शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

बल्लारशाहतून नवीन रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा; ३ जुलै रोजी होणार चाचणी

By साईनाथ कुचनकार | Updated: June 28, 2023 15:44 IST

रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे का पूर्ण 

चंद्रपूर : मागील चार वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या ३ जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर ही पिटलाइन रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित होताच या स्थानकातून विविध रेल्वे गाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

७ मार्च २०१९ रोजी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पुढाकार घेत शासनाकडून ११.१५ रुपये मंजूर करून २६ बोगींच्या पिटलाइनच्या कामाचा शुभारंभ केला होता. दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे या कामाला विलंब झाला. कामाच्या विलंबामुळे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी वेळोवेळी पिटलाइनच्या कामाची पाहणी करून संबंधितांना काम त्वरित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. सततचा पत्रव्यवहार आणि प्रयत्नांमुळे अखेर पिटलाइनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या कामाची एमएनटीद्वारे चाचणी होणार आहे. यासाठी ३ जुलै रोजी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पिटलाइन सुरू होताच येथून मुंबईसाठी थेट रेल्वेही लवकरच सुरू होईल, अशी आशा झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी व्यक्त केली.

मध्य भारतातील महत्त्वाचे स्टेशन

बल्लारशाह रेल्वे स्टेशन हे मध्य भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनचा त्रिवेणी संगम आहे. या स्थानकातून चंद्रपूर, गडचिरोली, तेलंगणा सीमावर्ती भागातील प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता येथे पिटलाइन सुरू करण्यात येणार आहे.

बल्लारशा रेल्वे स्थानकावर पिटलाइन सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान, कोरोना संकट काळानंतर येथून थेट मुंबईला जाणारी सेवाग्राम ही एकमेव ट्रेनही बंद करण्यात आली. परिणामी, प्रवाशांना मुंबईला जाणे तसेच मुंबई येथून चंद्रपूरला येणे कठीण झाले आहे. या पिटलाइनचे काम आता पूर्ण झाले असून, लवकरच येथून नवीन रेल्वे सुरू होतील, अशी आशा आहे.

- श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेballarpur-acबल्लारपूरchandrapur-acचंद्रपूर