शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

मिरची पूड डोळ्यात टाकून लुटणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2016 00:56 IST

रस्त्याने जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रकमेची बॅग लंपास करणाऱ्या टोळीला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या....

सहा जणांना अटक : ८ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर : रस्त्याने जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्याजवळील रोख रकमेची बॅग लंपास करणाऱ्या टोळीला चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने जेरबंद केले. अटक करण्यात आलेल्या टोळीत सहाजणांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. फईम अबरार शेख (२४), शाहरूख अली अहमद अली (१८), शेख अजहर शेख मेहराज (२४), मेहबूब आलाम आकत खान (२२), सद्दाम हुसेन अफसर हुसेन व फरहान शेख शब्बीर शेख अशी आरोपींची नावे असून हे सर्वजण चंद्रपूर शहरातील रहिवासी आहेत. २५ जानेवारीला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गावर ही लुटमारीची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. परंतु शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने हे आव्हान स्विकारून आरोपींना जेरबंद केले. विशेष म्हणजे ७ सप्टेंबर २०१५ रोजी स्थानिक श्री टॉकीज परिसरात शब्बीर लक्कडशाह व मुर्तुजा लक्कडशाह या व्यापाऱ्यांजवळी पाच लाख रुपये भरून असलेली बॅगही या टोळीतील आरोपींनीच लंपास केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. (पान ४ वर)लाईफ स्टाईल बदलल्याने उघडले रहस्यलुटमारप्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयितांची माहिती गोळा केली. त्यानुसार त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र ते चंद्रपुरात सापडले नाहीत. त्यांच्या शोधासाठी नागपूर, हैदराबाद, राजुरा येथे पथक पाठविण्यात आले. सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात आले. सोबतच ११७ दुचाकी वाहनांची चौकशी केली. खबऱ्यांना पाळत ठेवण्याच्या सुचना पोलिसांनी केल्या होत्या. यादरम्यान, एका गरीब युवकाजवळ महागडी पल्सर दुचाकी असल्याचे व त्याची लाईफ स्टाईल अचानक बदलल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली. याच आधारावर चौकशी करीत सदर युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने पोलिसांपुढे गुन्ह्याची कबुली दिली. एवढेच नव्हे तर मुख्य आरोपी फईम शेख हा २५ जानेवारीच्या लुटमारीतील सर्व मुद्देमाल घेऊन पळून गेला, अशी माहितीही त्याने पोलिसांना दिली. त्यावरून पोलिसांनी फईमला नागपुरातील एका हॉटेलमध्ये अटक केली तर अन्य एका आरोपीला चंद्रपुरातून अटक करण्यात आली. पोलीस चमूला १० हजारांचे बक्षीसया प्रकरणाचा तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलिसांच्या चमूला १० हजारांचे बक्षिस जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी जाहीर केले. हे प्रकरण तडीस नेण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनिल ताजने, सहाय्यल पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, उपनिरीक्षक विवेक देशमुख, मेश्राम, सहाय्यक फौजदार शेख रहुफ, सुरेश केमेकर, अफसर खान, किशोर तुमराम, बळवंत शर्मा, प्रकाश बल्की, पाल, चौधरी, चालेकर, वाघमारे, दादुरवाडे, आतकुलवार, वैरागडे, चिकाटे, गिरडकर, शिंदे, बांबोळे यांनी परिश्रम घेतले.