शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
5
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
6
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
7
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
8
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
9
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
10
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
11
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
12
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
13
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
14
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
15
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
16
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
17
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
18
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
19
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट

बल्लारशाहतून नवीन रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा; ३ जुलै रोजी होणार चाचणी

By साईनाथ कुचनकार | Updated: June 28, 2023 15:44 IST

रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे का पूर्ण 

चंद्रपूर : मागील चार वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या ३ जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर ही पिटलाइन रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित होताच या स्थानकातून विविध रेल्वे गाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

७ मार्च २०१९ रोजी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पुढाकार घेत शासनाकडून ११.१५ रुपये मंजूर करून २६ बोगींच्या पिटलाइनच्या कामाचा शुभारंभ केला होता. दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे या कामाला विलंब झाला. कामाच्या विलंबामुळे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी वेळोवेळी पिटलाइनच्या कामाची पाहणी करून संबंधितांना काम त्वरित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. सततचा पत्रव्यवहार आणि प्रयत्नांमुळे अखेर पिटलाइनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या कामाची एमएनटीद्वारे चाचणी होणार आहे. यासाठी ३ जुलै रोजी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पिटलाइन सुरू होताच येथून मुंबईसाठी थेट रेल्वेही लवकरच सुरू होईल, अशी आशा झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी व्यक्त केली.

मध्य भारतातील महत्त्वाचे स्टेशन

बल्लारशाह रेल्वे स्टेशन हे मध्य भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनचा त्रिवेणी संगम आहे. या स्थानकातून चंद्रपूर, गडचिरोली, तेलंगणा सीमावर्ती भागातील प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता येथे पिटलाइन सुरू करण्यात येणार आहे.

बल्लारशा रेल्वे स्थानकावर पिटलाइन सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान, कोरोना संकट काळानंतर येथून थेट मुंबईला जाणारी सेवाग्राम ही एकमेव ट्रेनही बंद करण्यात आली. परिणामी, प्रवाशांना मुंबईला जाणे तसेच मुंबई येथून चंद्रपूरला येणे कठीण झाले आहे. या पिटलाइनचे काम आता पूर्ण झाले असून, लवकरच येथून नवीन रेल्वे सुरू होतील, अशी आशा आहे.

- श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेballarpur-acबल्लारपूरchandrapur-acचंद्रपूर