शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

बामणीच्या तलावात राहणार बारमाही पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 00:00 IST

बल्लारपूरला लागून असलेल्या बामणी (दुधोली) येथील तलावात आता बारमाही पाणी भरून राहणार आहे.

ठळक मुद्देकाम तीव्र गतीने सुरू : बल्लारपूर वेकोलिकडून पाणी पुरवठा

वसंत खेडेकर।आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : बल्लारपूरला लागून असलेल्या बामणी (दुधोली) येथील तलावात आता बारमाही पाणी भरून राहणार आहे. बल्लारपूर वेकोलिने तशी उपाययोजना केली असून पाणी पुरवठ्याकरिता पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू झाले आहे.बल्लारपूर येथे भूमीगत कोळसा खाण आहे. खाणीत झºयातून झिरपणारे पाणी पंपाद्वारे बाहेर फेकल्या जाते. मात्र ते पाणी वाया जात आहे. वाया जाणारे हे पाणी बामणीकडे वळवून तलावात ते साठवणे सुरू केल्यास हिवाळा व उन्हाळ्यात कोरडे पडत असलेले हे मोठे तलाव पाण्याने बाराही महिने भरून राहील. त्याचा फायदा जनावरे, शेतीला होईल तसेच गावातील हातपंप आणि विहिरींची पाण्याची पातळी उन्हाळ्यातही कायम राहील. पेयजलाचे संकट गावात उद्भवणार नाही, अशी कल्पना व उपाय सरपंच सुभाष ताजणे यांच्या मनात आले.वेकोलिने याकरिता पाणी द्यावे, अशी मागणी त्यांनी वेकोलिकडे केली. वेकोलिनेही ही मागणी मान्य केली. इतकेच नव्हे तर कोळसा खाण ते बामणी तलावापर्यंत पाणी पुरवठ्याकरिता पाईप लाईन टाकण्याची जबाबदारीही वेकोलि व्यवस्थापनाने स्वत:कडे घेतली. बल्लारपूर कॉलरी ते बामणीतील तलाव यात सुमारे दोन हजार मीटर अंतर आहे. एवढ्या मोठ्या अंतरात पाईप लाईन टाकली जात आहे. यावर प्राथमिक स्वरूपात ३२ लाख रुपये खर्च येणार आहे.पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून ते एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होवून त्यानंतर हा तलाव पाण्याने लबालब भरून राहणार आहे. वेकोलि हे काम जनहितार्थ असलेल्या कॅपीटल निधीतून करीत आहे. हा तलाव बाराही महिने पाण्याने भरून राहावा याकरिता वेकोलिने पुढाकार घेतला आहे. बल्लारपूर सब एरिया मॅनेजर जितेंद्र तिवारी, ज्येष्ठ अभियंता नरेंद्र उके, कार्यालय अधीक्षक पी.एस. पोटे हे पाणी लवकरात लवकर तलावात पोहचवावे, या कामी लागले आहेत.पावसातील पाण्याचा तलावात येणारा लोट ज्या मार्गाने येई, त्यातील बरेचसे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे हे तलाव पावसात तुडूंब भरत नाही. हिवाळ्यातच हा तलाव कोरडा पडतो. त्यावरुन उन्हाळ्यात या तलावाची काय स्थिती असणार, याची कल्पना येते.शनिवारला बामणीचे सरपंच सुभाष ताजने, उपसरपंच जमीन शेख, सदस्य श्रीहरी अंचुर, जि. प. सदस्य अ‍ॅड. हरिष गेडाम, संजय दरवडे यांनी वेकोलित जाऊन अधिकाºयांची भेट घेतली व सुरू असलेल्या कामाबाबत चर्चा केली.खोलीकरण आवश्यकबामणीतील हा जुना मामा तलाव १४ एकरात आहे व हे बल्लारपूर कोठारी मार्गावर गावात आणि रस्त्यालगत आहे. हे तलाव आधी बरेच खोल होते. माती उपसा न झाल्याने ते बरेचसे उथळ झाले आहे. त्यामुळे या तलावाचे खोलीकरण करणे आवश्यक झाले आहे. यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा.बामणी तलावाचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेकडे तशी मागणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या निधीतून जेवढे खोलीकरण करता येईल, तेवढे केले जाईल.- सुभाष ताजनेसरपंच, बामणी.