लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घरातच स्वत:ची काळजी घेत स्वच्छतेकडे लक्ष देत आहे. त्यातच उद्योग, व्यापार बंद असल्याने पर्यावरण प्रदूषण कमी झाले आहे. परिणामी इतर दिवसांच्या तुलनेमध्ये सध्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे.कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु आहे. लॉकडाऊनमुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहे. परिणामी नागरिक घरातच स्वत:ची काळजी घेत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे बहुतांश खासगी रुग्णालये रुग्णांच्या प्रतिक्षेत आहे. इतरवेळी ज्या खासगी रुग्णालयांमध्ये नंबर लावण्यासाठी दोन-दोन दिवसांचा कालावधी लागत होता. त्या रुग्णालयांमध्येही सध्या गर्दी कमी झाली आहे.अनेकवेळा बहुतांश नागरिक छोट्या-छोट्या गोष्टींसाठी रुग्णालयामध्ये धाव घेतात. मात्र लॉकडाऊनंतर ते सुद्धा रुग्णालयात भटकताना दिसत नाही. एवढेच नाही तर अपघाताचे प्रमाणही कमी झाल्यामुळे या रुग्णलयामध्येही रुग्णसंख्या घटली आहे.नियमित तपासणी सुरूचलॉकडाऊननंतर नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे सुरु केले आहे. परिणाम छोट्या-छोट्या आरोग्याच्या तक्रारी झपाट्याने कमी झाल्या आहे. त्यामुळे काही खासगी रुग्णालये ओस पडल्याची स्थिती आहे. दुसरीकडे गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी तज्ज्ञांकडे जात आहे.कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बहुतांश नागरिक घरात आहेत. बाहेरील इतर पदार्थ खाणे बंद झाले आहे. काहींनी खाण्यापिण्याच्या सवईमध्ये बदल केला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना आजारी पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, लॉकडाऊन संपेपर्यंत घरीच थांबून सुरक्षितता बाळगावी.- निवृत्ती राठोडजिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर