शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

रत्नापुरातील नळयोजना ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:58 IST

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे. रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो.

ठळक मुद्देबंधारा कोरडा : जलशुद्धीकरण केंद्र अवघ्या तीन महिन्यातच बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील नळ योजना काही अंशी ठप्प झाल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ येथील नागरिकांवर आली आहे.रत्नापूर येथील नळयोजनेला शिवणीपासून जवळच असलेल्या उमानदीवरून पाणी पुरवठा होतो. यासाठी नदीमध्ये दोन विहीरींचे बांधकाम करण्यात आले आहे. विहिरीला पाणी पुरवठा करून नंतर मोटरपंपाच्या सहाय्याने पाईपलाईन व्दारे पाण्याचा टॉकीला पाणी पुरवठा होतो. रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत आठ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे.पिण्याचे पाणी सर्वांना सुलभ मिळावे यासाठी चार पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. या चारही पाण्याच्या टाक्या भरण्यासाठी एकाच पाईप लाईनचा उपयोग केला जातो. दरवर्षी पाण्याची समस्या गंभीर होत आहे. यावर्षी पाण्ी समस्या मागील महिण्यापासून अधिकाच गंभीर बनली असून दोन-चार दिवसातून एखाद्या दिवशी पाणी नळाला पाणी येते. अनेकवेळा ती बंदच असते. गावामध्ये गोळ पाण्याचे दुसरे स्त्रोत नसल्यामुळे या नळाच्या पाण्यावरच नागरिकांवर अवलंबून रहावे लागते. गावामध्ये हातपंप, विहिरी आहेत. पण गोड पाणी कुठेही नाही.येथील विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने समस्या आणखीच बिकट झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नळयोजनेला पाणी पुरवठा नियमित व्हावा यासाठी सात- आठ वर्षांपूर्वी उमा नदीवर बंधारा बांधण्यात आला. मात्र, ग्रामपंचायतीचे या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील शेतकरी याच बंधाºयातील पाणी मोटारपंपाद्वारे घेऊन शेतीसिंचन करतात. यावर्षी सुध्दा तेच झाले आणि मार्च महिन्यातच बंधारा कोरडा पडला. त्यातच नदीतील पाण्याची पातळी खालावली आणि नळयोजनेसाठी जलसाठा कमी पडल्याने येथे पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकाच गंभीर झाली आहे.पाण्याची समस्या लक्षात घेऊन रत्नापूर ग्रामपंचायतीने पुन्हा एका विहिरीची मागणी केली. ती मागणी यावर्षीच मंजूर झाली. परंतु बांधकाम सुरू करण्यास संबंधित कंत्राटदाराने दिरंगाई केली. ‘तहान लागली खोद विहीर’ या म्हणीप्रमाणे ज्यावेळी टंचाई निर्माण झाली तेव्हा या विहिरीच्या बांधकामाला सुरूवात केली असती तर कदाचित दोन महिन्यापूर्वी या विहिरीचे बांधकाम झाले असते आणि आता नळाला व्यवस्थित पाणी आले असते. मात्र तसे झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.ग्रामपंचायत प्रशासन, तालुका प ्रशासनाने या समस्याकडे यापूर्वीच लक्ष दिले असते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली नसती. मात्र याकडे संबंधितांना दुर्र्लक्ष केल्याने आता पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन भटकण्याची वेळ आली आहे.टँकरच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्षगावातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेऊ न ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचे टँंकर मिळावे, यासाठी तहसीलदार, संवर्गविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभागाकडे मागणी केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कुणीही याकडे लक्ष दिले नाही.गावात गुंडभर पाण्यासाठी भटकण्याची वेळ असतानाही अधिकारी टँकर पुरवठा करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. किमान टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी करीत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई