शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

अयोध्येत राममंदिर बनणारच- प्रवीण तोगडिया

By admin | Updated: December 13, 2014 22:36 IST

हिंदूंना मूलभूत गरजांसोबतच सन्मानही हवा आहे. अयोध्येत राम मंदिर बनणार नाही, तोपर्यंत हिंदूंचा भारतात सन्मान नाही. मंदिर प्रेमाने बनवू द्याल, तर प्रेमाने बनवू. विरोध केला तर प्रसंगी

हिंदू संमेलन : चंद्रपुरात विश्व हिंदू परिषदेचे आयोजनचंद्रपूर : हिंदूंना मूलभूत गरजांसोबतच सन्मानही हवा आहे. अयोध्येत राम मंदिर बनणार नाही, तोपर्यंत हिंदूंचा भारतात सन्मान नाही. मंदिर प्रेमाने बनवू द्याल, तर प्रेमाने बनवू. विरोध केला तर प्रसंगी छातीवर पाय देऊनही मंदिर बांधले जाईल, अशी गर्जना विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी केली. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त स्थानिक लोकमान्य टिळक शाळेच्या प्रांगणात शनिवारी आयोजित विश्व हिंदू संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुनील महाराज, मनीष महाराज, डॉ. कन्ना मडावी, प.पू. आदित्यमुनीजी महाराज, रमणमुनीजी महाराज, भदंत सुमनवालेजी, सुवर्ण जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष किसनचंद चढ्ढा, पंकज अग्रवाल, दिनेश बजाज आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. तोगडिया पुढे म्हणाले, देशात लाखो हिंदूंचे धर्मांतर होत आहे, ही गंभीर बाब आहे. हिंदूंनी याबाबत जागृत होणे आवश्यक आहे. प्रेमाचे आम्ही समर्थक आहोत. प्रेम करा; पण सावित्रीची सानिया का बनत आहे ? प्रेम आहे तर धर्म का बदलावा लागतो ? प्रेमाची हीच व्याख्या असेल तर आतापर्यंत शेकडो निहाल राम का नाही बनले?, असा सवाल करीत ते म्हणाले, प्रेमाच्या नावाखाली जिहाद आणला तर शिवाजी महाराजांची तलवार घेऊन आम्ही हिंदू या विरोधात लढू. पूर्वी देशात ७०० कोटी हिंदू होते. आता १०० कोटी राहिले आहेत. विचार करा, हिंदू आताच जागृत झाला नाही तर पुढे दहाच कोटी हिंदू शिल्लक असतील. संपूर्ण पृथ्वीवर हिंदू पसरले होते. आता केवळ अर्ध्या भारतात सिमित झाले आहेत. पाकिस्तानात केवळ १ टक्का हिंदू वाचले आहेत. अफगाणिस्तानातून हिंदूंना हाकलून लावले. श्रीलंकेत हिंदूचे एकही मंदिर शिल्लक नाही. बॉम्बस्फोटात ते पाडून टाकले आहेत. त्यामुळे आता हिंदूंनी संघटित होणे गरजेचे आहे. हिंदू असल्याचा गर्व बाळगा, हिंदूंनो संघटित व्हा, १०० कोटी हिंदू एकत्र आले तर कुणीही हिंदूच्या केसाला धक्का लावणार नाही. विश्व हिंदू परिषदेचे संविधान लिहिण्यात काँग्रेस नेत्यांचेही योगदान होते. शिख, जैन यांनीही परिश्रम घेत या हिंदू परिषदेची स्थापना केली आहे, अशी माहितीही डॉ. तोगडिया यांनी दिली. मनीष महाराज म्हणाले, मानवी जीवनात तीन व्यवस्था असतात. भौतिक, आधुनिक आणि आध्यात्मिक. यापैकी आपण भौतिक आणि आधुनिक व्यवस्थेकडे सहज आकर्षित होतो. मात्र आध्यात्मिक व्यवस्थाच आपल्याला खरे आयुष्य मिळवून देते. त्यामुळे सनातन धर्माला जवळ करा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुवर्ण जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष किसनचंद चढ्ढा यांनी केले. संचालन चैताली खटी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)