शहरं
Join us  
Trending Stories
1
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
2
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
3
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
4
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
5
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
6
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
8
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
9
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम
10
IPL 2025 Eliminator : हिटमॅन रोहितनं खास 'ट्रिपल सेंच्युरी'सह रचला इतिहास; जाणून घ्या त्याचा रेकॉर्ड
11
वैष्णवीचे चारित्र्यहनन पूर्णपणे चुकीचे; वकिलांनी बोलताना भान बाळगणे गरजेचे, आयोगाची सूचना
12
KCR कुटुंबात घमासान BRS चा उत्तराधिकारी कोण; केटीआर की के. कविता कुणाला मिळणार कमान?
13
Jonny Bairstow चा बेस्ट शो! पावरप्लेमध्ये 'पर्पल कॅप'सह मिरवणाऱ्या बॉलरलाही धु धु धुतलं
14
Crime : माता न तूं वैरिणी! काळ्या जादुचं भूत चढलं, तांत्रिकासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलीला विकलं 
15
पाळीव श्वानाने शेजाऱ्याला चावले, कोर्टाने मालकाची केली ४ महिने जेलमध्ये रवानगी, काय आहे प्रकरण?
16
IPL 2025 Eliminator : रोहितला मिळाला नवा ओपनिंग पार्टनर; हार्दिक पांड्यानं या दोघांवरही दाखवला भरवसा
17
भारताचा AMCA प्रोजेक्ट...अमेरिकेचा आश्चर्यकारक प्रस्ताव; रशियानेही दिली मोठी ऑफर
18
उत्पन्न नाही, पीकविमा बँक देईना; पेरणीसाठी पैसे नसल्याने, जीवन संपविण्याची शेतकऱ्याची तयारी
19
Video : तो फ्लॉवर समजला, पण वाघ फायर निघाला! तरुणाला वाघासोबत सेल्फी काढणं पडलं महागात, बघा नेमकं काय झालं...  
20
मोठी बातमी! हगवणे प्रकरणातील निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; नेपाळच्या बॉर्डरपर्यंत पोहोचला होता

जिल्ह्यात आतापर्यंत ३८ लाख वृक्षांचे रोपण

By admin | Updated: July 7, 2017 01:04 IST

राज्य शासनाने यावर्षी घेतलेला चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही

उद्दिष्ट ओलांडणार : महोत्सवाचा आज अखेरचा दिवस लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : राज्य शासनाने यावर्षी घेतलेला चार कोटी वृक्षलागवडीचा संकल्प पूर्ण झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३८ लाख २७ हजार २४४ वृक्षांची लागवड करण्यात आली. शुक्रवार शेवटचा दिवस असून जिल्ह्यातील सर्व यत्रणांनी आपले उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले आहे. १ ते ७ जुलै या काळातील वृक्षलागवडीमध्ये चंद्रपूर जिल्हयाने सुरुवातीपासून आघाडी घेतली असून या उपक्रमाच्या सहाव्या दिवशीच राज्याचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा आनंद चंद्रपूरकरांनी साजरा केला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे नागपूर व अमरावती दौऱ्यावर असतानाच त्यांना चार कोटी वृक्षलागवड झाल्याचे कळले. त्यानंतर चंद्रपुरातील सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांचे अभिनंदन केले असून शुक्रवारी शेवटच्या दिवशी जिल्हयातील सर्व यंत्रणा ४० लाखांच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल, असे स्पष्ट केले आहे. शासनाने महानगरपालिकेला केवळ १५ हजारांचे उद्दिष्ट दिले होते. मात्र महापौर अंजली घोटेकर यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेने ३० हजारांचे स्वत:चे उद्दिष्ट केले होते. आता या उद्दिष्टाला जवळपास दोन हजार वृक्षलागवड कमी असून शुक्रवारपर्यंत हे लक्ष पूर्ण केले जाईल, असे सुतोवाच मनपा आयुक्त संजय काकडे यांनी केले आहे. जिल्हयातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही या मोहिमेत आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. प्रत्येक तालुक्याच्या कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला असून आतापर्यंत ११ हजार ६१८ वृक्ष लावले आहे. शुक्रवारपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प कर्मचाऱ्यांनी केला असल्याचे जिल्हा उपनिबंधक आर.डी.कौसडीकर यांनी सांगितले आहे. वरोरा येथे बुधवारी मोठया प्रमाणात वृक्षदिंडी काढून जनजागृती करण्यात आली. शुक्रवारी अखेरच्या दिवसापर्यंत सर्व नगरपरिषदा, ग्रामपंचायती व स्वयंसेवी संस्था मोठया प्रमाणात योगदान देवून या कार्यक्रमाचा विक्रमी लागवडीने समारोप करतील, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे. जि.प. व मनपाचे आकडे ४वनमहोत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार नाना शामकुळे यांनी तीन लाख ८० हजार वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट घेतले होते. त्यासाठी त्यांनी वृक्षदिंडीचा अभिनव प्रयोग केला होता. ५० गावांमध्ये वृक्षदिंडी काढण्यात आली होती. त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सिरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेने चार लाखापेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्याचा विक्रम केला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत चार लाख १८ हजार ७३१ वृक्ष लागवड झाली होती. चंद्रपूर महानगरपालिकेने ठरविलेल्या ३० हजारांच्या आपल्या उद्दिष्टाच्या जवळपास मजल मारली आहे. आज गुरुवारी तीन हजार ५२ वृक्ष लावण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकेने आतापर्यंत २८ हजार १८८ वृक्षलागवड केली आहे.