शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
3
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
4
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
5
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
6
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
7
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
8
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
9
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
10
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
11
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
12
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
13
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
14
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
15
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
16
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
17
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
18
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
19
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
20
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता

नळ असतानाही पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:21 IST

सावली : घरी आड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावलीनगरात येत आहे. महिना, दोन ...

सावली : घरी आड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावलीनगरात येत आहे. महिना, दोन महिन्यांनी नगरात पाण्याची समस्या निर्माण होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पाणीपुरवठा योजनेची नळजोडणी घरोघरी असूनही पाण्यासाठी पायपीट करण्याचा त्रास नगरातील महिलांना सहन करावा लागत आहे.

हा नगर प्रशासनाचा नाकर्तेपणाच आहे, असे आता नगरवासी बोलायला लागले आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या सुरुवातीपासूनच ही समस्या सावलीनगरवासीयांच्या पाचवीला पूजली आहे. नगराच्या पाणीपुरवठ्यासाठी तीन मोटरपंप असतानासुद्धा सतत महिना, दोन महिन्यांनी होणाऱ्या या समस्येमुळे माता-भगिनी त्रासून गेल्या आहेत. नगर प्रशासनाच्या मनमौजी आणि अडेलतट्टू धोरणाने पाणी समस्या कायमची झाली आहे. चांगल्या दर्जाचे तीन मोटरपंप असतानासुद्धा अशी समस्या वारंवार भेडसावत असेल तर ही समस्या मानवनिर्मित असल्याचे बोलले जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी एकाच पंपाची गरज असतानाही तत्कालीन ग्रामपंचायतने तीन मोटर पंपांची तजवीज करून ठेवली आहे, मात्र नगरपंचायत प्रशासन दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. दोन पंप नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्त करून ठेवणे गरजेचे असताना तिसराही पंप बिघडण्याची वाट पाहात वेळ घालवणे, हा नागरिकांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. सावली शहरात नव्याने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी होत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कायमची सुटेल हा आशावाद असतानाच तत्पूर्वी मात्र पाणीपुरवठ्याच्या प्रशासनिक समस्येने शहरवासी पुरते त्रस्त झाले आहेत. सतरा सदस्यांची मुदत आठ महिन्यांपूर्वी संपुष्टात आली आहे. त्यामुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. आणि याच कारणाने प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू झाला असल्याचेही बोलले जात आहे.