शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

विजेअभावी ई-लर्निंग संच पडले धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:07 IST

शासनाने शाळा डिजिटल करण्यासाठी गतवर्षी शाळांना ई-लर्निंग संच पुरविले. या संचामध्ये काही शाळांना मोठ्या सिक्रनचा पडदा तर काही शाळांना स्मार्ट टीव्ही व त्यासाठी इतर साहित्य देण्यात आले.

ठळक मुद्देसीमेवरील इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेची स्थिती : महाराष्ट्राच्या वीज सेवेपासून गाव वंचित

संघरक्षित तावाडे।आॅनलाईन लोकमतजिवती : शासनाने शाळा डिजिटल करण्यासाठी गतवर्षी शाळांना ई-लर्निंग संच पुरविले. या संचामध्ये काही शाळांना मोठ्या सिक्रनचा पडदा तर काही शाळांना स्मार्ट टीव्ही व त्यासाठी इतर साहित्य देण्यात आले. यामाध्यमातून विद्यार्थी ई-लर्निंगचे धडे घेत, दृक, श्राव्य साधणाचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होईल, असा शासनाचा हेतू होता. मात्र महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील इंदिरानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ई-लर्निंग शिक्षणाला अपवाद ठरत आहे.इंदिरानगर गावात महाराष्ट्र राज्याकडून विद्युत पुरवठा झालेला नाही. इंदिरानगर हे गाव तसे दोन्ही राज्यात येते. या गावाला महाराष्ट्रासोबत तेलंगणाच्याही सुविधा मिळतात. येथे ५५ घरांची वस्ती असून महाराष्ट्राची जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेत एक ते पाच वर्ग असून ३६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुका मुख्यालयापासून शाळा लांब अंतरावर असली तरी येथील शिक्षक दररोज शाळेत हजर राहून विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत.गतवर्षी मे महिन्यात विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे मिळावे, या हेतूने जिल्हा परिषदेकडून संच देण्यात आले. मात्र गेल्या नऊ महिन्यापासून शाळेला विजेची प्रतीक्षा करावी लागत आहे. भिंतीला पडद्याची स्क्रिन लावून आहे. सर्व सेट तयार आहे. पण गावातच वीज नाही, त्यामुळे ई-लर्निंगचे संच कुचकामी ठरत आहे. दोन वर्षांपासून महाराष्ट्राने केवळ खांब उभे केले आहेत. पण विजेचा पुरवठा झाला नाही. तर दुसरीकडे गावात तेलंगणाची वीज आहे. पण महाराष्ट्राची शाळा असल्याने वीज देण्यास त्यांनी नकार दिल्याचे शिक्षकांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने गावात विजेचा पुरवठा करावा, अशी मागणी शिक्षक व पालकांनी केली आहे.सीमावादात अडकली वीज सेवाइंदिरानगर हे गाव तेलंगणा व महाराष्ट्र राज्यात असून वादग्रस्त १४ गावापैकी एक गाव आहे. येथे दोन्ही राज्याच्या सुविधा असून गेल्या अनेक वर्षांपासून येथे तेलंगणाची वीज सेवा सुरू आहे. दोन वर्षापुर्वी महाराष्टÑ सरकारने येथे खांब उभे केले. मात्र वीज पुरवठा नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.एकाच खोलीत भरतात पाच वर्गइंदिरानगर येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्ग असले तरी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी केवळ एकच वर्गखोली आहे. वाढीव खोलीसंदर्भात येथील शिक्षक, केंद्रप्रमुख पाठपुरावा करीत आहेत. पण शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.शाळेला वीज मिटर देण्यासंदर्भात आपण वरिष्ठ अधिकारी व वीज कंपनीच्या अधिकाºयांशी वारंवार बोललो आहे. पण गावात वीज नसल्याने ई-लर्निंग संच बंद आहे. वीज कंपनीने याची दखल घेऊन वीज पुरवठा सुरू केल्यास नक्कीच विद्यार्थ्यांना ई-लर्निंगचे धडे देता येईल.- ए. बी. चव्हाण, शिक्षक, इंदिरानगर.