शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलमुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:43 IST

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर ...

ठळक मुद्देउदरनिर्वाहाचा प्रश्न : कार्यक्रमांमध्ये मोबाईलचीच क्रेझ

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर व्यावसायिकाला भेडसावत आहे. पूर्वी प्रत्येक कार्यक्रमात छायाचित्र टीपण्यासाठी फोटोग्राफरची आवश्यकता भासायची. त्याला या कामाची खास आर्डर दिली जायची. याशिवाय कुटुंबांचे फोटो, घरात लहान बाळ आले की त्याचे फोटो स्टुडीओत जाऊन काढले जात होते. परंतु आता फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची जागा स्मार्ट फोनने घेतली आहे. आता अनेक कार्यक्रमात फोटोग्राफरला तर बोलाविलेही जात नाही. मोबाईल फोननेच काम भागविले जाते.अत्याधुनिक स्मार्टफोनमधील वेगवेगळ्या फिचर्समुळे डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणे मोबाईल फोटोग्राफीला गुणवत्ता मिळत आहे. फोटो अ‍ॅप्सच्या सहाय्याने हवे असेल तसे छायाचित्रे टिपता येतात. एक फोन फायदे अनेक असल्यामुळे स्मार्ट फोनची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फोटोग्राफीला हळूहळू लोक विसरत असल्याचे दिसून येत आहे.डिजिटल कॅमेऱ्याची किंमत अधिकडिजिटल कॅमेरा फोटोग्राफी योग्य आणि दर्जेदार फोटोसाठी ओळखला जातो. मात्र मोबाईल फोनच्या तुलनेत डिजिटल कॅमेरा अधिक महाग असल्याने नागरिक मोबाईल फोनलाच अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातही सारखीच स्थितीमोबाईलमधील नवनवीन शोध आणि स्मार्ट फोनचा वाढता वापर, यामुळे व्यावसायिक स्टुडीओतील गर्दी कमी होऊ लागली आहे. शहरी भागानंतर ग्रामीण भागातही स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात पोहचला आहे. पूर्वी गावखेड्यातील कार्यक्रमात शहरातून खास फोटोग्राफर बोलावला जायचा. मात्र आता खेडोपाडी फोटोसाठी मोबाईलचाच वापर केला जाताना दिसून येत आहे.केवळ लग्नसराईतच मागणीव्यावसायिक फोटोग्राफरला प्रत्येक कार्यक्रमात बोलविले जात नसले तरी लग्नसराईतून फोटोग्राफर अद्याप बाद झालेला नाही. लग्नसराईत मोबाईलवर काम भागविले जात नाही. तिथे मात्र फोटोग्राफरला आवर्जुन बोलाविले जाते. त्यामुळे लग्नसराईची या व्यावसायिकांना आतूरतेने प्रतीक्षा असते.मोबाईलच्या युगात मोजक्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावणं असते. इतरवेळी मोबाईल काम करीत असते. केवळ लग्नसराईत व्यवसाय चालतो. इतर वेळेस हाताला काम नसते. त्यामुळे दुकान थाटून बसणे आता परवडण्यासारखे राहिले नाही.- राजू मोहितकर,फोटोग्राफर, नांदा