शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर फिरल्यास पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे राजेश मोहिते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. कोरोना विषाणूचा प्रसार हा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपकार्तून होत असतो. ही गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू झाली आहे. रस्त्यावर गर्दी अथवा फिरताना दिसल्यास त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. संकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहततील.जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी सर्व विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपाचे राजेश मोहिते ,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत आदींसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.जिल्ह्यात विदेशातून आलेल्या ४ नागरिकांना निगराणी ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केलेल्या ८ नागरिकांना उत्तम आरोग्यानंतर धोक्याबाहेर सांगण्यात आले. आणखी ६ नव्याने विदेशातून आलेल्या नागरिकांना कॉरेन्टाईन करण्यात आले आहे. पुणे,मुंबई व इतर जिल्ह्यातून आलेले नागरिक होम कॉरेन्टाईन करण्यात आलेले आहेत. यापैकी काही प्रवाशांच्या हातावर स्टॅम्प मारण्यात आले आहे. त्यांना केवळ पुढील १४ दिवस काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्या पद्धतीची लक्षणे दिसल्यास आरोग्य यंत्रणेची मदत घेणे अनिवार्य आहे. मात्र स्वत:ला धोक्यात समजण्याचे कारण नाही, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.स्टॅम्प मारले म्हणजे कोरोनाचे रूग्ण नव्हेपरदेशातून तसेच पुणे,मुंबई या ठिकाणाहून आलेल्या नागरिकांची संपूर्ण माहिती प्रशासनाकडे आहे. या सर्वांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे व होम कॉरेन्टाईनचा शिक्का मारण्यात येत आहे. अशा व्यक्तींनी कुठेही न जाता त्यांनी १४ दिवस घरातच स्वतंत्र खोलीमध्ये राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागामध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अंतर्गत गृहभेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. या गृहभेटी आशा,अंगणवाडीसेविका यांच्यामार्फत देण्यात आल्या. दोन दिवसात ग्रामीण भागात सर्व तालुक्यामध्ये २ हजार ६६६ नागरिकांची नोंद घेण्यात आली. विदेशातून बाहेरून आलेले अन्य राज्यातून आलेले सर्व नागरिक यामध्ये आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या