शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आराखडा कागदावरच झिरपतोय

By admin | Updated: May 9, 2017 00:33 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा राज्यात परिचित आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या जिल्ह्यात पाण्याची बोंब असते. मात्र प्रशासनाचे पाणी टंचाई आराखडे कागदावरच रंगतात

रवी जवळे । लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील उन्हाळा राज्यात परिचित आहे. दरवर्षी उन्हाळ्यात या जिल्ह्यात पाण्याची बोंब असते. मात्र प्रशासनाचे पाणी टंचाई आराखडे कागदावरच रंगतात आणि कागदावरच ते संपुष्टात येतात, असा अनुभव अनेकदा जिल्हावासियांना आला आहे. यावर्षीही प्रशासाने तीच री ओढल्याचे दिसत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच प्रकल्पाची स्थिती चिंताजनक आहे. भूजल पातळीही कमालीची खालावली आहे. मे महिन्याच्या प्रारंभीच पाण्याचे स्रोत आटत असताना प्रशासनाचा पाणी टंचाई आराखडा व उपाययोजना कागदावरच बांध टाकल्यागत थांबल्या आहेत. त्यामुळे पाणी टंचाईने प्रभावित झालेले नागरिक जिवाच्या आकांताने पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.चंद्रपूर जिल्ह्यात मार्चच्या पंधरवाड्यानंतरच उन्हाळ्याची चाहुल लागते. पुढे एप्रिल, मे आणि जून महिन्यात ही धग कायम राहते. यावर्षी उन्हाळा तसा विलंबाने सुरु झाला. एरवी होळीच्या पूर्वीच अंगाला चटके बसणे सुरू होते. मात्र यंदा होळीपर्यंत वातावरणात गारवाच होता. मात्र होळीनंतर सुर्याने आग ओकणे सुरू केले. एप्रिल महिन्यातच सुर्याचा पारा ४५ अंशापार गेला. ‘मे हिट’ तडाका यंदा नागरिकांना एप्रिल महिन्यातच बसला. आता मे महिना सुरू झाला आहे. मे महिन्याच्या प्रारंभीच पारा ४६ अंशा पार गेला आहे. आणखी दोन महिने उन्हाच्या जोरदार झळा नागरिकांना सहन कराव्या लागणार आहे. सुर्य आग ओकत असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. जमिनीतील ओलावा केव्हाचाच नष्ट झाला आहे. जंगले, माळरान ओसाड पडत चालले आहे. उल्लेखनीय असे की मे महिन्याच्या प्रारंभीच जिल्ह्यात जलाशयाची स्थिती चिंताजनक झाली आहे. चंदई आणि लभानसराड हे सिंचन प्रकल्प आताच ड्राय झाले आहेत. लाला नाला, पकडीगुड्डम, नलेश्वर आणि चारगाव या प्रकल्पात २० टक्क्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. उर्वरित सिंचन प्रकल्पाची स्थितीही नाजुक आहे. जवळजवळ सर्वच प्रकल्पात निम्म्याहून कमी जलसाठा शिल्लक आहे. यासोबतच जिल्ह्यातील मामा तलावातही पाण्याचा अत्यल्प साठा शिल्लक आहे. यामुळे गावखेड्यातील पाण्याचे स्रोत झपाट्याने आटत चालले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल, विहिरीची पातळीही घटली आहे. त्यामुळे ग्रामीण पट्टयातील बहुतांश भागात पाणी टंचाई जाणवत आहे. कोरपना, जिवतीसारख्या पहाडावरील दुर्गम भागात तर पाण्याची स्थिती भयावह आहे. एखाद्या खड्डयातील किंवा नाल्यातील पाणी पहाडावरील कोलाम बांधवांना प्यावे लागत आहे. याशिवाय बैलबंडी किंवा पायदळ दोन-तीन किलोमीटरची पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. असे असतानाही प्रशासान मात्र यंदा बऱ्यापैकी पाऊस झाला, स्थिती चांगली आहे असे म्हणत गप्प आहे. जिल्हा परिषदेने उन्हाळ्याची चाहुल लागण्यापूर्वीच मोठ्या उत्साहाने पाणी टंचाई आराखडा तयार केला. त्यासाठी प्रशासकीय मान्यताही घेतली. मात्र हा आराखडा उपाययोजनाच्या स्वरुपात रुपांतरित होऊ शकला नाही. या कृती आराखड्यांतर्गत नवीन विंधन विहीर व कुपनलिका, नळ योजनेची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, टँकर-बैलगाडीने पाणी पुरवठा करणे, विहिरीचे खोलीकरण, गाळ काढणे, इनवेल बोर, खासगी विहिरी अधिग्रहित करणे, विंधन विहिरींचे जलभंजन आदी उपाययोजना करायच्या असतात. मात्र या उपाययोजना बोटावर मोजण्याइतक्या गावातच होऊ शकल्या.४१३ गावे टंचाईग्रस्तजिल्ह्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत टंचाई आराखड्यानुसार कामे करावी लागतात. यासाठी निधीचीही तरतूद असते. यंदा पाणी टंचाईसाठी जिल्हा परिषदेने सहा कोटी २७ लाख रुपयांचा उपाय आराखडा तयार केला आहे. जिल्हा परिष्ांदेच्या सर्वेक्षणानुसार जिल्हयातील ४१३ गावे टंचाईग्रस्त आहेत. या गावांसाठी ५७८ उपाय योजना करण्यात आल्या असल्याचे जिल्हा परिषद यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे. मात्र अनेक टंचाईग्रस्त गावात या उपाययोजना पोहचल्याच नाही, हे वास्तव आहे.