शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

५८ गावांमध्ये उर्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 23:31 IST

जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये ऊर्र्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून विजेशी निगडीत मूलभूत स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये सीएफएल दिवे, विद्युत उपकरणे, ऊर्जा कार्यक्षम, एलईडी पथदिवे आदी विविध सुविधा देऊन गावे प्रकाशमान केली जाणार आहेत.

ठळक मुद्देदर्जेदार विद्युत सुविधा मिळणार : प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर महाराष्ट्रात लागू होणार

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये ऊर्र्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार असून विजेशी निगडीत मूलभूत स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये सीएफएल दिवे, विद्युत उपकरणे, ऊर्जा कार्यक्षम, एलईडी पथदिवे आदी विविध सुविधा देऊन गावे प्रकाशमान केली जाणार आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.ऊर्जा विभागाच्या वतीने राज्यभरात अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा आराखडा तयार करण्यात आला. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा देत असताना गावखेड्यांतील सार्वजनिक विद्युत व्यवस्था उत्तम राहावी, यासाठी ऊर्जा संवर्धन प्रकल्प राबविण्याची घोषणा सरकारने केली होती. प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील ५८ गावांची निवड करण्यात आली. हा पथदर्शी प्रकल्प महाऊर्जामार्फत राबविण्यात येणार आहे. एलईडी पथदिव्यासंह विविध सुविधा दिल्या जात असल्याने ऊर्जार्र्र्र् संवर्धन प्रकल्पातून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, असा दावा सरकारने केला. प्रकल्पासाठी ५३.२५ कोटी रूपयांची गरज असल्याचे अभ्यास समितीने सरकारला सांगितले होते.मागील आठवठ्यात विधिमंडळामध्ये पुरवणी मागण्या सादर करून ही रक्कम मंजूर करण्यात आली. राज्य शासनाने जिल्ह्यातील ५८ गावांची यादी अद्याप जाहीर केली नाही. परंतु, राजुरा, जिवती, कोरपना, गोंडपिपरी, बल्लारपूर व मूल तालुक्यातील दुर्गम गावांचा प्रकल्पासाठी विचार केला जाणार आहे, अशी माहिती सूत्राने दिली. निवड झालेल्या गावांमध्ये विद्युत विभागाची सर्व पायाभूत कामे पूर्ण करून वीजपुरवठा केला जणार आहे. राज्यातील हा नावीन्यपूर्ण प्रकल्प असून महाऊर्जा विभागाचे एक पथक जिल्ह्याचा सूक्ष्म आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.‘त्या’ गावांमध्ये भूमिगत वायरींग करणारऊर्जा संवर्धन पथदर्शी प्रकल्पासाठी निवड झालेल्या जिल्ह्यातील ५८ गावांमध्ये भूमिगत वायरिंग करण्यात येणार आहे. सीएफएल दिवे, विद्युत उपकरणे, ऊर्जा कार्यक्षम, एलईडी पथदिवे व अन्य दर्जेदार साधने वापरून गावकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा केला जाणार आहे. प्रकल्पाच्या कामात तांत्रिक अडचणी निर्माण होवू नये, यासाठी जिल्हास्तरावर विशेष कक्ष तयार करून तज्ज्ञांची नियुक्ती केली जाईल. ही योजना यशस्वी झाल्यानंतर राज्यात लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे संबंधीत यंत्रणा कामाला लागली आहे.सर्वेक्षणाला सुरुवातया प्रकल्पासाठी जिल्ह्यातील ५८ गावांची निवड झाल्याने महाऊर्जामार्फत सर्वेक्षण केले जात आहेत. वीज वितरण कंपनीतील तज्ज्ञांच्या मदतीने नियोजन सुरू असून हा प्रकल्प विहित कालावधीत पूर्ण व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले. काही दिवसांत आराखडा जाहीर होईल.