शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देसरासरी ४४४.२ मिमी पाऊस : दमदार पावसाअभावी धानपट्ट्यातील रोवण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारी चंद्रपूरसह अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र जिथे पावसाची अधिक गरज आहे, अशा चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड या धान उत्पादक तालुक्यात अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली.त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.मूलमध्ये मुसळधारमूल : मागील आठवडयात पावसाने ब्रेक लावल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळबली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून तुरळक पाऊस पडत असल्याने काही शेतकऱ्यांनी समाधान मानत रोवणीच्या कामाला सुरूवात केली. बुधवारी दुपारी अचानक मूलमध्ये मुसळधार पाऊस पडला. अनेक मोकळ्या भूखंडात व वस्त्यांमधील रस्त्यावर पाणी साचले. अचानक असा पाऊस आल्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली. यावर्षी पावसाला सुरूवात झाली खरी, परंतु पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे पºहे टाकण्यापासून तर रोवणीच्या कामापर्यंत शेतकºयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे तालुक्यात केवळ ४३.९ टक्के रोवणी होऊ शकली.नागभीडमध्ये वाकुल्यानागभीड : परिसरात ढगाळ वातावरण राहत असले तरी जोरदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांत हलका पाऊस पडला. या पावसावर व मोटारपंपाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी रोवणी उरकली. पण आता पाऊसच पडत नसल्याने ही रोवणी करपायला सुरूवात झाली आहे. सध्या पडत असलेला पाऊस केवळ पऱ्हे जगविण्याच्या कामी येत आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. असले तरी आतापर्यंत तालुक्यात ३५ ते ४० टक्के रोवणी उरकल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस