच्या किंमती फारशा वाढल्या नाही. मार्च २०१९ या महिन्यात सरकारी स्वस्त धान्य दुकानात ३५ रूपये किलो दराने डाळ मिळत होती. एप्रिल २०१९ मध्ये २० रूपयांनी वाढ करून ५५ रूपये प्रतिकिलो करण्यात आली.विशेष म्हणजे, शासनाकडून दुकानदारांना मार्च महिन्यामध्ये प्रतिकिलो ३१ रूपये दराने मिळत होती. आता दुकानदारांनाच ५३ रूपये ५० पैसे प्रतिकिलो दर लागू करण्यात आला. एका किलोवर दीड रूपये नफा मिळत असल्याने तूर डाळ ग्राहकांना विकायची कशी, हा प्रश्न दुकानदारांपुढे निर्माण झाला आहे. खरेतर स्वस्त धान्य दुकानातील तूर डाळीच्या किमती वाढविण्याची काही गरज नव्हती.सर्वसामान्य ग्राहकांना रोजच्या दैनंदिन आहारात तूर डाळ उपयोग आणण्यासाठी सरकारी स्वस्त धान्य दुकान आधार ठरत होते शासनाने अचानक किंमत वाढवून त्यांना डाळीपासून वंचित ठेवले आहे.खुल्या बाजारातून विकत घेणे अशक्यसरकारी स्वस्त धान्य दुकानातून तूर डाळीच्या किमती वाढविल्याने खुल्या बाजारातून विकत घेणे गरिबांना शक्य होणार नाही. ही डाळ आता खुल्या बाजारात प्रतिकिलो ७५ रूपये दराने विकल्या जात आहे. सर्वसामान्य विकत घेणे परवडण्यासारखे नाही. गरिबांची अडचण लक्षात घेऊन शासनाने ही दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी दुकानदारांसह ग्राहकांनी केली आहे.