शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

प्लेटाविना कोट्यवधींचे बंधारे निकामी

By admin | Updated: October 23, 2016 01:07 IST

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळाले पाहिजे, पाणी जमिनीत झिरपले पाहिजे, याकरिता सिंचन विभागाकडून वर्षभरापूर्वी गावागावात कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती केली.

पाणी व्यर्थ : शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न कायमवरोरा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता पाणी मिळाले पाहिजे, पाणी जमिनीत झिरपले पाहिजे, याकरिता सिंचन विभागाकडून वर्षभरापूर्वी गावागावात कोल्हापुरी बंधाऱ्याची निर्मिती केली. यामध्ये बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडविण्याकरिता लोखंडी प्लेट लावण्यात येतात. परंतु अनुदानाअभावी अनेक कोल्हापुरी बंधाऱ्यांना लोखंडी प्लेट लावण्यातच आल्या नाही. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी वाहून जात आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सिंचनासाठी प्रश्न कायमच आहे. त्यामुळे शेतकरी दुबार हंगामापासून वंचित राहणार आहे.सिंचन विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमार्फत कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले. काम मंजूर असल्याने निधी येईलच, अशी आशा बाळगून ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन उधारीवर साहित्य घेवून बंधाऱ्याचे काम पूर्ण केले. त्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यानजिकच्या शेतकऱ्यांना दुबारा पीक घेता येईल, असे वाटायला लागले. बंधाऱ्यांचे काम पूर्ण होवून कित्येक महिन्यांचा कालवधी लोटला. परंतु बंधाऱ्याच्या कामाचा निधी अद्यापही मिळाला नाही. निधीअभावी कोल्हापुरी बंधाऱ्याला लोखंडी प्लेटा लावता आल्या नसल्याने अनेक बंधाऱ्यात पाणी अडविले जात नाही. पाणी व्यर्थ जात आहे. सध्याच्या हंगामात सोयाबीनची कापणी सुरू असून सोयाबीन निघताच शेतकरी त्याच जमिनीवर बंधाऱ्यातून पाणी घेऊन चना व गव्हाचे उत्पादन घेत असतात. परंतु कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी साठवून राहत नसल्याने शेतकऱ्यांच्या दुबार पीक घेण्याच्या आशेवर पाणी फिरले आहे. बंधाऱ्यात पाणी साठवून राहत नसल्याने येत्या काही दिवसात जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)