जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : देशभरातून पेन्शनधारकांचे पंतप्रधानांना निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवृत्त कर्मचारी समन्वय समिती चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी निवेदन देण्यात आले. निवृत्त कर्मचारी समन्वय समिती (राष्ट्रीय संघटन) नवी दिल्ली, यांच्या निर्देशानुसार देशभरातून पेन्शनधारकांतर्फे निवेदन देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. समन्वय समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीनेही जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालण्यात आले.सदर निवेदनात कोशीयारी समितीच्या शिफारशीची त्वरित अमंलबजावणी व्हावी, यासंर्भात राष्ट्रीय संघटनेच्या प्रतिनिधीसोबत चर्चेची मागणी करण्यात आली, एक हजार ते अडीच हजार रुपये या अत्यल्प पेन्शन राशीमध्ये पेंशनधारक सन्मानाने जीवन जगू शकत नसल्याने पेन्शनवाढ करण्यात यावी, याकडे पंतप्रधानाचे गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच सुप्रिम कोर्ट, नवी दिल्ली, यांचया ४ आक्टोंबर २०१६ च्या आदेशान्वये निवृत्तीसमयीच्या उच्च वेतनावर पेन्शन निश्चितीचा लाभ सर्वसंबंधितांना मिळेल. याप्रकरणी ईपीएसओची कार्यवाही करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष सूर्यनारायण बत्तुलवार, कार्याध्यक्ष आर.एन. कुळकर्णी, सचिव प्रकाश वनक, उपाध्यक्ष शेरेकर, पांडूरंग गावतूरे, पांडूरंग लोडे, शशिकांत देशकर, विनायक खाडे, रूषी पारशिवे, बापूराव चौधरी, पंढरी सत्र, शामराव बोबडे, एल. बी. डागेवार, वसंत रणदिवे, विजय खनके आदी पेन्शनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी पेन्शनधारकांचे साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:46 IST