शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

वधारलेल्या शैक्षणिक साहित्यांमुळे पालक हैराण

By admin | Updated: July 21, 2014 00:07 IST

पहिलीपासून आठव्या वर्गापर्यंत देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तक योजना, पुढील शिक्षणासाठी बंद करण्यात आल्याने गरीब पालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

चंद्रपूर : पहिलीपासून आठव्या वर्गापर्यंत देण्यात येणारी मोफत पाठ्यपुस्तक योजना, पुढील शिक्षणासाठी बंद करण्यात आल्याने गरीब पालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. दहाव्या वर्गानंतर आपला पाल्य हुशार असला तरी त्यांच्या शैक्षणिक साहित्याची किंमत भरमसाठ वाढल्याने पालक वर्ग हैराण झाला असून अनेक गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शासनाने शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी सक्तीचे शिक्षण कायदा लागू केला. मात्र या सर्व महागड्या शिक्षण प्रणालीमुळे भविष्यातील गरीब घरचा मुलगा शिक्षण घेणार की नाही, हा प्रश्न उभा आहे. मागील वर्षीच्या तुलनेत १० ते २० टक्के शिक्षण साहित्याची किंमती वाढल्यामुळे वाढत्या महागाईवर पालकांची चिंता वाढली आहे.शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे अधिक पुस्तकाची मागणी करून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळेल. मात्र पुढे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय? त्यांना बाजारातून महागडी पुस्तके खरेदी करावी लागत आहे. याशिवाय वह्या, पेन, पेन्सीलसारखे शैक्षणिक साहित्यही दिवसेंदिवस महाग होत चालल्याने शिक्षण घेणे गरिबांसाठी कठीण होत चालले आहे.प्रत्येक पालकांना आपला मुलगा शिकून मोठा व्हावा उच्च शिखर गाठावे, आपले नाव गावाचे नाव मोठे करावे असे वाटते. स्वाभाविक आहे. त्यासाठी स्वत: काबाडकष्ट करून प्रत्येक पालक आपला मुलगा चांगल्या शाळेत पाठवतो. यातून गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा डबघाईस आल्या आहेत. शहरी शाळा बालकांनी फुलू लागल्या. शहरी शाळेतील कॉन्व्हेंटची गाडी (स्कुलबस) गावात दाखल होताच युनिफॉर्म घालून छोटी मुले अगदी शिस्तीत गाडीत बसून शाळेत जाताना पालकांना होणारा आनंद गगणात मावेनासा असतो.पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वही १० इ. ची १५ रु. झाली. १५ चे रजिस्टर ३० रु., चित्रकला वही २० ते ३० रु., कंपासपेटी ५० ते १०० रु. पर्यंत, दप्तर २०० ते ८०० रु. पर्यंत, पाण्याची बाटल २० ते ५० रु., जेवनाचा डब्बा ५० ते २०० रु. ही झाली छोट्या मुलांची खरेदी.वर्ग १० वीच्या समोर शिक्षण घेताना सायन्सचे शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना २०० रु. रूम किराया, ३० हजार रु. शिकवणी, १००० पुस्तके, ८०० रु. बुक पेन, २००० ड्रेस, इतर सर्व खर्च मिळून वर्षाला ६० ते ८० हजार रु. एकाला खर्च करावे लागतात. तेव्हा गरीब विद्यार्थी कसा शिकणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (शहर प्रतिनिधी)