शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
2
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
3
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
4
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
5
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
6
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन
7
Priyanka Gandhi : Video - प्रियंका गांधींनी का मागितली अभिनेत्री आलिया भटची माफी?, टॅग करून म्हणाल्या...
8
"स्मिता पाटीलच्या मृतदेहावर मी मेकअप करत होतो आणि डोळ्यातून...", अभिनेत्रीच्या मेकअप आर्टिस्टचा खुलासा
9
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर
10
सोनं जोमात... ग्राहक कोमात...! एवढं सुसाट सुटलंय की थांबायचं नाव नाही; विक्रमी पातळीवर पोहोचलंय, जाणून घ्या आपल्या शहरातील लेटेस्ट रेट
11
भारत डिजिटल तंत्रज्ञानाचा 'पॉवरहाऊस', ‘Make in India’ची खिल्ली उडवणाऱ्यांना PM मोदींचे उत्तर
12
Google भारतात करणार ८८,७०० कोटींची गुंतवणूक, 'या' राज्यात उभं राहणार आशियातील सर्वात मोठं डेटा सेंटर
13
म्यानमारमध्ये धार्मिक कार्यक्रमादरम्यान पॅराग्लायडरने बॉम्ब हल्ला; २४ जणांचा मृत्यू, ४७ जखमी
14
Nashik Crime: कंटाळलो होतो म्हणून आईची हत्या केली, पोटच्या मुलानेच घेतला जीव; पोलिसही हादरले
15
अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
16
सैफ अली खानची एक्स पत्नी अमृता सिंहसोबत कसं होतं नातं? बहीण सोहा म्हणाली, "आम्ही दोघी..."
17
भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्धाचे सावट?; पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांची पोकळ धमकी
18
८४ वर्षांनी नवपंचम नीचभंग राजयोग: ८ राशींचे कल्याण, सरकारी लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-मंगल!
19
तुमच्याकडे असलेलं १० रूपयांचं नाणं खरं की खोटं?; RBI नं सांगितलं सत्य, वाचा काय आहे प्रकार?
20
सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा

विद्युत खांब अद्यापही महामार्गावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST

नागभीड : नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन आता दीड वर्षाचे वर कालावधी होत असला तरी विद्युत पोल ...

नागभीड : नागभीड-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होऊन आता दीड वर्षाचे वर कालावधी होत असला तरी विद्युत पोल मात्र अद्याप महामार्गावरच आहेत. पोल रस्त्यावरच असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. उल्लेखनीय बाब ही की, येथील जुना बसस्थानक ते टी पाईंट चौक या वर्दळीच्या ठिकाणीच हे विद्युत खांब उभे आहेत.

नागभीड-आरमोरी हा पूर्वी राज्य महामार्ग होता. हा राज्यमार्ग रूंदीने लहान होता. विद्युत वितरण कंपनीनेही राज्य महामार्गाच्या नियमानुसार अंतर राखून विद्युत पोल लावले होते. मात्र आता या राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आहे. राज्य महामार्गाच्या तुलनेत राष्ट्रीय महामार्गाची रूंदी वाढल्यामुळे हे विद्युत खांब आता रस्त्यावर आले आहेत.

उमरेड आरमोरी या राष्ट्रीय महामार्गातील नागभीड आरमोरी या टप्प्याचे काम दीड वर्षापूर्वीच पूर्ण झाले. काम पूर्ण झाल्यानंतर हे पोल हटविण्यात येतील अशी नागरिकांची अपेक्षा होती.मात्र हे पोल आताही तसेच आहेत. विशेष म्हणजे नागभीड नगर परिषदेतच समाविष्ट असलेल्या सुलेझरीपासून समोर ब्रम्हपुरीकडे जाणाऱ्या याच राष्ट्रीय महामार्गावरील विद्युत खांब हटवून ते सुरक्षित अंतरावर लावण्यात आले आहेत. मात्र ऐन वर्दळीच्या असलेल्या येथील जुना बसस्थानक ते टी पाईंट चौकापर्यंत जे खांब लावण्यात आले आहे ते अद्यापही ''''''''जेसे थे'''''''' आहेत.

दरम्यान यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता संबंधित विभागाने या महामार्गाचा अंदाजपत्रक बनवतेवेळी जुना बसस्थानक ते टी पाईंटचौकपर्यंतच्या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याच्या बाबीचा उल्लेख अंदाजपत्रकात केला नव्हता अशी माहिती दिली. बाकी सर्व रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.

रस्त्यावरील विद्युत खांबांमुळे एखादेवेळेस अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने आता या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करणारी कंपनीने येथून गाशा गुंडाळला असला तरी या रस्त्याचे देखभाल करण्यासाठी एक युनिट नेहमीच सक्रिय आहे. येथील नगर परिषदेने संभाव्य धोका टाळण्यासाठी हे विद्युत खांब हटविण्यासंदर्भात पाठपुरावा करावा अशी मागणी होत आहे.