शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

विसापुरात राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेअभावी नागरिक अडचणीत

By admin | Updated: January 9, 2017 00:38 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस देशाची संकल्पना जाहीर केली. याच अनुषंगाने चलनातील जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर दोन महिन्यांपूर्वी बंदी आणण्यात आली.

एटीएमची सुविधा नाही : नोटाबंदीचा ग्राहकांना फटकाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस देशाची संकल्पना जाहीर केली. याच अनुषंगाने चलनातील जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर दोन महिन्यांपूर्वी बंदी आणण्यात आली. त्याची झळ बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावाला विसापुरातील नागरिकांनाही बसली आहे. तेथे एटीएमची सुविधा नाही. गावात राष्ट्रीयकृत बँक नाही. त्यामुळे विसापुरातील नागरिकांना राष्ट्रीयकृत बँके अभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले विसापूर गाव आहे. तेथील लोकसंख्या १५ हजारांवर असून गावात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेच्या शाखा कार्यरत आहेत. मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे या बँकांचे महत्त्व नाममात्र उरल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील नागरिकांना बँकेचा व्यवहार करण्यासाठी बल्लारपूर व चंद्रपूरला जावे लागते. हा प्रकार नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. गावात एटीएमची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथील कर्मचारी पेपर मिल, वेकोलि, अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयात कामाला आहेत. बहुतेकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत केले जाते. गावात एटीएमधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र येथे राष्ट्रीयकृत बँक नसल्याने नोकरदारांसह शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही बँकेच्या खातेदारांना आजघडीला राष्ट्रीयकृत बँक खात्याची सक्ती केली जात असल्यामुळे गावात सदर बँक सुरू करण्याची नितांत गरज आहे.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाची वाटचाल ‘स्मार्ट गाव’ होण्याकडे सुरू आहे. गावातील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. गावाला लागून बंगरूळूच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन तयार होत आहे. राज्यातील दुसरी केंद्रीय सैनिकी शाळा, विसापूरच्या हद्दीत होऊ घातली आहे. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू होण्याच्या मार्गावर आहे. समाज कल्याण विभागाची निवासी शाळा येथे सुरू आहे. शासकीय व निमशासकीय संस्थाची रेलचेल होत असताना गावात राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे सर्वांनाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्याने विसापूर येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा होणे गरजेचे आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर गाव नावाजलेले आहे. हे एका गावासाठी पोलीस चौकी असलेले एकमेव गाव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिवंगत दादाजी सिंगाभट्टी यांच्या प्रयत्नामुळे गावात ग्रामीण बँक सुरू केली. त्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोकांची अडचण दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान थेट राष्ट्रीयकृत बँकेत जमा केले जाते. नव्या निर्णयामुळे राष्ट्रीयकृत बँक शाखेला महत्त्व आल्याने विसापुरात सदर बँक सुरू करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एटीएमची सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.- रामभाऊ टोंगे, जिल्हा परिषद सदस्य, विसापूर