शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी, धानपट्टा कोरडाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 05:01 IST

मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देसरासरी ४४४.२ मिमी पाऊस : दमदार पावसाअभावी धानपट्ट्यातील रोवण्या खोळंबल्या

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील काही भागात दररोज पाऊस हजेरी लावत आहे. बुधवारी चंद्रपूरसह अनेक भागात पावसाने हजेरी लावली. मात्र जिथे पावसाची अधिक गरज आहे, अशा चिमूर, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभीड या धान उत्पादक तालुक्यात अद्यापही पाहिजे तसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे तेथील शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.मागील चार ते पाच दिवसांपासून चंद्रपुरात दररोज पाऊस येत आहे. सकाळच्या सुमारास ऊन्ह असते. मात्र दुपारी अचानक वातावरण बदलून पावसाला सुरूवात होते. बुधवारीदेखील असेच झाले. बुधवारी दुपारी १.३० वाजता पावसाला सुरुवात झाली.त्यानंतर रात्रीपर्यंत अधेमधे पावसाची रिपरिप सुरूच होती. चंद्रपूरसह जिल्ह्यातील घुग्घुस, भद्रावती, राजुरा, कोरपना, मूल, सिंदेवाही या तालुक्यांमधेही पावसाने हजेरी लावली.मूलमध्ये मुसळधारमूल : मागील आठवडयात पावसाने ब्रेक लावल्याने अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळबली होती. परंतु मागील दोन दिवसांपासून तुरळक पाऊस पडत असल्याने काही शेतकऱ्यांनी समाधान मानत रोवणीच्या कामाला सुरूवात केली. बुधवारी दुपारी अचानक मूलमध्ये मुसळधार पाऊस पडला. अनेक मोकळ्या भूखंडात व वस्त्यांमधील रस्त्यावर पाणी साचले. अचानक असा पाऊस आल्यामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडाली. यावर्षी पावसाला सुरूवात झाली खरी, परंतु पाहिजे तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे पºहे टाकण्यापासून तर रोवणीच्या कामापर्यंत शेतकºयांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. त्यामुळे तालुक्यात केवळ ४३.९ टक्के रोवणी होऊ शकली.नागभीडमध्ये वाकुल्यानागभीड : परिसरात ढगाळ वातावरण राहत असले तरी जोरदार पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मागील काही दिवसांत हलका पाऊस पडला. या पावसावर व मोटारपंपाच्या पाण्यावर शेतकऱ्यांनी रोवणी उरकली. पण आता पाऊसच पडत नसल्याने ही रोवणी करपायला सुरूवात झाली आहे. सध्या पडत असलेला पाऊस केवळ पऱ्हे जगविण्याच्या कामी येत आहे. तालुक्यात जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्रात धान पीक घेतले जाते. असले तरी आतापर्यंत तालुक्यात ३५ ते ४० टक्के रोवणी उरकल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Rainपाऊस