शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

कोरपना ते गडचांदूर मार्गाची दयनिय अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST

कोरपना ते गडचांदूर या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी मोठ - मोठे खड्डे पडले आहे. या मार्गावरून तारेवरची कसरत ...

कोरपना ते गडचांदूर या २० किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी मोठ - मोठे खड्डे पडले आहे. या मार्गावरून तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागते आहे. सदर मार्ग हा जिल्ह्यातील अत्यंत वर्दळीच्या मार्गांपैकी एक आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर त्वरित चौपदरीकरण होणे आवश्यक होते. मात्र महामार्ग घोषित होऊन तीन वर्ष लोटूनही केवळ डागडुजीच केली जात आहे. यातच रस्त्याच्या बाजूच्या कडाही दबल्या आहे. यामुळे रात्रीचा प्रवास जोखमीचा बनला आहे. रस्त्यावरील डांबरही उखडले आहे. त्यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य झाले आहे. परिणामी आजूबाजूच्या शेतातील पिके काळवंडली आहे. वाहतूकदारांना त्वचा व श्वसनाचे आजार होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत सुरू असलेले कामही थातुर-मातूर पद्धतीने होत असल्याने रस्त्याची अल्पावधीतच दुरावस्था होण्याची चिन्हे आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अभियंत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

--

दिशादर्शक फलकाचा अभाव

कोरपना ते गडचांदूर मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक, अंतर, वळण रस्ते, गाव फलक नसल्याने नवीन व्यक्तींची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे या मार्गावर फलक लावावे, अशी मागणी वाहतूकदारांकडून होत आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. यातच राज्य सीमेवरीलही सीमा स्वागत फलक रस्त्याच्या बाजूला पडलेला आहे. त्याचीही दुरुस्ती चार वर्षे लोटूनही झाली नाही.

वाहतुकीचा खोळंबा

या मार्गाची दुरावस्था झाल्याने वाहतूकदारांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहे. यातच रस्त्याच्या मधोमध बऱ्याच ठिकाणी खोदकाम केले असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तासनतास वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.