शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

४.६० लाख हेक्टरवर होणार पिकांची लागवड

By admin | Updated: June 21, 2014 23:54 IST

यंदा जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे.

कृषी विभागाचे नियोजन : सोयाबीन घटणार; कपाशीचा पेरा वाढणारचंद्रपूर : यंदा जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. धान हे मुख्य पीक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन व कपाशीसह अन्य पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. र्माुत्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा घटणार असून कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. तसे नियोजनही कृषी विभागाने केले आहे. सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात १ लाख ३६ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र त्यात घट होऊन १ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. यंदाच्या हंगामात कपाशीच्या पेऱ्यात मात्र वाढ होणार आहे. मागील वर्षी एक लाख ११ हजार ९०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ होऊन एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील हंगामात तीन हजार १०० हेक्टरवर ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात एवढ्याच क्षेत्रावर ज्वारीची लागवड होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी २०० हेक्टरवर तृणधान्याची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढेच क्षेत्र तृणधान्याने व्यापणार आहे.मागील हंगामात २९ हजार ४०० हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील हंगामात ३०० हेक्टरवर उडीद पिकाची लागवड करण्यात आली हेती. यंदा उडीदाच्या क्षेत्रात १०० हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे. ४०० हेक्टरवर कडधान्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षीच्या हंगामात तेवढ्याच क्षेत्रात कडधान्य लावले जाणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये भूईमुगाचे क्षेत्र निरंक आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५०० हेक्टरवर तिळाची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर तिळाची पेरणी केली जाण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात एरंडीचे पीक मात्र घेण्यात येत नाही. मागील हंगामात एक लाख ३६ हजार ५०० हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली होती. यंदा मात्र सोयाबिनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यंदा एक लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबिनची लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात ऊसाच्या पेऱ्यातही घट होऊन १०० हेक्टरवर लागवड होईल.(प्रतिनिधी)