शहरं
Join us  
Trending Stories
1
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

पालेबारसा-उसरपार चक कालवा फुटलेलाच

By admin | Updated: October 19, 2015 01:34 IST

सावली तालुक्यातील पालेबारसा येथील कॅनलपासून ३०० फुट अंतरावरील नहर मागील वर्षापासून फुटला ...

शेकडो एकर धानपीक धोक्यात : संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्षसावली : सावली तालुक्यातील पालेबारसा येथील कॅनलपासून ३०० फुट अंतरावरील नहर मागील वर्षापासून फुटला असल्याने ४०० एकर शेती करपण्याच्या अवस्थेत आहे. हा नहर ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजवा कालवा अंतर्गत येत असल्याने विभागीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षतेमुळे २५० शेतकरी लाभार्थ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. पीक गर्भावस्थेत असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. वेळेवर पाणी पोहाचेले नाही तर शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.यासंदर्भात शेतकरी कार्यालयाला जाऊन भेटले असता उद्या, परवा येतो म्हणून खोटे आश्वासन देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान पीक वाचविण्यासाठी हात उसणे पैसे घेऊन, मजुरीचे माणसं लावून जेसीबी, पोकलॅड मशीन बोलावून काम करवून घेत आहेत. ही विचित्र अवस्था परिसरातील शेतकऱ्यांची पाहायला मिळत आहे. तरीही गोसेखुर्द ब्रह्मपुरी विभाग जागे होत नसून कामासाठी हात झटकून देत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी युवा काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी वरिष्ठांकडे निवेदनातून तक्रार केली आहे.पालेबारसा या गावाची शेती ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजव्या कालव्याला लागून आहे. उसरपार चक कॅनल नं. ९० असून या मायनरमधून पाण्याचा पुरवठा शेतीला होत असतो. या कॅनलचे काम अग्रवाल कंपनी नागपूरकडे होते. मागील वर्षी पावसामुळे हा कॅनल (नहर) फुटला. त्या जागेवरच २० फुट खोल खड्डा पडला. परिणामी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या ठिकाणापासून पुढे ३०० फुट अंतरावर पाणी पोहोचवायचे आहे. आधीच पावसाची पाणी कमी होत असताना यावर्षी पण गोसेखुर्द कालव्याचे पाणी शेतीला मिळणार याची शाश्वती नव्हती. परंतु नेत्याच्या आशीर्वादाने गोसेदुर्खचे पाणी कॅनलपर्यंत पोहोचले. शेतकऱ्यांना आशेचा नवा किरण दिसला. जलपूजनाचा कार्यक्रम आटोपून नेते मोकळे झाले. परंतु कॅनला लागून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष झाले. शेतीला पाणी पोहोचण्याची अडचण कायमच राहिली. शेवटी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी परिस्थिती येवून ठेपल्याने लाभार्थ्यांची कार्यालाकडे धावाधाव वाढली. मात्र कार्यालयाच्या अधिकाऱ्यांचा दुर्लक्षपणा स्पष्ट दिसून आला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे पुन्हा कर्जाचा डोंगर डोक्यावर घेवून शेतकऱ्यांना शेती करावी लागत आहे. असे असतानाही ब्रह्मपुरी गोसेखुर्द उजवा कालवा विभागाचे अधिकारी कुंभकर्णी झोपेतच आहेत. एरवी शेतकऱ्यांची समस्या सोडविणाारे नेतेही हातावर हात ठेवून गप्प आहेत.उसरपार चक कॅनल नं. ९० चे पाणी पालेबारसा मायनरला येत असून याला लागून शेकडो एकर शेती आहे. याच कॅनलच्या भरोशावर येथील शेतीला पाणीेपुरवठा होतो. जवळच तलाव आहेत. पण पाऊस न पडल्याने ते कोरडे आहेत. पाण्याचे दुसरे साधन नसल्याने याच कालव्याच्या भरोशावर अवलंबून राहावे लागते. धान शेतीला भेगा पडल्या आहेत. किडी व रोगाचा प्रादूर्भाव वाढला आहे. बांधीत पाणी नसल्याने फरवारणी करता येत नाही. जमीन कडक असल्याने धानपीक करपण्याच्या मार्गावर आहे. वर्षभराचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शेवटी पाण्याची सोय विभाग करत नसल्याने तेलही गेले तुपही गेले हाती धुपारणे आल्याची अवस्था बघायला मिळत आहे. त्यामुळे कर्जाच्या बोझ्यात शेतकऱ्याचे जीवन कायम आहे.फुटलेला कालवा दुरुस्ती करण्यासाठी ब्रह्मपुरी उजवा कालवाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही अधिकारी वर्गाला जाग नाही. लोकप्रतिनिधींनीही याकडे पाठ फिरविली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष खुशाल लोडे यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. (तालुका प्रतिनिधी)