शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

कापणीपूर्व धानपिकांवर किडीचा प्रादुर्भाव

By admin | Updated: October 18, 2015 01:15 IST

अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.

चिरोली : अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत.सभोवताल जंगले, तलाव, टेकड्या, नदी या नैसर्गिक घटकांनी व्यापलेल्या परिसरात मुख्य पीक हे धानाचे घेतले जाते. शेतीच्या मशागतीपासून शेतकरी वर्ग बी-बियाणे, रासायनिक खते, निंदण व फवारण्यावर लाखो रुपयांचा खर्च करुन उत्पादन घेतात. त्यामुळे कौटुंबिक देवाण-घेवाण करुन उदरनिर्वाह करणारे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. अशातच यावर्षीच्या पावसाचे प्रमाण अत्यल्प व सिंचनाच्या सोई अपुऱ्या असल्याने धानपीक धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आपापल्या परीने मोटरपंप व इंजिनद्वारे मिळेल त्या मार्गाने आवश्यक पुरवठा करण्याचा प्रयत्न चालवला असताना मानमोडी, बुरशीसारख्या रोगांना प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.अशा परिस्थितीत शासनाने पिकांच्या संवर्धनासाठी पाहणी करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)