शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

गडीसुर्लात वृक्ष लागवडीचे झाले वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:00 IST

मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील स्मशानभूमी परिसरात पाच वर्षांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून .....

ठळक मुद्देचौकशीची मागणी : आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

शशिकांत गणवीर।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील स्मशानभूमी परिसरात पाच वर्षांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास चार लाख रुपये खर्च करून वटवृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी एकही वृक्ष जिवंत नसून स्मशानभूमी परिसर वृक्षाविना वाळवंट झाल्याचे दिसून येत आहे.ग्रामपंचायतीने प्रशासनाचे लाखो रुपये खर्च केले. संगोपनावरही खर्च करण्यात आला. मात्र लावलेल्या झाडाचे योग्यरित्या संगोपण करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड कागदावरच केली की काय, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे. यात गैरव्यवहार झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.स्मशानभूमी परिसरात प्रशासनाने वृक्ष लागवडीकरिता प्रशासकीय मंजुरी प्रदान करून तीन लाख ७१ हजार ६१८ रुपये दिले. निधी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात आले.या परिसरात लावलेल्या वृक्षांचे योग्य संगोपण झाले असते तर आज या ठिकाणी हिरविगार वनराई फुलली असती. मात्र ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवलेल्या बाभळीच्या झाडाव्यतिरिक्त फक्त माहिती फलकच उरल्याचे दिसते.येथील लोकप्रतिनिधी विकासाच्या नावावर ग्रामस्थाची दिशाभूल करीत आहेत. प्रत्यक्षात गावात विकास मात्र शून्य आहे. ग्रामपंचायतीवर पंधरा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. ग्रामस्थांनी काँग्रेसवर विश्वास टाकत सत्तेची चावी त्यांच्या हातात दिली. मात्र गावात विकासच होत नसल्याने नागरिकांची फसवणूक झाल्याचे गावात बोललग जात आहे.शासनाच्या योजना चांगल्या असल्या तरी त्यांना राबवणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या भ्रष्टपणामुळे शासनाच्या योजना राबविणाºयांसाठी कुरण ठरत आहेत. त्यामुळे गाव विकासाची भाषा करणारे राजकारणी मायाजाळ्यात अडकल्याचे दिसते. दुसरीकडे गावात मात्र दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्या आहेत. स्मशानभूमी परिसरात लाखो रुपये खर्चुन लावलेल्या वट वृक्ष लागवडीची चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.