शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

‘एका बाकावर एक विद्यार्थी‘ अटीने शाळांसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 05:00 IST

 जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या बाबींवर चर्चा करणे आवश्यक आहे. समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्वच शाळांच्या इयत्ता १ ते ४ व शहरी भागात १ ते ७ वीचे वर्ग  सुरू करण्यास परवानगी मिळाली.  मात्र, वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे बैठक व्यवस्था असावी, असे मार्गदर्शक तत्त्वात नमूद केल्याने गुरुवारी शाळांचा दुसरा दिवस गोंधळात गेला. याच गोंधळामुळे काही शाळांमध्ये तासिकाच झाल्या नसल्याचे समजते. जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार शाळा समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी दिलेल्या बाबींवर चर्चा करणे आवश्यक आहे. समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी संबंधित शहरात, गावात कोविडचा प्रादुर्भाव कमी झालेला असावा. सर्व शिक्षकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना गर्दी टाळण्यासाठी शाळेच्या परिसरात प्रवेश देऊ नये. कोविडसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, जास्त विद्यार्थी असलेल्या शाळांमध्ये दोन सत्रांमध्ये, एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर, एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी, सतत हात साबणाने धुणे, मास्कचा वापर, लक्षण असल्यास विद्यार्थ्यांना वैद्यकीय अधिकारी अथवा नजीकच्या आरोग्य केंद्रांमध्ये पाठवावे. विद्यार्थी कोविडग्रस्त झाल्याचे आढळल्यास शाळा बंद करून शाळा निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना केल्या आहेत.

मुख्याध्यापक संभ्रमात- शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कोविडसाठीची ४८ तासांपूर्वीची आरटीपीसीआर चाचणी करावी. प्रयोगशाळेने दिलेले प्रमाणपत्र शाळा व्यवस्थापनास सादर करावे. - शाळा सुरू केल्यानंतर मुलांना टप्पाटप्प्यांत वर्गात बोलविण्याच्या सूचना गुरुवारी जारी केल्या. शुक्रवारी पहिल्या दिवशी सरसकट सर्वच मुलांना वर्गात बोलाविले होते. - नवीन सूचनेमुळे मुख्याध्यापक संभ्रमात सापडले आहेत.

 शाळा समिती व पालकांची भूमिका महत्त्वाची  विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित राहण्यापूर्वी पालकांची संमती आवश्यक असेल. जि. प. शाळांनी याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने पालकांशी चर्चा करावी, असेही सुचविण्यात आले. शुक्रवारी बऱ्याच शाळांनी समितीची चर्चा करून शाळा सुरू केली होती. मात्र, पहिल्या दिवशी जिल्हास्तरावरील मार्गदर्शक सूचना जारी झाले नव्हते. आज प्रशासनाने याबाबत सूचित केले. त्यामुळे स्थानिक स्थिती लक्षात घेऊन आदेशापर्यंत वर्ग सुरू ठेवण्यास शाळा समिती व पालकांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा