लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी पोलिस कर्मचारी मागील तीन आठवड्यांपासून रस्त्यावर तळ ठोकून आपले कर्तव्य बजावत आहेत. सर्वसामान्य नागरिक कुटुंबासमवेत असताना दुसरीकडे पोलीस कर्मचारी मात्र स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून शहरातील चौकाचौकात खडा पहारा देत आहे.२३ मार्चपासून संचारबंदी सुरु झाली आणि खऱ्या अर्थाने पोलिसांची जबाबदारी वाढली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प ठेवून कोरोना संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. या काळात नागरिकांना घरातच थांबणे बंधणकारक केले आहे. नागरिकांना या विषणूचा संसर्ग होऊ नये, या उद्देशाने पोलीस कर्मचारी मात्र, रस्त्या-रस्त्यावर तळ ठोकून आहेत. कधी विनंती करून, कधी समज देवून तर कधी कठोर बनत नागरिकांच्या हितासाठी पोलीस कर्मचारी अखंडितपणे कर्तव्य पार पाडत आहे. चंद्रपूर शहराचा विचार केल्यास जटपुरा गेट, इंदिरा गांधी चौक, बसस्थानक, बंगाली कॅम्प, वडगाव, पडोली, पठाणपुरा, मिलन चौक, दाताळा रोड, मूल रोड आदी चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ग्रामीण भागातही पोलीस कर्मचारी दिवसभर गस्त घालत नागरिकांकडे लक्ष देत आहेत.पोलिसांना सहकार्य करणे गरजेचेपोलीस कर्मचाऱ्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेतली आहे. सर्वच कर्मचाºयांना मास्कचे वाटप केले आहे. सॉनिटायझरही वाटप केले आहे. पोलीस प्रशासन कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत नागरिकांच्या आरोग्यासाठी प्रयत्न करीत असून नागरिकांनी घरात थांबून पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिसांचा खडा पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 05:00 IST
२३ मार्चपासून संचारबंदी सुरु झाली आणि खऱ्या अर्थाने पोलिसांची जबाबदारी वाढली. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प ठेवून कोरोना संसर्ग होऊ नये याची काळजी घेतली जात आहे. या काळात नागरिकांना घरातच थांबणे बंधणकारक केले आहे. नागरिकांना या विषणूचा संसर्ग होऊ नये, या उद्देशाने पोलीस कर्मचारी मात्र, रस्त्या-रस्त्यावर तळ ठोकून आहेत.
नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिसांचा खडा पहारा
ठळक मुद्देकोरोना दहशत : वीस दिवसांपासून सतत कर्तव्यावर