शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
2
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
3
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
4
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
5
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
6
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
7
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
8
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
9
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
10
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
11
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला
12
Pune Crime: विजयने ११व्या मजल्यावरून मारली उडी, ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना
13
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
14
महाराष्ट्रातल्या मनगटात इतका दम आहे म्हणून.., प्रणित मोरेची खिल्ली उडवणाऱ्यांवर भडकला डीपी
15
"मला स्वातंत्र्य हवंय"; बॉयफ्रेंडच्या मदतीने बायकोने काढला नवऱ्याचा काटा, लोकेशन सांगितलं अन्...
16
TATA Motors ला ₹२,३८,६१,६६,००,००० चं मोठं नुकसान! JLR वर सायबर हल्ला; उत्पादन थांबलं, शेअर्समध्ये मोठी घसरण
17
हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
18
मूलबाळ नसलेल्या हिंदू महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती कुणाला मिळणार?; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
19
३०० पानांमध्ये लिहिलेत बाबाचे काळे कारनामे; इंस्टिट्यूटमध्ये होता टॉर्चर चेंबर! दिल्लीत खळबळ
20
GST मध्ये आणखी कपातीचे पंतप्रधान मोदींचे संकेत; म्हणाले, "आम्ही इकडेच थांबवणार नाही..."

स्वच्छता अभियानात वाढला लोकसहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:17 IST

बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे.

ठळक मुद्देशहराचा चेहरा बदलला : किल्ला स्वच्छता, गणपती घाटाचेही सौंदर्यीकरण

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : बल्लारपूर नगर परिषदेने स्वच्छता अभियानात सर्वेक्षण २०१९ स्पर्धेत सहभाग घेत शहराच्या स्वच्छतेवर भर दिला. विविध उपक्रम राबविले. शहराला पुरस्कार मिळाला नाही. परंतु, स्वच्छता अभियानात लोकसहभाग वाढून लोकोपयोगी संस्काराची शिकवण मिळाली आहे.स्पर्धा कोणतीही असो त्या विजेते चार - पाच जण ठरतात. पण, स्पर्धेत उतरणाऱ्या सर्वांना स्पर्धेतील विषयाचा अभ्यास करावा लागतो. स्पर्धेत पुरस्कार मिळाला तरी त्यातील अनुभवाचा पुढे फायदा होतो. स्वच्छता सर्वेक्षण २०१९ स्पर्धेबाबत नेमके हेच झाले आहे. नगर परिषदच्या स्वच्छता जनजागरण कार्यक्रमातून प्रोत्साहन मिळाल्याने लोकांचे लक्ष स्वच्छतेकडे वळले. प्रत्येकाने आपल्या घरासोबतच परिसर स्वच्छ राहावा, याकरिता प्रयत्न सुरू केल्याचे दिसून आले. नागरिकांच्या मनात घाणीविषयी चीड निर्माण झाली. स्वच्छता अभियानात गाव स्वच्छ झाले. स्वच्छतेबाबत लोकांच्या मनात जागरूकता आली. या अभियानात ऐतिहासिक गोंडकालिन किल्ल्यांची स्वच्छता झाली. गणपती घाटाचे सौंदर्यीकरण केल्याने मन प्रसन्न होते. किल्ला परिसरात दरवर्षी हिरवा कचरा उगवायचा. उन्हाळा हिवाळ्यात हा कचरा सर्वत्र पसरतो. काही ठिकाणी झाडे उगवली. त्यामुळे किल्ल्यातील बराचसा दर्शनीय भाग झाकोळला गेला होता. किल्ल्यातील विहिरीत वृक्षांनी घर केले होते. हे दृष्य आता बदलत आहे. नागरिक पुढे येत असल्याने शहरातील दुर्लक्षित प्रभागातही स्वच्छतेचा संदेश पोहोचू लागला आहे.ऐतिहासिक किल्ल्यांचे वाढणार महत्त्वनदी काठावरील राणी महाल ऐतिहासिक आहे. परंतु, स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याची खंत इतिहासपे्रमी व्यक्त करत होते. नगर परिषदने स्वच्छता अभियानादरम्यान किल्ला स्वच्छते काम हाती घेतले. लोकसहभागातून सुमारे अडीच महिने राबून किल्ल्याला कचऱ्यापासून मुक्त केले. किल्ला परिसरात उगवलेली झाडे तोडली. स्वच्छते काम अव्याहतपणे सुरू आहे.घाट नव्हे सहलस्थळ !अभियानात गणपती घाटाची स्वच्छता झाली. हे घाट आता सहल स्थळ म्हणून विकसीत झाले आहे. शहरातील घरोघरी शौचालय तयार झाले. यावर्षी पुस्काराने हुलकावणी दिली. परंतु नागरिकांच्या चुकीच्या सवयी बदलल्या.