शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

आमचे आता आधी पूनर्वसन करा हो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीने घाबरून केविलवाने रडू लागल्याने आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आम्ही जिवंत राहू किंवा नाही, याची काही शाश्वती नव्हती.

ठळक मुद्देवारंवार उद्ध्वस्त होणे झालो असह्य, पूरग्रस्त लाडजवासीयांचा टाहो

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : आतापर्यंत या भागातील सर्वात मोठा पूर आम्ही या डोळ्याने अनुभवला आहे. आता पुन्हा असा तांडव आम्हाला पहायचा नाही, वारंवार उद्ध्वस्त होणे आता असह्य झाले आहे. सुखरूप जीवन जगता येईल, यासाठी आमचे आधी पुनर्वसन करा, मगच आम्ही ब्रम्हपुरी सोडू, अशी मागणी लाडज ग्रामवासीयांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली आहे. स्थानिक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पूरपीडितांनी आपल्या व्यथांची श्रृंखलाच यावेळी व्यक्त केली.दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीने घाबरून केविलवाने रडू लागल्याने आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आम्ही जिवंत राहू किंवा नाही, याची काही शाश्वती नव्हती. परंतु राष्ट्रीय आपत्कालीन व राज्य आपत्कालीन पथकांच्या जवानांनी आम्हाला जीवनदान दिले आहे. पुन्हा आम्हाला असे दिवस पाहण्याची वेळ येऊ नये, यासाठी आमचे पहिले पुनर्वसन करा, मगच आम्ही ब्रम्हपुरी सोडणार, अशी इशारावजा विनंती लाडजवासीयांनी केली आहे. घरे गेली, पीक गेले. आता आमच्या जवळ काहीही शिल्लक राहिले नाही. परंतु आम्ही सुरक्षित आहोत, हे आमच्या साठी मोठे आहे. गावात चार ते पाच फूट गाळ आहे. १७०० लोकवस्तीच्या गावात गायी म्हशी साठी १० ते १२ लोक आहेत. बाकी सर्वच ब्रम्हपुरीत आले आहेत. आता गावात जाण्याची हिंमत होत नाही, त्यासाठी आमचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. नाही तर आम्ही ब्रम्हपुरी सोडणार नाही, असा टाहो जमलेल्या ग्रामस्थांनी डोळ्यात अश्रू आणून केला. बेलगाव (जाणी) येथील ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी राहण्यासाठी आधी आम्हाला घरकूल द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त पूरग्रस्त गावाना आर्थिक मदत, घरकूल व शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी मोफत धान्य व अनुदान देण्याची मागणी अन्य ग्रामस्थांनी केली आहे.लाडजच्या संपूर्ण गाववासीयांची एकच मागणी आहे की आमचे पुनर्वसन करा. जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही ब्रम्हपुरी सोडणार नाही.-अमोल रामकृष्ण मोहुर्ले,गावकरी, लाडज

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर