शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबाच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
3
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
4
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
5
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
6
Mumbai Local Fight : मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
7
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
8
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
9
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
10
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
11
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
12
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
13
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
14
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
15
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
16
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास
17
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
18
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
19
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
20
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US

मनमानी शालेय शुल्कविरोधात पालकांना तक्रार करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:18 IST

चंद्रपूर : मनमानी शालेय शुल्क वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरोधात तक्रारी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पालकांसाठी पुन:निरीक्षण समिती व विभागीय ...

चंद्रपूर : मनमानी शालेय शुल्क वसूल करणाऱ्या शैक्षणिक संस्थांविरोधात तक्रारी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने पालकांसाठी पुन:निरीक्षण समिती व विभागीय शुल्क नियामक समित्या स्थापन केल्या. शुल्क नियामक समितीचा पत्ता, ई-मेल व दूरध्वनी क्रमांकाला व्यापक स्वरूपात शालेय शिक्षण विभाग व सर्व क्षेत्रीय कार्यालय, शाळांच्या संकेतस्थळ तसेच सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या कार्यवाहीचा अहवाल उच्च न्यायालयात सादर करावा लागणार आहे. त्यामुळे ही समिती पालकांना न्याय देण्यास सक्षम आहे, असा दावा शिक्षण विभागाचे अधिकारी करत आहेत.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या पाच विभागांत महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क अधिनियम समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षणक्षेत्रातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश आहे शिवाय सनदी लेखापालांच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक संस्थेचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या मनमानी कारभाराला चाप बसेल, असा दावा अधिकारी करत आहेत. ६ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार सर्व समित्यांच्या पदसिद्ध सदस्य सचिवांना समित्यांचे कामकाज तत्काळ सुरू करण्याबाबत पुन:निरीक्षण सूचना देण्यात आल्या. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. काेराेनामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचा शालेय फीसंदर्भात फारच मोठा प्रश्न निर्माण झाला. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरणे पालकांना आर्थिक संकटामुळे शक्य झाले नाही. त्यातच अनेक शाळांनी शुल्कात वाढ केली होती. यासंदर्भात पालकांनी शालेय विभागाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत.

चंद्रपुरात समितीच अस्तित्वात नाही

शुल्कवाढीबाबत दाद मागण्याची तरतूद महाराष्ट्र शुल्क विनियमन अधिनियमांत आहे. परंतु अशा समित्याच स्थापन झाल्या नाही, तर पालकांना न्याय कसा मिळणार, हा प्रश्न आहे. ज्या शाळांनी शालेय शुल्क वाढ केली आहे अशा शाळांच्या निर्णयाविरुद्ध पालकांना शुल्कवाढीबाबत आता अपिल करता येणार, अशी तरतूद आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही अशी समिती स्थापन करण्यात आलेली नाही.

कोट

राज्य शासनाने महाराष्ट्र शुल्क विनियमन अधिनियम तयार केला. ही चांगली बाब आहे. मात्र, अशा समित्या प्रत्येक जिल्ह्यात स्थापन झाल्या पाहिजेत. अन्यथा निर्णयाला अर्थ उरत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात ही समितीच नसल्याने पालक कुणाकडे तक्रारी करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे.

- मनोज लडके, सचिव पॅरेंट्स असोसिएशन फॉर चिल्ड्रेन एज्युकेशन, चंद्रपूर