शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

रत्नापुरातील नळयोजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:58 IST

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देबंधारा कोरडा : जलशुद्धीकरण केंद्र अवघ्या तीन महिन्यातच बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो. यासाठी नदीमध्ये दोन विहीरींचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीला पाणी पुरवठा करून नंतर मोटरपंपाच्या सहाय्याने पाईपलाईन व्दारे पाण्याचा टॉकीला पाणी पुरवठा होतो. रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत आठ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे.पिण्याचे पाणी सर्वांना सुलभ मिळावे यासाठी चार पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या चारही पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी एकाच पाईप लाईनचा उपयोग केला जातो. दरवर्षी पाण्याची समस्या गंभीर होत आहे. यावर्षी पाण्ी समस्या मागील महिण्यापासून अधिकाच गंभीर बनली असून दोन-चार दिवसातून एखाद्या दिवशी पाणी नळाला पाणी येते. अनेकवेळा ती बंदच असते. गावामध्ये गोळ पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्यामुळे या नळाच्या पाण्यावरच नागरिकांवर अवलंबून रहावे लागते. गावामध्ये हातपंप, विहिरी आहेत. पण गोड पाणी कुठेही नाही.येथील विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने समस्या आणखीच बिकट झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नळयोजनेला पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी सात- आठ वर्षांपूर्वी उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. मात्र, ग्रामपंचायतीचे या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील शेतकरी याच बंधाºयातील पाणी मोटारपंपाद्वारे घेऊन शेतीसिंचन करतात. यावर्षी सुध्दा तेच झाले आणि मार्च महिन्यातच बंधारा कोरडा पडला. त्यातच नदीतील पाण्याची पातळी खालावली आणि नळयोजनेसाठी जलसाठा कमी पडल्याने येथे पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकाच गंभीर झाली आहे.पाण्याची समस्या लक्षात घेऊन रत्नापूर ग्रामपंचायतीने पुन्हा एका विहिरीची मागणी केली. ती मागणी यावर्षीच मंजूर झाली. परंतु बांधकाम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. ‘तहान लागली खोद विहीर’ या म्हणीप्रमाणे ज्यावेळी टंचाई निर्माण झाली तेव्हा या विहिरीच्या बांधकामाला सुरूवात केली असती तर कदाचित दोन महिन्यापूर्वी या विहिरीचे बांधकाम झाले असते आणि आता नळाला व्यवस्थित पाणी आले असते. मात्र तसे झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायत प्रशासन, तालुका प ्रशासनाने या समस्याकडे यापूर्वीच लक्ष दिले असते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसती. मात्र याकडे संबंधितांना दुर्र्लक्ष केल्याने आता पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन भटकण्याची वेळ आली आहे.टँकरच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्षगावातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊ न ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचे टँंकर मिळावे, यासाठी तहसीलदार, संवर्गविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाकडे मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कुणीही याकडे लक्ष दिले नाही.गावात गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ असतानाही अधिकारी टँकर पुरवठा करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. किमान टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई