शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

पेपर मिल कोणत्याही स्थितीत बंद बडू देणार नाही

By admin | Updated: May 9, 2016 00:52 IST

बल्लारपूर स्थित पेपर मिल हे चंद्रपूर जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. यामुळे, हा जुना व मोठा उद्योग बंद पडू देणार नाही, ....

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठकबल्लारपूर: बल्लारपूर स्थित पेपर मिल हे चंद्रपूर जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. यामुळे, हा जुना व मोठा उद्योग बंद पडू देणार नाही, अशी ग्वाही देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, या पेपर मिलला लागणारा कच्चा माल सॉफ्ट लाकडू व बांबू मिळविण्यासाठीचा मार्ग लवकरच मोकळा होईल, असे ठोस आश्वासन बल्लारपूर पेपर मिलचे अध्यक्ष, माजी खासदार नरेश पुगलिया यांना दिल्ली येथे महाराष्ट्र सदनात शनिवारी झालेल्या भेटीतील चर्चेत दिले. बांबू तसेच लाकडांच्या तुटवड्यामुळे कच्च्या मालाचा प्रश्न या उद्योगापुढे उभा झाला आहे. त्यापायी हा उद्योग बंद पडल्यास यावर अवलंबून असलेल्या सुमारे १० हजार कुटुंबांवर विपरीत परिणाम पडणार आहे. पुगलिया यांनी या भेटीत हा गंभीर व ज्वलंत प्रश्न मुख्यमंत्र्यासमोर माहिती देत मांडला. ते लक्षपूर्वक ऐकून घेऊन मुख्यमंत्र्यांनी मिल बंद होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले व या गंभीर समस्येबाबत लवकरात लवकर सभा बोलाविण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव क्षत्रिय तसेच मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव परदेशी यांना दिली.या मिल बाबतचा कच्च्या मालाचा प्रश्न कायमचा मिटावा याकरिता बांबू व सॉफ्ट लाकूड यांच्या लागवडीकरिता वनविभागाची डी ग्रेडेड जमीन पेपर मिलला देण्यात येईल, असेही ते म्हणाले, शासनाने पेपर मिलला, तुटवडा पडणार नाही तेवढा आवश्यक बांबू द्यावा, या मागणीसाठी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभा आणि विदर्भ किसान मजदूर काँग्रेसने १ मेपासून येथे साखळी उपोषण सुरु केले आहे. या मागणीकरिता १० मे रोजी स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महिला आणि कामगारांचा मोर्चा नेण्याचे ठरले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर हा मोर्चा तूर्त रद्द करण्यात आला आहे. (तालुका प्रतिनिधी)बल्लारपूर पेपर मिलला लागणारा कच्चा माल सध्या आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या प्रांतांमधून आणावा लागत आहे. यामुळे कागद उत्पादन खर्च वाढत आहे व कागदाच्या किंमती वाढवाव्या लागत आहे. दुसरीकडे चीन व इंडोनोशिया या देशातील कागद येथे आयात होत असून त्यांचेवर आयात शुल्क शून्य असल्याने त्यांनी विक्री किंमत कमी आहे. याचा परिणाम देशातील कागद उद्योगाच्या व्यवसायावर होत आहे. यावर उपाय म्हणजे विदेशातून येथे येणाऱ्या कागदावर आयात कर लावावा, अशी मागणी पुगलिया यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली, यावर निश्चित उपाय केला जाणार असे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्र्याच्या या भेटीत पुगलिया यांनी या भागातील जलसमस्याही त्यांचेपुढे मांडली. वर्धा नदी आणि पैनगंगा या नदीकाठी २१ मोठे उद्योग व नगर परिषद आणि ग्रा.पं.च्या नळ योजनांच्या विहिरी आहेत. पाणी साठा भरपूर असावा याकरिता या नद्यांवर धरण बांधणे तसेच निम्न पैनगंगा प्रोजेक्टला मान्यता सरकारने ५० टक्के खर्च उचलून हे प्रकल्प पूर्ण करावे, अशी मागणी त्यांनी केली.