शतकोत्तर रजत जयंती पर्व : विविध कार्यक्रमांचे केले जाणार आयोजनचंद्रपूर : आधुनिक भारताचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे वतीने शनिवारी स्थानिक गांधी चौकातील काँग्रेस कार्यालयात आदरांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पंडितजींच्या शतकोत्तर रजत जयंती पर्वानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गजानन गावंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष डॉ. सुरेश महाकुलकर, मनपाचे काँग्रेसचे गटनेता प्रशांत दानव, उपगटनेता महेंद्र जयस्वाल, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अशोक नागापुरे व प्रवीण पडवेकर, शहर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुधाकरसिंह गौर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस (ओ.बी.सी.) विभागाचे अध्यक्ष देवेन्द्र बेले, सेवादलाचे जिल्हा प्रमुख प्रमोद राखुंडे, अॅड. अरुण धोटे (राजुरा ता.काँ. अध्यक्ष), नगरसेवक राजेश रेवल्लीवार, श्रीनिवास पारनंदी, नगरसेविका वीणा खनके, सकीना अंसारी, शिल्पा आंबेकर उपस्थित होते.याप्रसंगी प्रा. प्रमोद राखुंडे, अरुण बुरडकर, प्रवीण पडवेकर, प्रशांत दानव, अॅड. अरुण धोटे, देवेंद्र बेले यांची प्रसंगोचित भाषणे झालीत.आपल्या अध्यक्षीय भाषणात गजानन गावंडे म्हणाले, आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न पं. जवाहरलाल नेहरू यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्य त्यांच्या स्मृतींना विनम्र आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वातंत्र्य प्राप्तीसाठीच्या अनेक आंदोलनामध्ये पं. नेहरूंनी देशप्रेमाने व उत्कट देशभक्तीने प्रेरीत होऊन म. गांधीजींच्या मार्गदर्शनात भाग घेतला. या स्वातंत्र्य लढ्याच्या दरम्यान पं. नेहरूंना नऊ वर्षाचा कारावासही भोगावा लागला.भारताला जगात महासत्ता बनविण्याचा पाया खऱ्या अर्थाने पं. नेहरूजींच्या काळातच घातला गेला. परंतु आज एनडीए सरकारच्या काळात धर्मांध शक्ती डोके वर काढीत आहे. जातीय तेढ वाढविली जात आहे. या सरकारकडून नेहरू-गांधी यांच्या अद्वितीय व अलौकिक कर्तृत्व संपन्न गौरवाला मिटविण्याचा प्रयत्न केला जात आहे.त्यामुळे १४ नोव्हेंबर २०१५ या १२६ व्या जयंती दिवसापासून ते १४ नोव्हेंबर २०१६ पर्यंतच्या वर्षात पं. जवाहरलाल नेहरूजीच्या शतकोत्तर रजत जयंतीपूर्तीनिमित्त चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शन व नियोजनातंर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे संकल्पित आहे. या कार्यक्रमात एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील तिवारी, चेतन गेडाम, आकाश मासीरकर, मोन्टी मानकर, श्रीनिवास पारनंदी, राजेश रेवल्लीवार, विनोद पिंपळशेंडे, अन्वरभाई, असलर्म नुरूद्दीन, तिगाडे, खालीकभाई, दिगंबर लोडेलीवार, राजू हरणे, राजू जयस्वाल, कृष्णा यादव, हरीदास नागपुरे यांच्यासह चंद्रपुरातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
पंडित जवाहरलाल नेहरूंना काँग्रेसजनांची आदरांजली
By admin | Updated: November 16, 2015 00:53 IST