शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

बसथांब्याअभावी प्रवाशांची अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:22 IST

चंद्रपूर : शहरातून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शहरातील मुख्य चौकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष ...

चंद्रपूर : शहरातून धावणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला शहरातील मुख्य चौकात थांबा देण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीतर्फे वाहतूक निरीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

कोरोनामुळे बंद केलेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू झाल्या आहेत. मात्र ग्रामीण भागातील बसफेऱ्या अद्यापही बंद आहेत. परिणामी शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांची मोठी पंचाईत होत आहे. तसेच चंद्रपूर शहरातील मुख्य चौकातही बस थांबत नसल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहरातून राजुरा-बल्लारपूर-ऊर्जानगर बस सुरू करून बागलानगर, अंचलेश्वर गेट, गांधी चौक, आझाद गार्ड, जटपुरा गेट, बसस्थानक, तुकूम, दुर्गापूर, शक्तिनगर येथे थांबे देण्यात यावेत; तसेच चंद्रपूरवरून मूलकडे धावणाऱ्या बसला बंगाली कॅम्प, इंदिरानगर, कृष्णनगर, एमईएल येथे तर नागपूरकडे जणाऱ्या बसचे पाण्याची टाकी, जनता कॉलेज बापटनगर, ट्रायस्टार हॉटेलजवळ थांबा देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी ‘बीबीएसएस’चे अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधळा, अश्विनी खोब्रागडे, वनश्री मेश्राम, संजीवनी कुबेर, तरन्नुम मलिक, सुबोध कासूलकर, जितेंद्र चोरडिया, मल्लक शकीर, शिशिर हलदर, दिनेश जुमडे, विलास माथनकर, आदी उपस्थित होते.