शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

आयुध निर्माणीतील कामगारांच्या प्रलंबित समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:12 IST

मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली.

ठळक मुद्देहंसराज अहीर यांचा पुढाकार : कामगार संघटना व पदाधिकाऱ्यांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : मागील काही वर्षांपासून आयुध निर्माणीतील नोकरभरती तसेच अनुकंपाधारकांची भरती खोळंबलेली आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कामगारांच्या समस्यांबाबतची अमंलबजावणी होत नसल्याची तक्रार ना. हंसराज अहीर यांना प्राप्त झाली. याची दखल घेत अहीर यांनी शनिवारी निर्माणीतील सर्व कामगार संघटनांच्या पदाधिकारी, निर्माणी प्रशासनातील अधिकारी यांची बैठक वसाहतीतील हिरा हाउस येथे घेउन अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली. याप्रसंगी या समस्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन अहीर यांनी कामगार नेत्यांना दिली. तसेच याबाबतची कारवाई करण्याचे निर्देश निर्माणी प्रशासनाला दिले.सन २०१२ व २०१६ या काळात येथील निर्माणीमध्ये विविध पदांसाठी ५६८ रिक्त जागा भरण्याबाबत जाहिरात काढण्यात आली होती. या जागांसाठी पात्र अर्जदारांनी अर्जसुद्धा केले होते. मात्र त्यानंतर या जागांची भरती खोळंबली. यावर निर्माणी प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्याचप्रमाणे येथील २४० अनुकंपाधारकांची निवड प्रक्रिया दोन वर्षापूर्वीच पार पडली. यात पाच टक्के प्रमाणे ३५ जागा भरण्याची निर्माणी प्रशासनाने कारवाई केली. याबाबतची यादीही प्रकाशित केली. परंतु, भरतीची कारवाई अजूनही सुरू करण्यात आली नाही. सद्यास्थितीत एकही जागा भरण्यात आली नाही. यावर त्वरीत कारवाई करण्याचे निर्देश अहीर यांनी बैठकीत महाप्रबंधकांना दिले.त्याचप्रमाणे येथील दवाखान्यात पुरेशी वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रूग्णांना येथून नागपूरला हलविण्यात येते. त्यामुळे रूग्ण आणि नातेवाईकांना हेलपाटे खावून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दवाखान्याचे आधुनिकीकरण करून येथे सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.बैठकीला आयुधनिर्माणीचे महाव्यवस्थापक रजनिश लोडवाल, महेश गुप्ता, तहसीलदार महेश शिंतोळे, राहुल सराफ, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, प्रवणी सातपुते, किशोर गोवारदिपे, पंढरी पिंपळकर, प्रकाश हरीदासन, राकेश पवार, सुनिल पवार, शितल वालदे, भारतीय सुरक्षा मजदूर संघाचे मनीष मत्ते, संजयसिंग, सदानंद गुप्ता व कैलास तिवारी, इंटक राजेश यादव, ओमप्रकाश पांडे, सिटूचे सदानंद वाघ, एनजीओचे संदीप मुळे उपस्थित होते.कामगारांचे शोषण थांबवानिर्माणीतील खासगी कंपन्यांच्या माध्यमातून ४५० कामगार काम करीत आहेत. मात्र, या कामगारांचे आर्थिक शोषण कंपन्यांकडून होत आहे. कामगारांचे वेतन बरोबर मिळत नाही. यात त्वरीत सुधारणा करण्यात यावी, स्थायी कामगारांना काम तथा नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी कामगारांनी केली. याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन ना. अहीर यांनी दिले.

टॅग्स :Hansraj Ahirहंसराज अहिर