शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आज स्पष्ट होणार रिंगणातील चित्र

By admin | Updated: September 30, 2014 23:34 IST

जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील चित्र १ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपणार असल्याने निवडणुकीची खरी रंगतही आता चढणार आहे.

चंद्रपूर : जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघातील चित्र १ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपणार असल्याने निवडणुकीची खरी रंगतही आता चढणार आहे. सहाही विधानसभा मिळून १५३ उमेदवार रिंगणात आहेत. यात, राजुरा मतदारसंघात १९, चंद्रपुरात २१, बल्लारपुरात १८, ब्रह्मपुरीत २१, चिमूरमध्ये ४२ तर वरोरामध्ये ३२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वाधिक उमेदवार चिमूर मतदार संघात असून त्या पाठोपाठ वरोराचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे, या दोन्ही मतदार संघात भाजपा कार्यकर्त्यांनी कायम ठेवलेले अर्ज या पक्षाच्या उमेदवारासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. हे ओळखून नामांकन परत घेण्यासाठी संबंधितांवर पक्षनेत्यांकडून भर दिला जात असल्याची माहिती आहे. वरोरा मतदार संघात भाजपामध्ये असलेला तिढा अद्यापही सुटलेला नाही. येथे भाजपाकडून सात जणांचे नामांकन आहेत. भाजपाने संजय देवतळे यांना तिकीट दिल्यापासून उसळलेला क्षोभ अद्यापही शमलेला नाही. यामुळेच अखेरपर्यंत कुणीही नामांकन परत घेतले नसल्याची चर्चा आहे. तर, चिमूरमध्येही भाजपाकडून पाच जणांचे नामांकन आहेत. बंटी भांगडिया यांना भाजपाने तिकीट दिल्याने पक्षातील चार जणांनी आपले नामांकन रिंगणात ठेवले आहेत. या दोन्ही ठिकाणी सर्वांची समजूत घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यात किती यश आले हे बुधवारी दुपारी ३ वाजतानंतर दिसणार आहे. या वेळच्या निवडणुकीत अपक्षांची डोकेदुखी सर्वच ठिकाणी वाढणार असे दिसत आहेत. या सोबतच अन्य पक्षांपेक्षा भाजपामध्ये दोन मतदार संघात बंडखोरांकडून डोके वर काढले जाण्याची शक्यता आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत आहे, तसतसे मतदार संघातील राजकीय वातावरण तापत आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांच्या जाहीर सभांनाही मतदारसंघांमध्ये सुरूवात झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)