शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

स्वच्छता अभियानात वाढला लोकसहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:17 IST

बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे.

ठळक मुद्देशहराचा चेहरा बदलला : किल्ला स्वच्छता, गणपती घाटाचेही सौंदर्यीकरण

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे.स्पर्धा कोणतीही असो त्या विजेते चार - पाच जण ठरतात. पण, स्पर्धेत उतरणाऱ्या सर्वांना स्पर्धेतील विषयाचा अभ्यास करावा लागतो. स्पर्धेत पुरस्कार मिळाला तरी त्यातील अनुभवाचा पुढे फायदा होतो. स्वच्छता सर्वेक्षण २०१९ स्पर्धेबाबत नेमके हेच झाले आहे. नगर परिषदच्या स्वच्छता जनजागरण कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळाल्याने लोकांचे लक्ष स्वच्छतेकडे वळले. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच परिसर स्वच्छ राहावा, याकरिता प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मनात घाणीविषयी चीड निर्माण झाली. स्वच्छता अभियानात गाव स्वच्छ झाले. स्वच्छतेबाबत लोकांच्या मनात जागरूकता आली. या अभियानात ऐतिहासिक गोंडकालिन किल्ल्यांची स्वच्छता झाली. गणपती घाटाचे सौंदर्यीकरण केल्याने मन प्रसन्न होते. किल्ला परिसरात दरवर्षी हिरवा कचरा उगवायचा. उन्हाळा हिवाळ्यात हा कचरा सर्वत्र पसरतो. काही ठिकाणी झाडे उगवली. त्यामुळे किल्ल्यातील बराचसा दर्शनीय भाग झाकोळला गेला होता. किल्ल्यातील विहिरीत वृक्षांनी घर केले होते. हे दृष्य आता बदलत आहे. नागरिक पुढे येत असल्याने शहरातील दुर्लक्षित प्रभागातही स्वच्छतेचा संदेश पोहोचू लागला आहे.ऐतिहासिक किल्ल्यांचे वाढणार महत्त्वनदी काठावरील राणी महाल ऐतिहासिक आहे. परंतु, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याची खंत इतिहासपे्रमी व्यक्त करत होते. नगर परिषदने स्वच्छता अभियानादरम्यान किल्ला स्वच्छते काम हाती घेतले. लोकसहभागातून सुमारे अडीच महिने राबून किल्ल्याला कचऱ्यापासून मुक्त केले. किल्ला परिसरात उगवलेली झाडे तोडली. स्वच्छते काम अव्याहतपणे सुरू आहे.घाट नव्हे सहलस्थळ !अभियानात गणपती घाटाची स्वच्छता झाली. हे घाट आता सहल स्थळ म्हणून विकसीत झाले आहे. शहरातील घरोघरी शौचालय तयार झाले. यावर्षी पुस्काराने हुलकावणी दिली. परंतु नागरिकांच्या चुकीच्या सवयी बदलल्या.