शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

समस्या निवारणासाठी आता पंचायत मित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2016 00:54 IST

बऱ्याचदा ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामानिमित्त तालुक्यातील कार्यालयात ये-जा करावी लागते.

कामे होणार झटपट : जिवती पंचायत समितीची अभिनव संकल्पनासंघरक्षित तावाडे जिवतीबऱ्याचदा ग्रामीण भागातील नागरिकांना विविध कामानिमित्त तालुक्यातील कार्यालयात ये-जा करावी लागते. परंतु त्या व्यक्तीचे काम एका दिवसात होणारच असे नाही. आठवडा, पंधरवाडा तर कधी कधी महिने-दोन महिने कार्यालयात येरझारा माराव्या लागतात. समन्वयाचा अभाव किंवा अन्य कारणे याला कारणीभूत असतील. पण येरझाऱ्या मारणाऱ्या नागरिकांना मात्र आर्थिक भुर्दंडासोबत शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. मात्र यापुढे जिवती तालुक्यातील नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागणार नाही. कारण जिवती पंचायत स्तरावर नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्याचे लगेच निवारण करण्यासाठी पंचायत मित्र ही संकल्पना राबविण्यात येत आहे. जिवती येथील संवर्ग विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी ‘पंचायत मित्र’ ही संकल्पना लोकहितासाठी राबविण्यात येत असल्याचे सांगितले आणि ही संकल्पना राबविणारी चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती पंचायत समिती राज्यात एकमेव आहे, असा दावाही संवर्ग विकास अधिकारी उमेश नंदागवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. काळाची व कामाची निकड लक्षात घेता ग्रामीण भागातून येणाऱ्या विविध अडचणी व तक्रारीवर मात करून गाव पातळीवर पंचायत मित्र स्वयंसेवकाची निवड केली जाणार आहे. समाजकार्याची आवड असणाऱ्या सुशिक्षित व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीची पंचायत मित्र स्वयंसेवक म्हणून निवड केली जाणार आहे. ग्रामसभेच्या माध्यमातून ही निवड होईल.पंचायत मित्राच्या माध्यमातून गावपातळीवर पंचायत समितीशी निगडीत असणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामध्ये गावातील ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेणे, त्याची माहिती पंचायत समितीच्या मदत केंद्रात देणे, त्याविषयी ग्रामस्थात समुपदेशक करणे, गावातील समस्यांचा गावपातळीवर कार्यरत असणाऱ्या विविध शासकीय संस्थाशी संपर्क साधून पाठपुरावा घेणे, वेळोवेळी त्या समस्यांचा मागोवा घेणे, जटील समस्यांचे तज्ज्ञांच्या मदतीने मार्गदर्शन घेणे, यासारखी अनेक कामे केली जाणार आहेत. सदर कामाबाबत पंचायत समितीच्या प्रत्येक विभागातील प्राथमिक माहितीचे प्रशिक्षण पंचायत मित्राला दिले जाणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणे सोयीचे होईल.शासकीय कार्यालयात विविध कामासाठी नागरिकांना सतत मारावे लागणारे हेलपाटे, शासकीय कार्यपद्धतीमुळे लोकांची होणारी मानसिक व शारीरिक कुचंबणा, कार्यालयात जनतेला तासन्तास ताटकळत उभे राहणे तसेच कार्यालयीन अस्वच्छता, अधिकारी-कर्मचारी यांची अरेरावी, नियोजनाचा अभाव, कामात सुसुत्रता नसणे, समन्वयाचा अभाव, कामातील विलंब, असे चित्र शासकीय कार्यालयात सर्रासपणे दिसते. परंतु यापुढे अतिमागास, दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील पंचायत समितीने हा कलंक पुसून टाकण्याचे ठरविले आहे. संवर्ग विकास अधिकारी नंदागवळी यांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेतून पंचायत समिती ‘हेल्प डेस्क’ साकारत आहेत. त्यामुळे इतर वेळी सर्वसामान्यांशी बोलताना उग्र वाटणारा आवाज आता सौम्य व सामंजस्यांचे रूप घेणार आहे. त्यासाठी पंचायत समितीमधील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांना कामानिमित्त येणाऱ्या लोकांचे स्वागत, संभाषण कौशल्य, समन्वय, व्यक्तिमत्त्व विकास यासारख्या आवश्यक बाबींचे वेळोवेळी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंचायत समितीच्या या उपक्रमामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असला तरी अंमलबजावणीवही बरेच अवलंबून असणार आहे.