शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

पांदण रस्त्याच्या पाईप कामात सावळागोंधळ

By admin | Updated: October 13, 2016 02:26 IST

चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडपिपरी, पुयारदंड गट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी एमआरई जिस अंतर्गत गावातील पांदण रस्त्याची कामे केली.

गडपिपरी-पुयारदंड रस्ता : ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणीचिमूर : चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या गडपिपरी, पुयारदंड गट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी एमआरई जिस अंतर्गत गावातील पांदण रस्त्याची कामे केली. रस्त्यात सिमेंटचे पाईप टाकण्यात आले. कामाचे बिलही उचलण्यात आले. मात्र ग्रामसेवकाने कुठल्याही प्रकारची निविदा न काढता परस्पर काम केले. उचल केलेल्या बिलात तफावत असून झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात अनियमितता असून भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख विलास डांगे यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.एमआरईजीएस अंतर्गत पांदन रस्त्याचे काम सन २०१४-१५ ला करण्यात आले. भिसी-शंकरपूर रोड ते गुंडेराव थुटेपर्यंत व गोडणगाव ते लक्ष्मन भोयर कन्हाळगाव पादंन रस्त्यामध्ये सिमेंट पाईप टाकण्यात आले. या पाईपसाठी एक लाख २० हजार रुपयांची उचल केली. मात्र या कामाची कुठलीही निविदा काढण्यात आली नाही व ग्रामपंचायतला विश्वासात सुद्धा घेण्यात आले नाही. परस्पर स्वमर्जीने काम केले. सदर काम पूर्णता निकृष्ट दर्जाचे आहे. या कामात अनियमितता असून कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे.पुयारदंड येथील सरपंच वसता जांभुळे यांनी निवडणूक लढविली, तेव्हा त्यांच्याकडे शौचालय नव्हते. बेसलाईनला त्यांच्याकडे शौचालय नसल्याची नोंद आहे. तरीही जांभुळे व ग्रामसेवक मिसाळ यांनी संगणमत करुन शौचालय असल्याचे खोटे प्रमाणपत्र तयार करुन प्रशासनाची दिशाभूल करीत फसवणूक केली व सन २०१६-१७ या वर्षात शौचालय मंजूर केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य अश्विन प्रफुल उर्फ अमोल पाटील यांच्याकडे शौचालय नसतानाही ग्रामसेवकाने निवडणुकीत प्रमाणपत्र दिले. या संदर्भात सरपंच रंजना पाटील व कुंदा वानखेडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार दोनदा दिली. मात्र ग्रामसेवकांवर अजूनही कारवाई झाली नाही. तर ग्रामसेवक २७ जानेवारी, १५ आॅगस्ट व १ मे महाराष्ट्र दिनाच्या खास ग्रामसभा न घेता गैरहजर असल्याचेही डांगे यांनी परिषदेत सांगितले. ग्रामसेवक लक्ष्मण मिसाळ यांनी प्रसिद्ध पत्रकातून माध्यमांना दिलेली माहिती खोटी व चुकीची असून प्रशासनाची दिशाभूल करणारी आहे. माध्यमाद्वारे मिसाळ यांनी माझ्यावर खंडणी मागण्याचा आरोप केला आहे. आपण जर खंडणी मागितली असेल तर ग्रामसेवकांनी स्वतंत्र चौकशी लावावी. ग्रामसेवक मिसाळ यांच्याशी आपण कधीही प्रत्यक्ष बोललो नाही. मात्र ग्रामसेवक मिसाळ यांनी प्रसिद्धी पत्रकातून खोटी माहिती पुरवून माझी बदनामी केली असल्याचे सांगत एमआरईजीएसच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या व आपले वरिष्ठ मंत्र्यांशी संबंध असल्याचे भासवून दबाव आणणाऱ्या ग्रामसेवक मिसाळ यांना निलंबित करण्याची मागणी विलास डांगे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.पत्रकार परिषदेला बोथलीचे उपसरपंच तानाजी सहारे, कमलाकर बोरकर, अजित सुकारे, रमेश मिलकर, सूर्यभान खोब्रागडे, कवडू धानोरकर, संतोष कामडी, सचिन खाडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलनातून माझ्यावर लावलेल्या आरोपाचे प्रथम पुरावे सादर करावे, नंतरच नवीन आरोप करावे. गडपिपरी, पुयारदंड, गट ग्रामपंचायतीच्या पांदन रस्त्यात कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही. कामाचे कोटेशन काढण्यात आले. सरपंच वसंता जांभुळे यांची शौचालयाची पेंडींग फाईल होती. अनावधनाने शौचालय मंजूर झाले. मात्र त्याच्या कामाचे बिल रोखून धरले आहे. अश्विनी प्रफुल उर्फ अमोल पाटील यांच्या घराची शहानिशा करुनच शौचालयाचे प्रमाणपत्र दिले. माझ्याकडे दोन ग्रामपंचायतीचा पदभार असल्याने वेळेअभावी एकाच ग्रामसभेला हजर राऊ शकतो तर दुसऱ्या ग्रामसभेला जाता येत नाही.- लक्ष्मन मिसाळ, ग्रामसेवक गडपिपरी, पुयारदंड