शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
3
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
4
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
5
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
6
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
7
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
8
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
9
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
10
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
11
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
12
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
13
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
14
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
15
दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार : अजित पवार
16
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
17
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
18
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
19
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
20
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

आयुध निर्माणीतील कामगारांच्या प्रलंबित समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:12 IST

मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचा पुढाकार : कामगार संघटना व पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली. याची दखल घेत अहीर यांनी शनिवारी निर्माणीतील सर्व कामगार संघटनांच्या पदाधिकारी, निर्माणी प्रशासनातील अधिकारी यांची बैठक वसाहतीतील हिरा हाउस येथे घेउन अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली. याप्रसंगी या समस्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन अहीर यांनी कामगार नेत्यांना दिली. तसेच याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश निर्माणी प्रशासनाला दिले.सन २०१२ व २०१६ या काळात येथील निर्माणीमध्ये विविध पदांसाठी ५६८ रिक्त जागा भरण्याबाबत जाहिरात काढण्यात आली होती. या जागांसाठी पात्र अर्जदारांनी अर्जसुद्धा केले होते. मात्र त्यानंतर या जागांची भरती खोळंबली. यावर निर्माणी प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याचप्रमाणे येथील २४० अनुकंपाधारकांची निवड प्रक्रिया दोन वर्षापूर्वीच पार पडली. यात पाच टक्के प्रमाणे ३५ जागा भरण्याची निर्माणी प्रशासनाने कारवाई केली. याबाबतची यादीही प्रकाशित केली. परंतु, भरतीची कारवाई अजूनही सुरू करण्यात आली नाही. सद्यास्थितीत एकही जागा भरण्यात आली नाही. यावर त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश अहीर यांनी बैठकीत महाप्रबंधकांना दिले.त्याचप्रमाणे येथील दवाखान्यात पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रूग्णांना येथून नागपूरला हलविण्यात येते. त्यामुळे रूग्ण आणि नातेवाईकांना हेलपाटे खावून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दवाखान्याचे आधुनिकीकरण करून येथे सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.बैठकीला आयुधनिर्माणीचे महाव्यवस्थापक रजनिश लोडवाल, महेश गुप्ता, तहसीलदार महेश शिंतोळे, राहुल सराफ, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, प्रवणी सातपुते, किशोर गोवारदिपे, पंढरी पिंपळकर, प्रकाश हरीदासन, राकेश पवार, सुनिल पवार, शितल वालदे, भारतीय सुरक्षा मजदूर संघाचे मनीष मत्ते, संजयसिंग, सदानंद गुप्ता व कैलास तिवारी, इंटक राजेश यादव, ओमप्रकाश पांडे, सिटूचे सदानंद वाघ, एनजीओचे संदीप मुळे उपस्थित होते.कामगारांचे शोषण थांबवानिर्माणीतील खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ४५० कामगार काम करीत आहेत. मात्र, या कामगारांचे आर्थिक शोषण कंपन्यांकडून होत आहे. कामगारांचे वेतन बरोबर मिळत नाही. यात त्वरीत सुधारणा करण्यात यावी, स्थायी कामगारांना काम तथा नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कामगारांनी केली. याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन ना. अहीर यांनी दिले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर