शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

गडीसुर्लात वृक्ष लागवडीचे झाले वाळवंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:00 IST

मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील स्मशानभूमी परिसरात पाच वर्षांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून .....

ठळक मुद्देचौकशीची मागणी : आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप

शशिकांत गणवीर।लोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील स्मशानभूमी परिसरात पाच वर्षांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जवळपास चार लाख रुपये खर्च करून वटवृक्षांची लागवड करण्यात आली. मात्र अल्पावधीतच ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे या ठिकाणी एकही वृक्ष जिवंत नसून स्मशानभूमी परिसर वृक्षाविना वाळवंट झाल्याचे दिसून येत आहे.ग्रामपंचायतीने प्रशासनाचे लाखो रुपये खर्च केले. संगोपनावरही खर्च करण्यात आला. मात्र लावलेल्या झाडाचे योग्यरित्या संगोपण करण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले आहे. ग्रामपंचायतीने वृक्ष लागवड कागदावरच केली की काय, असा प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा ठाकला आहे. यात गैरव्यवहार झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.स्मशानभूमी परिसरात प्रशासनाने वृक्ष लागवडीकरिता प्रशासकीय मंजुरी प्रदान करून तीन लाख ७१ हजार ६१८ रुपये दिले. निधी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात आले.या परिसरात लावलेल्या वृक्षांचे योग्य संगोपण झाले असते तर आज या ठिकाणी हिरविगार वनराई फुलली असती. मात्र ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या उगवलेल्या बाभळीच्या झाडाव्यतिरिक्त फक्त माहिती फलकच उरल्याचे दिसते.येथील लोकप्रतिनिधी विकासाच्या नावावर ग्रामस्थाची दिशाभूल करीत आहेत. प्रत्यक्षात गावात विकास मात्र शून्य आहे. ग्रामपंचायतीवर पंधरा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता आहे. ग्रामस्थांनी काँग्रेसवर विश्वास टाकत सत्तेची चावी त्यांच्या हातात दिली. मात्र गावात विकासच होत नसल्याने नागरिकांची फसवणूक झाल्याचे गावात बोललग जात आहे.शासनाच्या योजना चांगल्या असल्या तरी त्यांना राबवणारे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या भ्रष्टपणामुळे शासनाच्या योजना राबविणाºयांसाठी कुरण ठरत आहेत. त्यामुळे गाव विकासाची भाषा करणारे राजकारणी मायाजाळ्यात अडकल्याचे दिसते. दुसरीकडे गावात मात्र दिवसेंदिवस समस्या वाढत चालल्या आहेत. स्मशानभूमी परिसरात लाखो रुपये खर्चुन लावलेल्या वट वृक्ष लागवडीची चौकशी करून दोषी अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.