शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

देवाडा-थेरगाव रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: October 9, 2015 01:44 IST

पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द-थेरगाव या मुळ मार्गाची प्रचंड दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

रस्त्यावर खड्डे : नागरिकांमध्ये प्रचंड संतापदेवाडा खुर्द : पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द-थेरगाव या मुळ मार्गाची प्रचंड दैनावस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या मार्गावर दररोज कुठे ना कुठे किरकोळ अपघात झाल्याची वार्ता कानी पडते. परंतु, लोकप्रतिनिधी व प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.सन २०१२ या वर्षी झालेल्या संततधार पावसामुळे थेरगाव रस्त्यावर असलेल्या अंधारी नदीच्या पुलासमोरील संपूर्ण डांबरीकरण उखडले. त्या ठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. या प्रकाराला दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे. मात्र संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कुठलेच पाऊल उचलले नसल्याने या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या सुमारास अनेक दुचाकीस्वार खड्ड्यात पडत असल्याच्या घटना घडत आहेत. थेरगाव येथे ९० टक्के आदिवासी समाज वास्तव्यास असून पोंभूर्णा येथे तहसील कार्यालय असल्याने त्यांना नेहमीच या रस्त्याने रात्री बेरात्री प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांना सुद्धा रस्त्यावरील खड्यांमुळे सायकल चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तर याच गावातील अनेक शाळकरी विद्यार्थी देवाडा खुर्द येथील राष्ट्रमाता विद्यालयात तसेच पोंभूर्णा येथे शिक्षण घेण्यासाठी सायकलने प्रवास करतात. त्यांना सुद्धा या खड्यांमुळे किरकोळ जखमा झाल्याचे बोलल्या जात आहे. थेरगाव नंतर चिंचाळा हळदी या मार्गावरील संपूर्ण डांबरीकरण उखडले असून त्याठिकाणी संपूर्ण रस्त्यावरील गिट्टी उखडल्याने एस.टी. वाहक व खाजगी वाहकांना सुद्धा या मार्गावरून वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याचा त्रास प्रवाशांना होत असून जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. एवढी प्रचंड अवस्था होवून सुद्धा कोणताही अधिकारी व लोकप्रतिनिधीनी या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक पक्षाचे लोकप्रतिनिधी या रस्त्याने मते मागण्यासाठी फिरत होते. तेव्हा त्यांना या रस्त्याचे गांभीर्य दिसले नाही का, असा प्रश्न नागरिक करीत आहेत. या क्षेत्रातून निवडून आलेले आमदार सुधीर मुनगंटीवार जनतेच्या मतांच्या भरवशावर मंत्री झाले असून त्यांनी या रस्त्याच्या गंभीर समस्येकडे लक्ष घालून सदर रस्ता तत्काळ दुरूस्त करून परिसरातील नागरिकांना होणारा नेहमीचा त्रास दूर करावा, अशी जनतेची मागणी आहे. याकडे लक्ष द्यावे. (वार्ताहर)