शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मोबाईलमुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय डबघाईस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 23:43 IST

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर ...

ठळक मुद्देउदरनिर्वाहाचा प्रश्न : कार्यक्रमांमध्ये मोबाईलचीच क्रेझ

सतीश जमदाडे ।आॅनलाईन लोकमतआवाळपूर : पूर्वी छायाचित्रकाराने फोटो काढल्यानंतर चार-पाच दिवसानंतर तो हातात येई. यादरम्यान फोटो काढणाऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली असायची. आता आधुनिक जगात तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. हातात सुसज्ज कॅमेरा असलेला मोबाईल आला. यामुळे छायाचित्रकरांचा व्यवसाय मात्र डबघाईस आला आहे.यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा तरी कसा, असा प्रश्न फोटोग्राफर व्यावसायिकाला भेडसावत आहे. पूर्वी प्रत्येक कार्यक्रमात छायाचित्र टीपण्यासाठी फोटोग्राफरची आवश्यकता भासायची. त्याला या कामाची खास आर्डर दिली जायची. याशिवाय कुटुंबांचे फोटो, घरात लहान बाळ आले की त्याचे फोटो स्टुडीओत जाऊन काढले जात होते. परंतु आता फोटोग्राफरच्या कॅमेऱ्याची जागा स्मार्ट फोनने घेतली आहे. आता अनेक कार्यक्रमात फोटोग्राफरला तर बोलाविलेही जात नाही. मोबाईल फोननेच काम भागविले जाते.अत्याधुनिक स्मार्टफोनमधील वेगवेगळ्या फिचर्समुळे डिजिटल कॅमेऱ्याप्रमाणे मोबाईल फोटोग्राफीला गुणवत्ता मिळत आहे. फोटो अ‍ॅप्सच्या सहाय्याने हवे असेल तसे छायाचित्रे टिपता येतात. एक फोन फायदे अनेक असल्यामुळे स्मार्ट फोनची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने होणाऱ्या फोटोग्राफीला हळूहळू लोक विसरत असल्याचे दिसून येत आहे.डिजिटल कॅमेऱ्याची किंमत अधिकडिजिटल कॅमेरा फोटोग्राफी योग्य आणि दर्जेदार फोटोसाठी ओळखला जातो. मात्र मोबाईल फोनच्या तुलनेत डिजिटल कॅमेरा अधिक महाग असल्याने नागरिक मोबाईल फोनलाच अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.ग्रामीण भागातही सारखीच स्थितीमोबाईलमधील नवनवीन शोध आणि स्मार्ट फोनचा वाढता वापर, यामुळे व्यावसायिक स्टुडीओतील गर्दी कमी होऊ लागली आहे. शहरी भागानंतर ग्रामीण भागातही स्मार्ट फोन प्रत्येकाच्या हातात पोहचला आहे. पूर्वी गावखेड्यातील कार्यक्रमात शहरातून खास फोटोग्राफर बोलावला जायचा. मात्र आता खेडोपाडी फोटोसाठी मोबाईलचाच वापर केला जाताना दिसून येत आहे.केवळ लग्नसराईतच मागणीव्यावसायिक फोटोग्राफरला प्रत्येक कार्यक्रमात बोलविले जात नसले तरी लग्नसराईतून फोटोग्राफर अद्याप बाद झालेला नाही. लग्नसराईत मोबाईलवर काम भागविले जात नाही. तिथे मात्र फोटोग्राफरला आवर्जुन बोलाविले जाते. त्यामुळे लग्नसराईची या व्यावसायिकांना आतूरतेने प्रतीक्षा असते.मोबाईलच्या युगात मोजक्या कार्यक्रमाला आम्हाला बोलावणं असते. इतरवेळी मोबाईल काम करीत असते. केवळ लग्नसराईत व्यवसाय चालतो. इतर वेळेस हाताला काम नसते. त्यामुळे दुकान थाटून बसणे आता परवडण्यासारखे राहिले नाही.- राजू मोहितकर,फोटोग्राफर, नांदा