शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

२२ लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण

By admin | Updated: July 2, 2016 01:02 IST

राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत शुक्रवारी जिल्ह्यात सुमारे २२ लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.

लोकांचा उत्स्फूर्त सहभाग : आता झाडे जगविण्यासाठी सहकार्य अपेक्षितचंद्रपूर : राज्य शासनाच्या दोन कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत शुक्रवारी जिल्ह्यात सुमारे २२ लाखांहून अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले. चंद्रपूर शहरासह जिल्हाभरातील गावागावात नागरिक स्वयंस्फूर्तीने वृक्ष लावताना दिसून आले. विविध सामाजिक संघटनाही याच कामात व्यस्त असल्याचे दिसून येत होते. दरम्यान, चंद्रपूर जिल्हयात वृक्षारोपणाचा जिल्हास्तरीय मुख्य सोहळा मूल मार्गावरील चंद्रपूर वनप्रबोधनीलगत कंम्पार्टमेंट क्रमांक ४०३ मध्ये पार पडला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरुनुले यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन जिल्ह्यात या कार्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी आ. नाना श्यामकुळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, महापौर राखी कंचर्लावार, मनपा आयुक्त संजय काकडे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य क्षेत्र संचालक जी.पी.गरड, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक बी. आर. काळे, महामंडळाचे महाव्यवस्थापक डोळे, मनपा सभापती संतोष लहामगे, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, वन विभागाचे अधिकारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी आशुतोष सलिल म्हणाले, वातावरणामध्ये वारंवार बदल घडत असल्याने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे व वनक्षेत्र वाढविण्याची नितांत गरज आहे. झाड असेल तर माणूस जगेल. प्रत्येकाला झाडापासून मिळणाऱ्या प्राणवायूची गरज असल्याचे लक्षात येताच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जुलै रोजी राज्यात दोन कोटीपेक्षा जास्त वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या संकल्पनेला जिल्हयातील खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला, स्वंयमसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, शासकीय, खाजगी शासकीय संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय व ग्रामीण भागातील नागरिकांनीसुध्दा मोठया संख्येने सहभाग नोंदविला असल्याचे सलिल यांनी यावेळी सांगितले. जिल्हयात आज २२ ते २३ लाख वृक्ष लागवड करण्याचा निर्धार असून यापेक्षा जास्त वृक्ष लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. जिल्हयातील शासकीय नर्सरीतील २० लाखांपेक्षा अधिक वृक्षांच्या रोपांचे वाटप झाले असून खाजगी नर्सरीतूनसुध्दा रोपांचा पुरवठा नागरिकांना करण्यात येत आहे. वृक्ष लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. आता झाडे वाचविण्यासाठीसुध्दा लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यामुळे जिल्हयात मोठया प्रमाणात झाडे निर्माण होवून वनक्षेत्रात वाढ होणार असल्याने जिल्हयात असलेले प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही सलिल यांनी व्यक्त केला. वनविभागाच्या जागेवर मूल रोडवरील वनप्रबोधनीलगतच्या कंम्पार्टमेंट क्रमांक ४०३ मध्ये १२ ते १३ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)मनपाकडून २५ हजारांहून अधिक वृक्षांची लागवडचंद्रपूर महानगरपालिकेकडून २५ हजारांहून अधिक रोपांची आज लागवड करण्यात आल्याची माहिती मनपाचे उपायुक्त विनोद इंगोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. घंटागाडीच्या माध्यमातून इच्छुकांना घरोघरी पाच हजार रोपट्यांचे वितरण करण्यात आले. विविध सामाजिक संघटनांना सहा हजार रोपटे देण्यात आली. स्वत: मनपा प्रशासनाकडून १५ हजार वृक्षांची आज लागवड करण्यात आली. याशिवाय नगरसेवकांनीही नियोजन करून वृक्षांची आपापल्या परिसरात लागवड केली. या वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी प्रत्येक झोन प्रमुखांकडे सोपविण्यात आली आहे.