शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

बल्लारशाहतून नवीन रेल्वे सुरू होण्याचा मार्ग मोकळा; ३ जुलै रोजी होणार चाचणी

By साईनाथ कुचनकार | Updated: June 28, 2023 15:44 IST

रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे का पूर्ण 

चंद्रपूर : मागील चार वर्षांपासून बांधकाम सुरू असलेल्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पिटलाइनचे काम आता जवळपास पूर्ण झाले आहे. येत्या ३ जुलै रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडून त्याची चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानंतर ही पिटलाइन रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित होताच या स्थानकातून विविध रेल्वे गाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

७ मार्च २०१९ रोजी ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी पुढाकार घेत शासनाकडून ११.१५ रुपये मंजूर करून २६ बोगींच्या पिटलाइनच्या कामाचा शुभारंभ केला होता. दरम्यानच्या काळात कोरोना संकटामुळे या कामाला विलंब झाला. कामाच्या विलंबामुळे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी वेळोवेळी पिटलाइनच्या कामाची पाहणी करून संबंधितांना काम त्वरित करण्यासंदर्भात सूचना दिल्या. सततचा पत्रव्यवहार आणि प्रयत्नांमुळे अखेर पिटलाइनचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या कामाची एमएनटीद्वारे चाचणी होणार आहे. यासाठी ३ जुलै रोजी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

पिटलाइन सुरू होताच येथून मुंबईसाठी थेट रेल्वेही लवकरच सुरू होईल, अशी आशा झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, श्रीनिवास सुंचूवार, डीआरयूसीसी सदस्य विकास राजूरकर यांनी व्यक्त केली.

मध्य भारतातील महत्त्वाचे स्टेशन

बल्लारशाह रेल्वे स्टेशन हे मध्य भारतातील एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. या रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे झोनचा त्रिवेणी संगम आहे. या स्थानकातून चंद्रपूर, गडचिरोली, तेलंगणा सीमावर्ती भागातील प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता येथे पिटलाइन सुरू करण्यात येणार आहे.

बल्लारशा रेल्वे स्थानकावर पिटलाइन सुरू करण्यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे मागील अनेक वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान, कोरोना संकट काळानंतर येथून थेट मुंबईला जाणारी सेवाग्राम ही एकमेव ट्रेनही बंद करण्यात आली. परिणामी, प्रवाशांना मुंबईला जाणे तसेच मुंबई येथून चंद्रपूरला येणे कठीण झाले आहे. या पिटलाइनचे काम आता पूर्ण झाले असून, लवकरच येथून नवीन रेल्वे सुरू होतील, अशी आशा आहे.

- श्रीनिवास सुंचूवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेballarpur-acबल्लारपूरchandrapur-acचंद्रपूर