शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नळ असतानाही पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:21 IST

सावली : घरी आड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावलीनगरात येत आहे. महिना, दोन ...

सावली : घरी आड (विहीर) आणि पाण्याची रड अशी म्हण प्रचलित आहे. असाच प्रत्यय सावलीनगरात येत आहे. महिना, दोन महिन्यांनी नगरात पाण्याची समस्या निर्माण होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. पाणीपुरवठा योजनेची नळजोडणी घरोघरी असूनही पाण्यासाठी पायपीट करण्याचा त्रास नगरातील महिलांना सहन करावा लागत आहे.

हा नगर प्रशासनाचा नाकर्तेपणाच आहे, असे आता नगरवासी बोलायला लागले आहेत. पाणीपुरवठा योजनेच्या सुरुवातीपासूनच ही समस्या सावलीनगरवासीयांच्या पाचवीला पूजली आहे. नगराच्या पाणीपुरवठ्यासाठी तीन मोटरपंप असतानासुद्धा सतत महिना, दोन महिन्यांनी होणाऱ्या या समस्येमुळे माता-भगिनी त्रासून गेल्या आहेत. नगर प्रशासनाच्या मनमौजी आणि अडेलतट्टू धोरणाने पाणी समस्या कायमची झाली आहे. चांगल्या दर्जाचे तीन मोटरपंप असतानासुद्धा अशी समस्या वारंवार भेडसावत असेल तर ही समस्या मानवनिर्मित असल्याचे बोलले जात आहे. पाणीपुरवठ्यासाठी एकाच पंपाची गरज असतानाही तत्कालीन ग्रामपंचायतने तीन मोटर पंपांची तजवीज करून ठेवली आहे, मात्र नगरपंचायत प्रशासन दररोज पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. दोन पंप नादुरुस्त झाल्यानंतर ते दुरुस्त करून ठेवणे गरजेचे असताना तिसराही पंप बिघडण्याची वाट पाहात वेळ घालवणे, हा नागरिकांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. सावली शहरात नव्याने जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी होत आहे. त्यामुळे पाण्याची समस्या कायमची सुटेल हा आशावाद असतानाच तत्पूर्वी मात्र पाणीपुरवठ्याच्या प्रशासनिक समस्येने शहरवासी पुरते त्रस्त झाले आहेत. सतरा सदस्यांची मुदत आठ महिन्यांपूर्वी संपुष्टात आली आहे. त्यामुळे प्रशासनावर कुणाचाही अंकुश राहिलेला नाही. आणि याच कारणाने प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू झाला असल्याचेही बोलले जात आहे.