शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
5
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
6
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
7
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
8
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
9
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
10
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
11
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
12
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
13
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
14
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
15
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
16
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
17
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
18
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
19
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
20
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक

विसापुरात राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेअभावी नागरिक अडचणीत

By admin | Updated: January 9, 2017 00:38 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस देशाची संकल्पना जाहीर केली. याच अनुषंगाने चलनातील जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर दोन महिन्यांपूर्वी बंदी आणण्यात आली.

एटीएमची सुविधा नाही : नोटाबंदीचा ग्राहकांना फटकाअनेकश्वर मेश्राम बल्लारपूरदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस देशाची संकल्पना जाहीर केली. याच अनुषंगाने चलनातील जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर दोन महिन्यांपूर्वी बंदी आणण्यात आली. त्याची झळ बल्लारपूर तालुक्यातील सर्वात मोठ्या गावाला विसापुरातील नागरिकांनाही बसली आहे. तेथे एटीएमची सुविधा नाही. गावात राष्ट्रीयकृत बँक नाही. त्यामुळे विसापुरातील नागरिकांना राष्ट्रीयकृत बँके अभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे.बल्लारपूर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले विसापूर गाव आहे. तेथील लोकसंख्या १५ हजारांवर असून गावात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व वैनगंगा कृष्णा ग्रामीण बँकेच्या शाखा कार्यरत आहेत. मात्र नोटबंदीच्या निर्णयामुळे या बँकांचे महत्त्व नाममात्र उरल्याचे दिसून येते. त्यामुळे येथील नागरिकांना बँकेचा व्यवहार करण्यासाठी बल्लारपूर व चंद्रपूरला जावे लागते. हा प्रकार नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. गावात एटीएमची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे.येथील कर्मचारी पेपर मिल, वेकोलि, अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयात कामाला आहेत. बहुतेकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेमार्फत केले जाते. गावात एटीएमधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र येथे राष्ट्रीयकृत बँक नसल्याने नोकरदारांसह शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. कोणत्याही बँकेच्या खातेदारांना आजघडीला राष्ट्रीयकृत बँक खात्याची सक्ती केली जात असल्यामुळे गावात सदर बँक सुरू करण्याची नितांत गरज आहे.बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावाची वाटचाल ‘स्मार्ट गाव’ होण्याकडे सुरू आहे. गावातील मुख्य रस्ता व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले आहेत. गावाला लागून बंगरूळूच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डन तयार होत आहे. राज्यातील दुसरी केंद्रीय सैनिकी शाळा, विसापूरच्या हद्दीत होऊ घातली आहे. तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू होण्याच्या मार्गावर आहे. समाज कल्याण विभागाची निवासी शाळा येथे सुरू आहे. शासकीय व निमशासकीय संस्थाची रेलचेल होत असताना गावात राष्ट्रीयकृत बँक नसल्यामुळे सर्वांनाच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नोटाबंदीचा निर्णय झाल्याने विसापूर येथे राष्ट्रीयकृत बँक शाखा होणे गरजेचे आहे.बल्लारपूर तालुक्यात विसापूर गाव नावाजलेले आहे. हे एका गावासाठी पोलीस चौकी असलेले एकमेव गाव आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक दिवंगत दादाजी सिंगाभट्टी यांच्या प्रयत्नामुळे गावात ग्रामीण बँक सुरू केली. त्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँक शाखा लोकांची अडचण दूर करण्यासाठी सुरू करण्यात आली. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान थेट राष्ट्रीयकृत बँकेत जमा केले जाते. नव्या निर्णयामुळे राष्ट्रीयकृत बँक शाखेला महत्त्व आल्याने विसापुरात सदर बँक सुरू करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे एटीएमची सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे.- रामभाऊ टोंगे, जिल्हा परिषद सदस्य, विसापूर