शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर रेल्वे फाटकाच्या बंदमुळे नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:51 IST

विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला.

ठळक मुद्देमध्य रेल्वे प्रशासनाची मुजोरी : भुयारी मार्गात दिवाबत्तीची सुविधाही नाही, अनुचित घटना घडण्याची शक्यता

अनकेश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने मार्गावर दिवाबत्तीची सुविधा न करता ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाटक बुधवारपासून कायमचे बंद केले. परिणामी गावकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील तीनही रेल्वे लाईनवरून दररोज १५० वर रेल्वे गाड्याचे आवागमन होते. यामुळे मध्ये रेल्वे विभागाचे ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वेफाटक वाहन चालकांना त्रासदायक ठरले होते. यावर उपाययोजना म्हणून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहन चालकांना सदरचा मार्ग उपयुक्त आहे. परंतु पादचाऱ्यांना अनेक संकट आणणारा ठरला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाची किमान वर्षभर चाचणी घेवून ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाअक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. मात्र मग्रुर मध्य रेल्वे प्रशासनाचे तुघलकी निर्णय घेवून येथील नागरिकांना वेठीस धरले आहे.येथील ग्रामपंचायत प्रशसनाने नागपूर मध्य रेल्वे विभागाकडे नागरिकांना ये - जा करण्यासाठी पादचारी पुलाचे बांधकाम करावे, भुयारी मार्गादरम्यान दिवाबत्तीची व्यवस्था करावी व पावसाळ्यात भुयारी मार्ग बंद राहण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात येवू नये, म्हणून पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. मात्र मध्य रेल्वे विभागाने ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवित मुजारीने ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाटक कायम बंद केले. याबाबत नागपूर विभागाचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक श्रीवास्तव यांच्याशी संपर्क केला असता उत्तरदेखील देण्याचे टाळले. यामुळे गावकºयात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, भुयारी मार्ग दिवसरात्र वर्दळीचा आहे. भुयारी मार्गादरम्यान दिवाबत्तीची सुविधा नसल्याने असामाजिक तत्वाच्या लोकांकडून अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी व दिवसादेखील एकही महिला जावू शकत नाही. पादचाºयांना भुयारी मार्गातून आवागमन करताना जिवावर बेतणारे ठरू शकते. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे