शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

वृक्ष लागवडीसाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: June 30, 2016 00:58 IST

राज्यात लावल्या जाणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

वनप्रबोधनीत मुख्य सोहळा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाचंद्रपूर : राज्यात लावल्या जाणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. चंद्रपूर जिल्हयात २५ लाखांवर वृक्ष या दिवशी लावले जाणार आहेत. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी या कामाच्या तयारीचा बुधवारी आढावा घेतला आणि यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या.जिल्ह्यात हजारो ठिकाणी एकाच वेळी वृक्षारोपन केले जाणार आहे. असे असले तरी वृक्षरोपणाचा जिल्हास्तरीय मुख्य सोहळा मूल मार्गावरील चंद्रपूर वनप्रबोधनीलगत कंम्पार्टमेंट क्रमांक ४०३ मध्ये होणार आहे. खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला सामाजिक वनीकरचे उपसंचालक काळे, उपवनसंरक्षक अरूण धाबेकर, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, मनोज जयस्वाल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने १५ लाख ५६ हजार रोपे लावली जाणार असून ही रोपे राखीव ठेवण्यात आली आहे. विविध शासकीय संस्था व खाजगी व्यक्तीव्दारे ५ लाख ७० हजार रोपे लावली जाणार आहेत. या रोपांच्या उचलचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. आजपर्यंत ५० टक्के रोपांची उचल झाली असून दर दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिक जिल्ह्यातील विविध रोपवाटीकेतून रोपे घेऊन जात असल्याचे काळे यांनी सांगितले. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) वृक्षारोपण मोहिमेत जिल्ह्याचा मोठया प्रमाणावर सहभाग असणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात सर्वच रोप वाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणावार रोपट्यांची व्यवस्था आहे. तेथून नागरिकांनी रोपटी घेवून जावीत आणि लावावीत. नागरिकांनी या कार्यात पुढे येण्याची गरज आहे. उद्दिष्ट व खाजगी व्यक्तींकडून झालेली मागणी या नुसार वृक्षारोपनासाठी झालेल्या खड्डयांचा आढावा घेतला आहे. - आशुतोष सलीलजिल्हाधिकारी, चंद्रपूर