शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

विसापुरात राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेअभावी नागरिक अडचणीत

By admin | Updated: January 9, 2017 00:38 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस देशाची संकल्पना जाहीर केली. याच अनुषंगाने चलनातील जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर दोन महिन्यांपूर्वी बंदी आणण्यात आली.

एटीएमची सुविधा नाही : नोटाबंदीचा ग्राहकांना फटकाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस देशाची संकल्पना जाहीर केली. याच अनुषंगाने चलनातील जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर दोन महिन्यांपूर्वी बंदी आणण्यात आली. त्याची झळ बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावाला विसापुरातील नागरिकांनाही बसली आहे. तेथे एटीएमची सुविधा नाही. गावात राष्ट्रीयकृत बँक नाही. त्यामुळे विसापुरातील नागरिकांना राष्ट्रीयकृत बँके अभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले विसापूर गाव आहे. तेथील लोकसंख्या १५ हजारांवर असून गावात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेच्या शाखा कार्यरत आहेत. मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे या बँकांचे महत्त्व नाममात्र उरल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील नागरिकांना बँकेचा व्यवहार करण्यासाठी बल्लारपूर व चंद्रपूरला जावे लागते. हा प्रकार नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. गावात एटीएमची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथील कर्मचारी पेपर मिल, वेकोलि, अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयात कामाला आहेत. बहुतेकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत केले जाते. गावात एटीएमधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र येथे राष्ट्रीयकृत बँक नसल्याने नोकरदारांसह शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही बँकेच्या खातेदारांना आजघडीला राष्ट्रीयकृत बँक खात्याची सक्ती केली जात असल्यामुळे गावात सदर बँक सुरू करण्याची नितांत गरज आहे.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाची वाटचाल ‘स्मार्ट गाव’ होण्याकडे सुरू आहे. गावातील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. गावाला लागून बंगरूळूच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन तयार होत आहे. राज्यातील दुसरी केंद्रीय सैनिकी शाळा, विसापूरच्या हद्दीत होऊ घातली आहे. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू होण्याच्या मार्गावर आहे. समाज कल्याण विभागाची निवासी शाळा येथे सुरू आहे. शासकीय व निमशासकीय संस्थाची रेलचेल होत असताना गावात राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे सर्वांनाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्याने विसापूर येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा होणे गरजेचे आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर गाव नावाजलेले आहे. हे एका गावासाठी पोलीस चौकी असलेले एकमेव गाव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिवंगत दादाजी सिंगाभट्टी यांच्या प्रयत्नामुळे गावात ग्रामीण बँक सुरू केली. त्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोकांची अडचण दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान थेट राष्ट्रीयकृत बँकेत जमा केले जाते. नव्या निर्णयामुळे राष्ट्रीयकृत बँक शाखेला महत्त्व आल्याने विसापुरात सदर बँक सुरू करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एटीएमची सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.- रामभाऊ टोंगे, जिल्हा परिषद सदस्य, विसापूर