शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
2
धक्कादायक! डीजेच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
3
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
4
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
5
Viral Video: जीव वाचवण्यासाठी थेट बिबट्याशी भिडला, मजुराचं धाडस पाहून अंगावर येईल काटा! पाहा व्हिडीओ
6
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
7
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
8
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच संपवले
9
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
10
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
11
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
12
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
13
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
14
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
15
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
16
लेख : मेट्रोच्या डब्यात वाढदिवस, लग्ने साजरी होतात, तेव्हा...
17
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
18
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
19
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे

पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत गैरव्यवहार

By admin | Updated: November 22, 2014 00:25 IST

राज्यात सन २०१० पासून पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजना सुरू आहे. कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ६३ ग्रामपंचायतीपैकी प्रथम वर्षाकरिता...

लखमापूर : राज्यात सन २०१० पासून पर्यावरण संतुलित ग्राम समृध्द योजना सुरू आहे. कोरपना पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ६३ ग्रामपंचायतीपैकी प्रथम वर्षाकरिता २४ व दुसऱ्या वर्षाकरिता १४ अशा एकुण ३८ ग्रामपंचायतींची पर्यावरण निधीसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या या ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून १ कोटी ६ लाख रुपयांचे अनुदान निर्गमित करण्यात आले आहे. मात्र यामध्ये अनेक ग्रामपंचायतींनी निधीचा गैरवापर केल्याची माहिती आहे. याबाबत कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने लाचलुचतप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे. सुक्ष्म नियोजनात विविध शासकीय योजनेखाली घ्यावयाच्या कामाचा विकास आराखडा तयार करून वार्डसभेमध्ये मांडणे अभिप्रेत होते. सदर विकास कृती आराखड्याचा मसुदा महिला सभेसमोरही मांडणे गरजेचे होते. त्यानंतर ग्रामसभेद्वारे आराखडा संमत करण्याचे आदेश होते. त्यानंतर ग्रामसभेने मंजुर केलेल्या आराखड्याची तांत्रिक व प्रशासकीयदृष्टया पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करून सदर आराखड्याचे तालुका स्तरावर एकत्रिकरण सुलभरित्या करावयाचे होते. त्यानंतर या प्रक्रियेला सहाय्यभूत ठरलेल्या स्वयंसेवकांना ग्रामपंचायतीने प्रमाणित करून सुक्ष्मनियोजन प्रक्रिया विशिष्ट कालावधीत पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक होते. मात्र योजनेची अंमलबजावणी करताना अशी कारवाई ग्रामपंचायतमार्फत करण्यात आलेली नाही. निधी अंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मंजुरीशिवाय खर्च करण्यात आला आहे. कामाचे मूल्यांकन करून घेण्यात आलेले नाही. मार्गदर्शक तत्वानुसार ग्रामसभेत कामे मंजूर करून त्याकरिता जागेची निवड करून व नंतर त्याची अंदाजपत्रके तांत्रिक अधिकाऱ्यांकडून करून घेऊन त्याला प्रशासकीय मान्यता व तांत्रिक मान्यता प्राप्त करून काम करण्यात आले नसल्याचे समजते. प्राप्त झालेल्या पर्यावरण निधीतून वृक्ष लागवड, संवर्धन, रोपवाटिका, घनकचऱ्याचे व्यवस्थापन, रस्त्यावरील दिवाबत्ती, सौरदिवे आदी कामे घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यासाठी खर्च करण्यापूर्वी मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या तरतुदीनुसार खर्च करणे गरजेचे होते. मात्र काही ग्रामसेवकांनी फायबर कठडे प्रति नग ३५० रुपयांचा खर्च पर्यावरण निधीत दाखविला आहे. त्यासाठी विशिष्ट प्रक्रियेने निविदा प्रक्रिया राबविली नाही. यात ६०:४० याप्रमाणे कामे करण्यात आलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या वर्षासाठी कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायती निधीसाठी पात्र ठरलेल्या नाही. यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. एक कोटी सहा लाख रुपये तालुक्यातील ३८ ग्रमपंचायतीने खर्च करूनही अनेक गावांमध्ये वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, रक्षण व कठडे दिसून येत नाही. तयार करण्यात आलेल्या रोपवटिका गेल्या कुठे, असाही सूर नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे ३ सप्टेंबर २००५ चे परिपत्रकाद्वारे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहार, अपहार व अफरातफरीची रक्कम वसूल करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करणे गरजेचे आहे. मात्र अशी होताना दिसत नाही. सौर पथदिवे महाउर्जाकडील दरकरार क्र. आरसी २०१३-१३/सी.आर-९/ सोलर/ ३३४३ दि. १७ जुलै २०१२ मधील दरकरारानुसार आस्थापित करण्यासाठी एजन्सीची निवड करण्यात आली. त्यानुसार पथदिवे खरेदी करणे बंधनकारक होते. मात्र ग्रामपंचायतीनी नियमबाह्य खरेदी केली आहे. याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघानी एसीबीकडे केली आहे. (वार्ताहर)