शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

विसापूर रेल्वे फाटकाच्या बंदमुळे नागरिक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:51 IST

विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला.

ठळक मुद्देमध्य रेल्वे प्रशासनाची मुजोरी : भुयारी मार्गात दिवाबत्तीची सुविधाही नाही, अनुचित घटना घडण्याची शक्यता

अनकेश्वर मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : विसापूर गाव बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठे आहे. रेल्वेच्या तीन लाईनमुळे १५ हजारांवर लोकवस्तीचे गाव विभागले आहे. गावाच्या मध्यभागातून चौथी रेल्वे लाईन होवू घातली आहे. दळणवळणाची सुविधा म्हणून रेल्वे फाटकाजवळून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. मात्र मध्य रेल्वे प्रशासनाने मार्गावर दिवाबत्तीची सुविधा न करता ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाटक बुधवारपासून कायमचे बंद केले. परिणामी गावकऱ्यांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. यामुळे नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावातील तीनही रेल्वे लाईनवरून दररोज १५० वर रेल्वे गाड्याचे आवागमन होते. यामुळे मध्ये रेल्वे विभागाचे ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वेफाटक वाहन चालकांना त्रासदायक ठरले होते. यावर उपाययोजना म्हणून भुयारी मार्ग तयार करण्यात आला. वाहन चालकांना सदरचा मार्ग उपयुक्त आहे. परंतु पादचाऱ्यांना अनेक संकट आणणारा ठरला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गाची किमान वर्षभर चाचणी घेवून ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाअक कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेणे क्रमप्राप्त होते. मात्र मग्रुर मध्य रेल्वे प्रशासनाचे तुघलकी निर्णय घेवून येथील नागरिकांना वेठीस धरले आहे.येथील ग्रामपंचायत प्रशसनाने नागपूर मध्य रेल्वे विभागाकडे नागरिकांना ये - जा करण्यासाठी पादचारी पुलाचे बांधकाम करावे, भुयारी मार्गादरम्यान दिवाबत्तीची व्यवस्था करावी व पावसाळ्यात भुयारी मार्ग बंद राहण्याची सर्वाधिक शक्यता असल्याने रेल्वे फाटक बंद करण्यात येवू नये, म्हणून पत्रव्यवहार केल्याची माहिती आहे. मात्र मध्य रेल्वे विभागाने ग्रामपंचायतीच्या पत्राला केराची टोपली दाखवित मुजारीने ४५ एसपीएल क्रमांकाचे रेल्वे फाटक कायम बंद केले. याबाबत नागपूर विभागाचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक श्रीवास्तव यांच्याशी संपर्क केला असता उत्तरदेखील देण्याचे टाळले. यामुळे गावकºयात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, भुयारी मार्ग दिवसरात्र वर्दळीचा आहे. भुयारी मार्गादरम्यान दिवाबत्तीची सुविधा नसल्याने असामाजिक तत्वाच्या लोकांकडून अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी व दिवसादेखील एकही महिला जावू शकत नाही. पादचाºयांना भुयारी मार्गातून आवागमन करताना जिवावर बेतणारे ठरू शकते. एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. 

टॅग्स :railwayरेल्वे