शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
4
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
5
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
6
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
7
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
8
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
9
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
10
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
11
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
12
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
13
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
14
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
15
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
16
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
17
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
18
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
19
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
20
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?

तलाव, नदी परिसर स्वच्छ

By admin | Updated: September 10, 2016 00:52 IST

जिल्हाभरात ५ सप्टेंबरला गणरायाची स्थापना मोठ्या हर्षोउल्हासात करण्यात आली.

जनजागृती : ठिकठिकाणी कृत्रिम तलावांचीही व्यवस्थाचंद्रपूर : जिल्हाभरात ५ सप्टेंबरला गणरायाची स्थापना मोठ्या हर्षोउल्हासात करण्यात आली. चंद्रपूर शहरात सुमारे साडेतीनशे सार्वजिनक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. यासोबत हजारो नागरिकांनीही श्रींची स्थापना केली आहे. गणपतीस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीपासून विसर्जनाला सुरूवात झाली आहे. मात्र यावेळी जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी निर्माल्य कुंड व कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. यासोबत इरई नदी घाट व रामाळा तलावाचा तटही स्वच्छ केला असून पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन सातत्याने विसर्जनव्यवस्थेकडे लक्ष ठेवून आहेत.६ सप्टेंबरपासूनच घरघुती गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग सज्ज झाला आहे. यावेळी जलप्रदूषण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मनपाच्या वतीने २० ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे तर चौकाचौकात निर्माल्य कुंड उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय सात ठिकाणी मार्गदर्शक मचानी उभारण्यात येणार आहेत. तसेच पोलीस विभागाने विसर्जनस्थळी तात्पुरती चौकी स्थापन केली आहे. चंद्रपूर शहरातील गणपतीचे विसर्जन मुख्यत: रामाळा तलाव, इरई नदीवर केले जाते. गणपतीचे विसर्जन केल्यानंतर या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. मूर्तीचे सांगाडे, माती, रासायनिक रंग, निर्माल्य, यामुळे नदी व तलावातील पाणी प्रदूषित होते. याचा फटका जलचर प्राण्यांनाही बसतो. या यंदा हा प्रकार टाळण्यासाठी मनपातर्फे पूर्वतयारी करण्यात आली आहे. मनपाच्या वतीने तलावाची व्यवस्थित स्वच्छता केली आहे. तलावात उतरण्यासाठी असलेल्या ओट्याचीसुद्वा व्यवस्थित स्वच्छता केली आहे. तलावाच्या शेजारीच निर्माल्य कुंड व कुत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. तलाव भोवती बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. भक्तासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस विभागाने विसर्जनाच्या वेळेस शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी तलावाच्या शेजारी पोलीस चौकी निर्माण केली असून या ठिकाणी पोलीस शिपाई दिवसभर तैनात असतात.विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने या ठिकाणी नियंत्रण व मार्गदर्शनपर मचानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच विसर्जनाच्या वेळीस मच्छिमार संस्था, सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचेसुद्धा सहकार्य लाभणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आपातकालीन व्यवस्थाही करण्यात आली आहे.