शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
2
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
3
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
4
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
5
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
6
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
7
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
8
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
9
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
10
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
12
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
13
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
14
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
16
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
17
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
18
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
19
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
20
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालकांना बक्षीस देण्याची योजना संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST

एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात. त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेष म्हणजे, देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. एक लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीचा दर आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्काराचे खरे मानकरी एसटीचे ३४ हजार चालक आहेत.

ठळक मुद्देमहामंडळाचे निर्देश : अपघातविरहित सेवा देणाऱ्या बसचालकांना मिळत होता सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांना पूर्वी २६० दिवस अपघात विरहित सेवा दिल्यानंतर बक्षीस देण्याची योजना महामंडळाकडून राबविण्यात येत होती. आता ही योजना बंद करण्यात आली असून सर्व विभागस्तरावर या निर्देशाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना १० जून रोजी देण्यात आल्या आहेत.एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात. त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेष म्हणजे, देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. एक लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीचा दर आहे. त्यासाठी एसटी महामंडळाला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या पुरस्काराचे खरे मानकरी एसटीचे ३४ हजार चालक आहेत. एसटी महामंडळाकडून २६० दिवस अपघात विरहित सेवा देणाऱ्या बसचालकांना प्रोत्साहन म्हणून प्रत्येक वर्षी एक हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत होते. एसटी चालकांना १५ आॅगस्ट किंवा २६ जानेवारीला हे बक्षीस देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जात होता. मात्र सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य आणि आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना आखल्या जात आहेत.लॉकडाऊनमुळे एसटीच्या महसुलात लक्षणीय घट झाल्याने खर्चात काटकसर करून खर्च पुढे ढकलण्यात येत आहे. त्यामुळे ही अपघात विरहित बक्षीस योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत एसटीच्या चालकांना बक्षीेस देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.लॉकडाऊनचा महामंडळाला जबर फटकाकोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्वत्र लॉकडाऊन केले. संचारबंदीही लागू केली. त्यामुळे सर्वच उद्योग, आस्थापना, राज्यसीमा, जिल्हासीमा बंद झाल्या. दळणवळणही बंद झाले. एसटी प्रवासातून कोरोनाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ग्रामीण जीवनातील महत्त्वाचा घटक असलेली व सर्वांच्या जिवाभावाची लालपरी २३ मार्चपासून डेपोत बंदीस्त झाली. तब्बल अडीच महिने बससेवा बंद राहिली. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा फटका बसला. आता बससेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र प्रवाश्यांची मर्यादा आहे. शिवाय अनेकजण बसप्रवास टाळत असल्याने महामंडळ तोट्यातच आहे.

टॅग्स :state transportएसटी