शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

लोकहभागातून दारूबंदी शक्य -नियती ठाकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:05 IST

दारुबंदीसाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून गुन्हेगारीला पायबंध घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

ठळक मुद्देमूूल येथे पार पडली बैठक : गावातील पुढाºयांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : दारुबंदीसाठी पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलली असून गुन्हेगारीला पायबंध घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. दारुबंदी ही केवळ पोलिसांची जवाबदारी नसून जनतेचे सहकार्य देखील महत्त्वाचे आहे. गणेशोत्सव व ईद या सणाचे औचित्य साधून जिल्ह्यात जवळपास १०० तडीपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून जिल्ह्यात शांततेत उत्सव साजरे व्हावे, ही आपली भूमिका असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केले.मूल येथील एका खासगी मंगल कार्यालयात आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत, नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, पं.स. सभापती पूजा डोहणे, उपविभागीय अधिकारी राजेश सरवदे, नायब तहसीलदार पी. व्ही. कोमलवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, माजी सभापती संजय मारकवार आदी उपस्थित होते.यावेळी पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी जिल्ह्यात ४० कोटींची दारु मुद्देमालासह जप्त झाली असून निव्वळ दारु २० कोटी रुपयांची आहे. दारुबंदी ते व्यसनमुक्ती हे प्रबोधनात्मक काम करण्याचा प्रयत्न असणार आहे. दारुबंदीसाठी पोलीस प्रशासनाबरोबरच राज्य उत्पादक शुल्क, गावातील लोकप्रतिनिधीची देखील तेवढीच जबाबदारी असल्याचे सांगितले.याप्रसंगी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, उपविभागीय अधिकारी राजेश सरवदे, प्रा. चंद्रकांत मनियार, प्राचार्य अजाबराव वानखेडे यांनी मत व्यक्त केले. प्राचार्य वानखेडे यांनी गणेश उत्सवात चिनी मालावर बहिष्कार टाकून स्वदेशी माल खरेदी करण्याचे आवाहन केले. गावात शांतता राहावी यासाठी न्यायालयात ठरवून दिलेल्या आदेशाचे पालन काटेकोरपणे करण्याचे आवाहन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे यांनी प्रास्ताविकातून केले.कार्यक्रमाचे संचालन मूल तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे तर उपस्थितांचे आभार पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी मानले. याप्रसंगी मूल पोलीस उपविभागाअंतर्गत येणाºया मूल, सावली, पोंभुर्णा, सिंदेवाही, पाथरी येथील पोलीस प्रमुख, पोलीस पाटील मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, मूलचे न.प. पदाधिकारी, नगरसेवक, व्यापारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.