शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

पोलिसांचे काम आरोपींमध्ये धाक कायम राहील असे हवे

By admin | Updated: October 13, 2016 02:19 IST

आरोपींवरील दोष सिध्दीचे प्रमाण पूर्वी केवळ १० टक्के होते. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण ५१ टक्यांवर पोहोचले आहे.

सुधीर मुनगंटीवार : बल्लारपूर पोलीस ठाणे इमारतीचे भूमिपूजनचंद्रपूर : आरोपींवरील दोष सिध्दीचे प्रमाण पूर्वी केवळ १० टक्के होते. गेल्या दोन वर्षात हे प्रमाण ५१ टक्यांवर पोहोचले आहे. एकही आरोपी निर्दोष सुटता कामा नये, यादृष्टीने दोष सिध्दीसाठी यंत्रणा कार्यरत झाली आहे. न्यायव्यवस्था तसेच पोलिसांबद्दल आरोपींमध्ये धाक बसण्यासाठी हे प्रमाण वाढणे आवश्यक असून पोलिस विभागाबद्दल सज्जनांना मैत्री व दुर्जनांना भीती वाटेल, असे काम पोलिस विभागाचे असावे, असे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर येथे १० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या पोलीस ठाणे व २४ निवासस्थानाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय धोटे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीष शर्मा, नगराध्यक्ष छाया मडावी, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत, पोलीस उपअधीक्षक जयचंद काठे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, राजेंद्र मालपाणी आदी उपस्थित होते.बल्लापूर येथे नव्याने होत असलेली इमारत केवळ विटा, सिमेंट, मातीची असू नये तर सामान्यांना चांगली सेवा देणारी तसेच वाईट प्रवृत्तींना आळा घालणारी असावी, पोलीस विभागास अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले जात आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांना चांगली निवासस्थाने देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. चंद्रपूर येथे १०२ कोटी रुपये खर्च करून पोलिसांची चांगली वसाहत निर्माण होत आहे. जिल्ह्यात दोन नवीन पोलिस ठाणे मंजूर झाली असून दुगार्पुर पोलीस स्टेशनच्या इमारतीची प्रशासकीय मान्यता झाली आहे. चंद्रपूर येथे पोलिसांसाठी अत्याधुनिक व्यायामशाळा बांधली जात असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. पोलीस अधीक्षक संदीप दिवाणी यांनी प्रास्ताविक केले. संचालन पोलीस अधिकारी विकास मुंढे यांनी तर आभार बल्लारपूरचे ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)ही कामे प्रस्तावित बसस्थानकाचे नुतनीकरण, उपविभागीय कार्यालयाचे बांधकाम, स्टेडीयम, बॅटनिकल गार्डन ही कामे बल्लारपुरात होऊ घातली आहेत. शहरातील शाळा अत्याधुनिक होणार असून टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रोजगाराचा आराखडा तयार केला जात आहे. नाट्यगृहही लवकरच होणार आहे. या शहराच्या सर्वांगिण विकासाठी आपला नेहमीच पुढाकार राहणार असल्याचे ते म्हणाले.