शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

अयोध्येत राममंदिर बनणारच- प्रवीण तोगडिया

By admin | Updated: December 13, 2014 22:36 IST

हिंदूंना मूलभूत गरजांसोबतच सन्मानही हवा आहे. अयोध्येत राम मंदिर बनणार नाही, तोपर्यंत हिंदूंचा भारतात सन्मान नाही. मंदिर प्रेमाने बनवू द्याल, तर प्रेमाने बनवू. विरोध केला तर प्रसंगी

हिंदू संमेलन : चंद्रपुरात विश्व हिंदू परिषदेचे आयोजनचंद्रपूर : हिंदूंना मूलभूत गरजांसोबतच सन्मानही हवा आहे. अयोध्येत राम मंदिर बनणार नाही, तोपर्यंत हिंदूंचा भारतात सन्मान नाही. मंदिर प्रेमाने बनवू द्याल, तर प्रेमाने बनवू. विरोध केला तर प्रसंगी छातीवर पाय देऊनही मंदिर बांधले जाईल, अशी गर्जना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त स्थानिक लोकमान्य टिळक शाळेच्या प्रांगणात शनिवारी आयोजित विश्व हिंदू संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुनील महाराज, मनीष महाराज, डॉ. कन्ना मडावी, प.पू. आदित्यमुनीजी महाराज, रमणमुनीजी महाराज, भदंत सुमनवालेजी, सुवर्ण जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष किसनचंद चढ्ढा, पंकज अग्रवाल, दिनेश बजाज आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. तोगडिया पुढे म्हणाले, देशात लाखो हिंदूंचे धर्मांतर होत आहे, ही गंभीर बाब आहे. हिंदूंनी याबाबत जागृत होणे आवश्यक आहे. प्रेमाचे आम्ही समर्थक आहोत. प्रेम करा; पण सावित्रीची सानिया का बनत आहे ? प्रेम आहे तर धर्म का बदलावा लागतो ? प्रेमाची हीच व्याख्या असेल तर आतापर्यंत शेकडो निहाल राम का नाही बनले?, असा सवाल करीत ते म्हणाले, प्रेमाच्या नावाखाली जिहाद आणला तर शिवाजी महाराजांची तलवार घेऊन आम्ही हिंदू या विरोधात लढू. पूर्वी देशात ७०० कोटी हिंदू होते. आता १०० कोटी राहिले आहेत. विचार करा, हिंदू आताच जागृत झाला नाही तर पुढे दहाच कोटी हिंदू शिल्लक असतील. संपूर्ण पृथ्वीवर हिंदू पसरले होते. आता केवळ अर्ध्या भारतात सिमित झाले आहेत. पाकिस्तानात केवळ १ टक्का हिंदू वाचले आहेत. अफगाणिस्तानातून हिंदूंना हाकलून लावले. श्रीलंकेत हिंदूचे एकही मंदिर शिल्लक नाही. बॉम्बस्फोटात ते पाडून टाकले आहेत. त्यामुळे आता हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे. हिंदू असल्याचा गर्व बाळगा, हिंदूंनो संघटित व्हा, १०० कोटी हिंदू एकत्र आले तर कुणीही हिंदूच्या केसाला धक्का लावणार नाही. विश्व हिंदू परिषदेचे संविधान लिहिण्यात काँग्रेस नेत्यांचेही योगदान होते. शिख, जैन यांनीही परिश्रम घेत या हिंदू परिषदेची स्थापना केली आहे, अशी माहितीही डॉ. तोगडिया यांनी दिली. मनीष महाराज म्हणाले, मानवी जीवनात तीन व्यवस्था असतात. भौतिक, आधुनिक आणि आध्यात्मिक. यापैकी आपण भौतिक आणि आधुनिक व्यवस्थेकडे सहज आकर्षित होतो. मात्र आध्यात्मिक व्यवस्थाच आपल्याला खरे आयुष्य मिळवून देते. त्यामुळे सनातन धर्माला जवळ करा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्ण जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष किसनचंद चढ्ढा यांनी केले. संचालन चैताली खटी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)