शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पोलिसांचे काम आरोपींमध्ये धाक कायम राहील असे हवे

By admin | Updated: October 13, 2016 02:19 IST

आरोपींवरील दोष सिध्दीचे प्रमाण पूर्वी केवळ १० टक्के होते. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण ५१ टक्यांवर पोहोचले आहे.

सुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर पोलीस ठाणे इमारतीचे भूमिपूजनचंद्रपूर : आरोपींवरील दोष सिध्दीचे प्रमाण पूर्वी केवळ १० टक्के होते. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण ५१ टक्यांवर पोहोचले आहे. एकही आरोपी निर्दोष सुटता कामा नये, यादृष्टीने दोष सिध्दीसाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. न्यायव्यवस्था तसेच पोलिसांबद्दल आरोपींमध्ये धाक बसण्यासाठी हे प्रमाण वाढणे आवश्यक असून पोलिस विभागाबद्दल सज्जनांना मैत्री व दुर्जनांना भीती वाटेल, असे काम पोलिस विभागाचे असावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथे १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या पोलीस ठाणे व २४ निवासस्थानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय धोटे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, नगराध्यक्ष छाया मडावी, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक जयचंद काठे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, राजेंद्र मालपाणी आदी उपस्थित होते.बल्लापूर येथे नव्याने होत असलेली इमारत केवळ विटा, सिमेंट, मातीची असू नये तर सामान्यांना चांगली सेवा देणारी तसेच वाईट प्रवृत्तींना आळा घालणारी असावी, पोलीस विभागास अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना चांगली निवासस्थाने देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. चंद्रपूर येथे १०२ कोटी रुपये खर्च करून पोलिसांची चांगली वसाहत निर्माण होत आहे. जिल्ह्यात दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर झाली असून दुगार्पुर पोलीस स्टेशनच्या इमारतीची प्रशासकीय मान्यता झाली आहे. चंद्रपूर येथे पोलिसांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बांधली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाणी यांनी प्रास्ताविक केले. संचालन पोलीस अधिकारी विकास मुंढे यांनी तर आभार बल्लारपूरचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)ही कामे प्रस्तावित बसस्थानकाचे नुतनीकरण, उपविभागीय कार्यालयाचे बांधकाम, स्टेडीयम, बॅटनिकल गार्डन ही कामे बल्लारपुरात होऊ घातली आहेत. शहरातील शाळा अत्याधुनिक होणार असून टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रोजगाराचा आराखडा तयार केला जात आहे. नाट्यगृहही लवकरच होणार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार असल्याचे ते म्हणाले.