शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

वृक्ष लागवडीसाठी यंत्रणा सज्ज

By admin | Updated: June 30, 2016 00:58 IST

राज्यात लावल्या जाणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

वनप्रबोधनीत मुख्य सोहळा : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावाचंद्रपूर : राज्यात लावल्या जाणाऱ्या दोन कोटी वृक्ष लागवडीच्या उपक्रमासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. चंद्रपूर जिल्हयात २५ लाखांवर वृक्ष या दिवशी लावले जाणार आहेत. जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी या कामाच्या तयारीचा बुधवारी आढावा घेतला आणि यंत्रणेला आवश्यक त्या सूचना केल्या.जिल्ह्यात हजारो ठिकाणी एकाच वेळी वृक्षारोपन केले जाणार आहे. असे असले तरी वृक्षरोपणाचा जिल्हास्तरीय मुख्य सोहळा मूल मार्गावरील चंद्रपूर वनप्रबोधनीलगत कंम्पार्टमेंट क्रमांक ४०३ मध्ये होणार आहे. खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी तयारीचा आढावा घेतला. या बैठकीला सामाजिक वनीकरचे उपसंचालक काळे, उपवनसंरक्षक अरूण धाबेकर, कार्यकारी अभियंता अरुण गाडेगोणे, मनोज जयस्वाल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ.अण्णासाहेब हसनाबादे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वनविभागाच्या वतीने १५ लाख ५६ हजार रोपे लावली जाणार असून ही रोपे राखीव ठेवण्यात आली आहे. विविध शासकीय संस्था व खाजगी व्यक्तीव्दारे ५ लाख ७० हजार रोपे लावली जाणार आहेत. या रोपांच्या उचलचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. आजपर्यंत ५० टक्के रोपांची उचल झाली असून दर दिवशी मोठ्या प्रमाणावर नागरिक जिल्ह्यातील विविध रोपवाटीकेतून रोपे घेऊन जात असल्याचे काळे यांनी सांगितले. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) वृक्षारोपण मोहिमेत जिल्ह्याचा मोठया प्रमाणावर सहभाग असणे आवश्यक आहे. वृक्षारोपणासाठी जिल्ह्यात सर्वच रोप वाटिकांमध्ये मोठ्या प्रमाणावार रोपट्यांची व्यवस्था आहे. तेथून नागरिकांनी रोपटी घेवून जावीत आणि लावावीत. नागरिकांनी या कार्यात पुढे येण्याची गरज आहे. उद्दिष्ट व खाजगी व्यक्तींकडून झालेली मागणी या नुसार वृक्षारोपनासाठी झालेल्या खड्डयांचा आढावा घेतला आहे. - आशुतोष सलीलजिल्हाधिकारी, चंद्रपूर