शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नळ असतानाही पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:21 IST

सावली : घरी आड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावलीनगरात येत आहे. महिना, दोन ...

सावली : घरी आड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावलीनगरात येत आहे. महिना, दोन महिन्यांनी नगरात पाण्याची समस्या निर्माण होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पाणीपुरवठा योजनेची नळजोडणी घरोघरी असूनही पाण्यासाठी पायपीट करण्याचा त्रास नगरातील महिलांना सहन करावा लागत आहे.

हा नगर प्रशासनाचा नाकर्तेपणाच आहे, असे आता नगरवासी बोलायला लागले आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या सुरुवातीपासूनच ही समस्या सावलीनगरवासीयांच्या पाचवीला पूजली आहे. नगराच्या पाणीपुरवठ्यासाठी तीन मोटरपंप असतानासुद्धा सतत महिना, दोन महिन्यांनी होणाऱ्या या समस्येमुळे माता-भगिनी त्रासून गेल्या आहेत. नगर प्रशासनाच्या मनमौजी आणि अडेलतट्टू धोरणाने पाणी समस्या कायमची झाली आहे. चांगल्या दर्जाचे तीन मोटरपंप असतानासुद्धा अशी समस्या वारंवार भेडसावत असेल तर ही समस्या मानवनिर्मित असल्याचे बोलले जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी एकाच पंपाची गरज असतानाही तत्कालीन ग्रामपंचायतने तीन मोटर पंपांची तजवीज करून ठेवली आहे, मात्र नगरपंचायत प्रशासन दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. दोन पंप नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्त करून ठेवणे गरजेचे असताना तिसराही पंप बिघडण्याची वाट पाहात वेळ घालवणे, हा नागरिकांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. सावली शहरात नव्याने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी होत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कायमची सुटेल हा आशावाद असतानाच तत्पूर्वी मात्र पाणीपुरवठ्याच्या प्रशासनिक समस्येने शहरवासी पुरते त्रस्त झाले आहेत. सतरा सदस्यांची मुदत आठ महिन्यांपूर्वी संपुष्टात आली आहे. त्यामुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. आणि याच कारणाने प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू झाला असल्याचेही बोलले जात आहे.