शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

तपोभूमीतील नागरिकांनी केले गावात श्रमदान

By admin | Updated: November 8, 2014 01:04 IST

‘एक तरी हात खोदावी जमीन, तेची पुजनाहुनी पूजन’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे.

पेंढरी (कोके) : ‘एक तरी हात खोदावी जमीन, तेची पुजनाहुनी पूजन’ असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे. याच धर्तीवर राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी पर्वावर गावकऱ्यांनी तपोभूमीत श्रमदान करुन राष्ट्रसंताला आदरांजली अर्पण केली. दानात दान रक्तदान, तसेच दानात दान श्रमदान हेही घोषवाक्य आता पुढे येऊ लागले आहे. प्रा. नीळकंंठ लोनबले यांच्या संंकल्पनेतून सरपंच विष्णुदास मगरे, नामदेवराव घोडाम, संजय धारणे, चंद्रभान बारेकर, विजय श्रीरामे, गुलाम घोडाम, रमेश गायकवाड आदींंच्या परिश्रमातून राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी पर्वाचे औचित्य साधून तपोभूमीत श्रमदान केले. त्यापूर्वी तीन दिवस राष्ट्रसंतांचा पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्यात आला. यात सामुदायिक ध्यान, साधना, प्रार्थना, रामधून, स्वच्छता, रांगोळी स्पर्धा, सायकल स्पर्धा, भजन, कीर्तन असे उपक्रम साजरे करण्यात आले. यात विठ्ठलराव वाढई, सुधाकर चौधरी, हरीजी मेश्राम, दौलत घरत, रघुनाथ धारणे, मोरेश्वर सोनुले, भाऊराव वाढई, रुपचंद धारणे, इतर गावकरी व आश्रमशाळेचे विद्यार्थी- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)तीर्थक्षेत्र गोंदेडाचा विकास कराराष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा ‘क’ तीर्थक्षेत्र म्हणून जेव्हापासून घोषित झाली. तेव्हापासून ती विकासापासून अजूनपर्यंत उपेक्षित आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बालपणी चिमूर तालुक्यातील गोंदेडा येथे तपश्चर्या केली. तेव्हापासून या साधनाभूमीला ‘तपोभूमी’ म्हणून संबोधतात. मागील तीन वर्षा अगोदर या तपोभूमीला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. समतेचा संदेश देणाऱ्या तीर्थक्षेत्रात सर्व जाती-धर्माचे लोक दर्शनासाठी येतात. पर्यटन वा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुलभ शौचालय, यात्री निवास, सौंदर्यीकरण व पार्किंग आदी सुविधासाठी शासन दरवर्षी चार ते पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देतो. त्यासाठी संबंधित तहसीलदारांनी सदर तीर्थस्थळावर एक वर्षात एक लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी किंवा यात्रा स्थळाची शिफारस जिल्हा प्रशासनाकडे करावी लागते. गोंदेडा तीर्थस्थळावर दरवर्षी पौष पोर्णिमेला यात्रा भरते. त्या यात्रेला लाखो भाविक उपस्थित राहतात व वर्षभर धरुन दीड लाखाच्यावर भाविक येथे दर्शनासाठी येतात. परंतु हे तीर्थक्षेत्र लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे अजुनही विकासापासून कोसोदूर आहे. नवीन सरकारने या क्षेत्राचा विकास करावा, अशी मागणी परिसरातील गुरुदेव भक्तांनी केली आहे.