शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
6
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
7
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
8
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
9
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
10
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
11
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
12
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
13
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
14
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
15
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
16
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
17
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
18
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
19
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
20
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार

तपोभूमीतील नागरिकांनी केले गावात श्रमदान

By admin | Updated: November 8, 2014 01:04 IST

‘एक तरी हात खोदावी जमीन, तेची पुजनाहुनी पूजन’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे.

पेंढरी (कोके) : ‘एक तरी हात खोदावी जमीन, तेची पुजनाहुनी पूजन’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे. याच धर्तीवर राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी पर्वावर गावकऱ्यांनी तपोभूमीत श्रमदान करुन राष्ट्रसंताला आदरांजली अर्पण केली. दानात दान रक्तदान, तसेच दानात दान श्रमदान हेही घोषवाक्य आता पुढे येऊ लागले आहे. प्रा. नीळकंंठ लोनबले यांच्या संंकल्पनेतून सरपंच विष्णुदास मगरे, नामदेवराव घोडाम, संजय धारणे, चंद्रभान बारेकर, विजय श्रीरामे, गुलाम घोडाम, रमेश गायकवाड आदींंच्या परिश्रमातून राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी पर्वाचे औचित्य साधून तपोभूमीत श्रमदान केले. त्यापूर्वी तीन दिवस राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. यात सामुदायिक ध्यान, साधना, प्रार्थना, रामधून, स्वच्छता, रांगोळी स्पर्धा, सायकल स्पर्धा, भजन, कीर्तन असे उपक्रम साजरे करण्यात आले. यात विठ्ठलराव वाढई, सुधाकर चौधरी, हरीजी मेश्राम, दौलत घरत, रघुनाथ धारणे, मोरेश्वर सोनुले, भाऊराव वाढई, रुपचंद धारणे, इतर गावकरी व आश्रमशाळेचे विद्यार्थी- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)तीर्थक्षेत्र गोंदेडाचा विकास कराराष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा ‘क’ तीर्थक्षेत्र म्हणून जेव्हापासून घोषित झाली. तेव्हापासून ती विकासापासून अजूनपर्यंत उपेक्षित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बालपणी चिमूर तालुक्यातील गोंदेडा येथे तपश्चर्या केली. तेव्हापासून या साधनाभूमीला ‘तपोभूमी’ म्हणून संबोधतात. मागील तीन वर्षा अगोदर या तपोभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्रात सर्व जाती-धर्माचे लोक दर्शनासाठी येतात. पर्यटन वा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, यात्री निवास, सौंदर्यीकरण व पार्किंग आदी सुविधासाठी शासन दरवर्षी चार ते पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी संबंधित तहसीलदारांनी सदर तीर्थस्थळावर एक वर्षात एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी किंवा यात्रा स्थळाची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करावी लागते. गोंदेडा तीर्थस्थळावर दरवर्षी पौष पोर्णिमेला यात्रा भरते. त्या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात व वर्षभर धरुन दीड लाखाच्यावर भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु हे तीर्थक्षेत्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अजुनही विकासापासून कोसोदूर आहे. नवीन सरकारने या क्षेत्राचा विकास करावा, अशी मागणी परिसरातील गुरुदेव भक्तांनी केली आहे.