शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

तलाव, नदी परिसर स्वच्छ

By admin | Updated: September 10, 2016 00:52 IST

जिल्हाभरात ५ सप्टेंबरला गणरायाची स्थापना मोठ्या हर्षोउल्हासात करण्यात आली.

जनजागृती : ठिकठिकाणी कृत्रिम तलावांचीही व्यवस्थाचंद्रपूर : जिल्हाभरात ५ सप्टेंबरला गणरायाची स्थापना मोठ्या हर्षोउल्हासात करण्यात आली. चंद्रपूर शहरात सुमारे साडेतीनशे सार्वजिनक गणेश मंडळांनी गणेशाची स्थापना केली आहे. यासोबत हजारो नागरिकांनीही श्रींची स्थापना केली आहे. गणपतीस्थापनेच्या दुसऱ्या दिवशीपासून विसर्जनाला सुरूवात झाली आहे. मात्र यावेळी जलप्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी निर्माल्य कुंड व कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे. यासोबत इरई नदी घाट व रामाळा तलावाचा तटही स्वच्छ केला असून पोलीस विभाग व जिल्हा प्रशासन सातत्याने विसर्जनव्यवस्थेकडे लक्ष ठेवून आहेत.६ सप्टेंबरपासूनच घरघुती गणपतीचे विसर्जन करण्यात येत आहे. गणपती विसर्जनाच्या तयारीसाठी चंद्रपूर महानगरपालिका, पोलीस विभाग सज्ज झाला आहे. यावेळी जलप्रदूषण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन व मनपा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मनपाच्या वतीने २० ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे तर चौकाचौकात निर्माल्य कुंड उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय सात ठिकाणी मार्गदर्शक मचानी उभारण्यात येणार आहेत. तसेच पोलीस विभागाने विसर्जनस्थळी तात्पुरती चौकी स्थापन केली आहे. चंद्रपूर शहरातील गणपतीचे विसर्जन मुख्यत: रामाळा तलाव, इरई नदीवर केले जाते. गणपतीचे विसर्जन केल्यानंतर या ठिकाणी अस्वच्छता निर्माण होते. मूर्तीचे सांगाडे, माती, रासायनिक रंग, निर्माल्य, यामुळे नदी व तलावातील पाणी प्रदूषित होते. याचा फटका जलचर प्राण्यांनाही बसतो. या यंदा हा प्रकार टाळण्यासाठी मनपातर्फे पूर्वतयारी करण्यात आली आहे. मनपाच्या वतीने तलावाची व्यवस्थित स्वच्छता केली आहे. तलावात उतरण्यासाठी असलेल्या ओट्याचीसुद्वा व्यवस्थित स्वच्छता केली आहे. तलावाच्या शेजारीच निर्माल्य कुंड व कुत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली आहे. तलाव भोवती बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. भक्तासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पोलीस विभागाने विसर्जनाच्या वेळेस शांतता व सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी तलावाच्या शेजारी पोलीस चौकी निर्माण केली असून या ठिकाणी पोलीस शिपाई दिवसभर तैनात असतात.विसर्जन सोहळा शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने या ठिकाणी नियंत्रण व मार्गदर्शनपर मचानी उभारण्यात आल्या आहेत. तसेच विसर्जनाच्या वेळीस मच्छिमार संस्था, सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचेसुद्धा सहकार्य लाभणार आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आपातकालीन व्यवस्थाही करण्यात आली आहे.