शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आमचे आता आधी पूनर्वसन करा हो..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीने घाबरून केविलवाने रडू लागल्याने आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आम्ही जिवंत राहू किंवा नाही, याची काही शाश्वती नव्हती.

ठळक मुद्देवारंवार उद्ध्वस्त होणे झालो असह्य, पूरग्रस्त लाडजवासीयांचा टाहो

लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : आतापर्यंत या भागातील सर्वात मोठा पूर आम्ही या डोळ्याने अनुभवला आहे. आता पुन्हा असा तांडव आम्हाला पहायचा नाही, वारंवार उद्ध्वस्त होणे आता असह्य झाले आहे. सुखरूप जीवन जगता येईल, यासाठी आमचे आधी पुनर्वसन करा, मगच आम्ही ब्रम्हपुरी सोडू, अशी मागणी लाडज ग्रामवासीयांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली आहे. स्थानिक शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पूरपीडितांनी आपल्या व्यथांची श्रृंखलाच यावेळी व्यक्त केली.दुसरीकडे तालुक्यातील बेलगाव (जानी) येथील ग्रामस्थांनी आम्हाला ताबडतोब घरकूल देऊन आम्हाला दिलासा द्यावा, अशी आर्त मागणी गावाचे दृश्य पाहून केली आहे. एवढा मोठा पूर सत्तरीच्या आयुष्यात कधीच बघितला नाही. आमच्या लहान लहान मुलांनी महापूर बघितल्यानंतर भीतीने घाबरून केविलवाने रडू लागल्याने आमच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आम्ही जिवंत राहू किंवा नाही, याची काही शाश्वती नव्हती. परंतु राष्ट्रीय आपत्कालीन व राज्य आपत्कालीन पथकांच्या जवानांनी आम्हाला जीवनदान दिले आहे. पुन्हा आम्हाला असे दिवस पाहण्याची वेळ येऊ नये, यासाठी आमचे पहिले पुनर्वसन करा, मगच आम्ही ब्रम्हपुरी सोडणार, अशी इशारावजा विनंती लाडजवासीयांनी केली आहे. घरे गेली, पीक गेले. आता आमच्या जवळ काहीही शिल्लक राहिले नाही. परंतु आम्ही सुरक्षित आहोत, हे आमच्या साठी मोठे आहे. गावात चार ते पाच फूट गाळ आहे. १७०० लोकवस्तीच्या गावात गायी म्हशी साठी १० ते १२ लोक आहेत. बाकी सर्वच ब्रम्हपुरीत आले आहेत. आता गावात जाण्याची हिंमत होत नाही, त्यासाठी आमचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. नाही तर आम्ही ब्रम्हपुरी सोडणार नाही, असा टाहो जमलेल्या ग्रामस्थांनी डोळ्यात अश्रू आणून केला. बेलगाव (जाणी) येथील ग्रामस्थांशी संपर्क साधला असता त्यांनी राहण्यासाठी आधी आम्हाला घरकूल द्यावे, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त पूरग्रस्त गावाना आर्थिक मदत, घरकूल व शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे किमान वर्षभर तरी मोफत धान्य व अनुदान देण्याची मागणी अन्य ग्रामस्थांनी केली आहे.लाडजच्या संपूर्ण गाववासीयांची एकच मागणी आहे की आमचे पुनर्वसन करा. जोपर्यंत आमचा निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही ब्रम्हपुरी सोडणार नाही.-अमोल रामकृष्ण मोहुर्ले,गावकरी, लाडज

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर