शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

टक्का वाढला, बाजी मुलींचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

कोरोनाची दुसरी लाट उसळल्याने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाची नवी पद्धत स्वीकारली होती.  परीक्षाच होणार नसल्याने राज्य मंडळातर्फे  विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक  नोंदविण्याच्या सूचना उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्या.  उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले. शाळांनी विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची माहिती राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली.

ठळक मुद्देबारावी निकाल ९९.८२ टक्केपरीक्षाविना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुणदान४४ विद्यार्थी नापासबल्लारपूर, गोंडपिपरी, सावली तालुक्याचा निकाल १०० टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या अंतर्गत मूल्यमापनाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९९.८२ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व व्होकेशनल या शाखांतील एकूण २४ हजार ७८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २४ हजार ७३७ विद्यार्थी उत्तीर्ण, तर ४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे यंदा परीक्षाच झाल्या नाहीत. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनानुसार गुण देण्यात आले. यंदाही टक्केवारीत मुलींनीच बाजी मारली आहे.कोरोनाची दुसरी लाट उसळल्याने राज्य सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाची नवी पद्धत स्वीकारली होती. परीक्षाच होणार नसल्याने राज्य मंडळातर्फे  विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक  नोंदविण्याच्या सूचना उच्च माध्यमिक शाळांना देण्यात आल्या.  उच्च माध्यमिक शाळा अथवा कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक अवगत करून दिले. शाळांनी विद्यार्थ्यांच्या बैठक क्रमांकाची माहिती राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केली.  त्या आधारावरच अंतर्गत मूल्यांकन करून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

‘त्या’ विद्यार्थ्यांना   देणार पुन्हा संधी२ जुलै २०२१ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार २०२१ मधील बारावी परीक्षेला श्रेणीसुधार योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधींमध्ये या परीक्षेची गणना केली जाणार नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना राज्य मंडळाकडून पुढील एक-दोन संधी देण्यात येणार आहे. 

असे झाले विद्यार्थ्यांचे मूल्यमापन बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन ३०: ३० : ४० फॉर्म्युल्यानुसार जाहीर झाले. दहावीचे ३० टक्के गुण, अकरावीचे ३० टक्के व बारावीच्या वर्षभरातील परीक्षांचे ४० टक्के गुण या आधारावर अंतिम निकाल घोषित झाला आहे. ११ वीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण (३० टक्के), १२ वी अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या व तत्सम मूल्यमापन गुण (३० टक्के), दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण (३० टक्के) असे यंदाच्या बारावी परीक्षेच्या मूल्यमापनाचे स्वरूप होते.

विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविता येणार

अंतर्गत मूल्यमापन निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. टपाल, ई-मेल किंवा व्यक्तिश: तक्रार नोंदविता येईल. अर्जाचा नमुना व तक्रारींच्या निरसनासाठी अधिकाऱ्यांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता आदी माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर दहा दिवसांत कार्यवाही करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांनी आपले आक्षेप नोंदवावे, असे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने दिली आहे. 

 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकाल