शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

४.६० लाख हेक्टरवर होणार पिकांची लागवड

By admin | Updated: June 21, 2014 23:54 IST

यंदा जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे.

कृषी विभागाचे नियोजन : सोयाबीन घटणार; कपाशीचा पेरा वाढणारचंद्रपूर : यंदा जिल्ह्यातील ४ लाख ६० हजार ९२ हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. तसे नियोजन कृषी विभागाने केले आहे. बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही, याची खबरदारी कृषी विभागाकडून घेतली जात आहे. धान हे मुख्य पीक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी सोयाबीन व कपाशीसह अन्य पिकेही मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. र्माुत्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनचा पेरा घटणार असून कपाशीच्या पेऱ्यात वाढ होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. तसे नियोजनही कृषी विभागाने केले आहे. सन २०१३-१४ च्या खरीप हंगामात १ लाख ३६ हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. यावर्षी मात्र त्यात घट होऊन १ लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबीनची लागवड केली जाणार आहे. यंदाच्या हंगामात कपाशीच्या पेऱ्यात मात्र वाढ होणार आहे. मागील वर्षी एक लाख ११ हजार ९०० हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली होती. यंदा त्यात वाढ होऊन एक लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड होणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. मागील हंगामात तीन हजार १०० हेक्टरवर ज्वारी पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदाच्या हंगामात एवढ्याच क्षेत्रावर ज्वारीची लागवड होण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी २०० हेक्टरवर तृणधान्याची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढेच क्षेत्र तृणधान्याने व्यापणार आहे.मागील हंगामात २९ हजार ४०० हेक्टरवर तूर पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर तुरीची लागवड करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील हंगामात ३०० हेक्टरवर उडीद पिकाची लागवड करण्यात आली हेती. यंदा उडीदाच्या क्षेत्रात १०० हेक्टरने वाढ होण्याचा अंदाज आहे. ४०० हेक्टरवर कडधान्याची लागवड करण्यात आली होती. यावर्षीच्या हंगामात तेवढ्याच क्षेत्रात कडधान्य लावले जाणार आहे. जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये भूईमुगाचे क्षेत्र निरंक आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात ५०० हेक्टरवर तिळाची लागवड करण्यात आली होती. यंदाही तेवढ्याच क्षेत्रावर तिळाची पेरणी केली जाण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यात एरंडीचे पीक मात्र घेण्यात येत नाही. मागील हंगामात एक लाख ३६ हजार ५०० हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली होती. यंदा मात्र सोयाबिनच्या पेऱ्यात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यंदा एक लाख २५ हजार हेक्टरवर सोयाबिनची लागवड केली जाणार आहे. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात ऊसाच्या पेऱ्यातही घट होऊन १०० हेक्टरवर लागवड होईल.(प्रतिनिधी)