शहरं
Join us  
Trending Stories
1
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
2
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
3
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
4
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
5
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
6
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
7
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
8
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
9
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
12
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
13
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
14
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
15
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
16
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
17
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
18
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
19
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
20
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?

जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देसरासरी ४४४.२ मिमी पाऊस : दमदार पावसाअभावी धानपट्ट्यातील रोवण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारी चंद्रपूरसह अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र जिथे पावसाची अधिक गरज आहे, अशा चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड या धान उत्पादक तालुक्यात अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली.त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.मूलमध्ये मुसळधारमूल : मागील आठवडयात पावसाने ब्रेक लावल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळबली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून तुरळक पाऊस पडत असल्याने काही शेतकऱ्यांनी समाधान मानत रोवणीच्या कामाला सुरूवात केली. बुधवारी दुपारी अचानक मूलमध्ये मुसळधार पाऊस पडला. अनेक मोकळ्या भूखंडात व वस्त्यांमधील रस्त्यावर पाणी साचले. अचानक असा पाऊस आल्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली. यावर्षी पावसाला सुरूवात झाली खरी, परंतु पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे पºहे टाकण्यापासून तर रोवणीच्या कामापर्यंत शेतकºयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे तालुक्यात केवळ ४३.९ टक्के रोवणी होऊ शकली.नागभीडमध्ये वाकुल्यानागभीड : परिसरात ढगाळ वातावरण राहत असले तरी जोरदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांत हलका पाऊस पडला. या पावसावर व मोटारपंपाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी रोवणी उरकली. पण आता पाऊसच पडत नसल्याने ही रोवणी करपायला सुरूवात झाली आहे. सध्या पडत असलेला पाऊस केवळ पऱ्हे जगविण्याच्या कामी येत आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. असले तरी आतापर्यंत तालुक्यात ३५ ते ४० टक्के रोवणी उरकल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस