शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:28 IST

वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. ...

वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त

चंद्रपूर : मागील काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पेट्रोल-डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रवासी भाड्यामध्येही वाढ झाली आहे.

रिक्त पदे भरण्याची मागणी

चंद्रपूर : विविध शासकीय कार्यालयातील रिक्त पदे भरून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या अनेक वर्षांत अनुकंपातत्त्वावरील पदे भरण्यात आली नाहीत. त्यामुळे अनुकंपाधारकांना अडचण होत आहे. त्यामुळे ही पदेही भरण्याची मागणी केली जात आहे.

बेरोजगारांमध्ये निराशा

चंद्रपूर : काही वर्षांपासून नोकरभरती झाली नसल्याने बेरोजगारांमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यातच विविध बँकांकडून सहजासहजी कर्जच मिळत नसल्याने त्यात भर पडत आहे. काही तालुक्यांमध्ये उद्योग नसल्याने युवकांमध्ये निराशा पसरत आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

उघड्यावरील अन्नपदार्थांकडे दुर्लक्ष

चंद्रपूर : सध्या पावसाचे दिवस सुरू आहे. त्यातच शहरात अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थांची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानांची तपासणी करताना चालढकल केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

चंद्रपूर : शहरातील अनेक प्रभागांत मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. रात्री पाठलाग करण्याच्या घटना वाढू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. यासोबतच पठाणपुरा, हॉस्पिटल वाॅर्ड, रामनगर आदी परिसरातही मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. महानगरपालिकेने विशेष पथक पाठवून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे़.

बाबू पेठमधील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य

चंद्रपूर : बाबू पेठ परिसरातील अनेक भागातील पथदिवे बंद राहतात. त्यामुळे या परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. येथील नागरिकांनी अनेकदा याबाबत तक्रार केली. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देऊन समस्या सोडवावी, अशी मागणी आहे.

--

ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती करावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गावखेड्यातील रस्त्यांची थातूरमातूर कामे केल्याने दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. त्यामुळे ये-जा करणाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय, अपघाताच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.

जनावरांना टॅग लावण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवरच उदरनिर्वाह करतात. आता दुधाळ जनावरांचे पालन करण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व जनावरांना टॅग लावून नोंदणी करावी, अशी मागणी पशुपालकांनी केली आहे.

रोजगाराला चालना द्यावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने तालुकास्तरावर जागा उपलब्ध करून दिली. मात्र, काही तालुक्यात उद्योगाचा पत्ता नाही. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारांची संख्या वाढत असून स्थानिक युवकांना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. सिंदेवाही, नागभीड तालुक्यात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. मात्र, धानावर आधारित उद्योग नसल्याने युवकांच्या हाताला काम मिळत नसल्याची स्थिती आहे.